शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

उद्योगनगरीत कंपन्यांसमोर सुशिक्षितांची वेठबिगारी

By admin | Updated: October 5, 2015 01:46 IST

कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर नोकरीच्या आशेने तासन्तास उभे राहणाऱ्या तरुणांचे विदारक वास्तव उद्योगनगरीत पहावयास मिळत आहे.

नीलेश जंगम, पिंपरीकंपन्यांच्या प्रवेशद्वारावर नोकरीच्या आशेने तासन्तास उभे राहणाऱ्या तरुणांचे विदारक वास्तव उद्योगनगरीत पहावयास मिळत आहे. मजूर अड्ड्यावर दिसणाऱ्या मजूरांच्या लोंढ्यांप्रमाणे आयटीआय, तसेच अन्य शिक्षण घेतलेले सुक्षितांचे लोंढे कंपन्यांवर धडकू लागले आहेत.दिवसभर थांबूनही काम न मिळाल्याने हे तरुण निराश होऊन परत माघारी फिरतात. दुसऱ्या दिवशी त्याच किंवा इतरत्र काम मिळवण्याचा प्रयत्न करतात. मंदीमुळे कंपन्यांमध्ये उत्पादनही कमी झाले आहे. यामुळे खूप अपेक्षा मनात बाळगून बोहरगावाहून आलेल्या या तरुणांचा रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जागतिक आर्थिक मंदीच्या झळा उद्योगनगरीलाही बसू लागल्या आहेत. या ठिकाणी आठ हजार लघुउद्योग, सुमारे १७५ मोठ्या कंपन्या आहेत. यापैकी ७० टक्के कंपन्या वाहन उद्योगाशी निगडीत आहेत. परदेशी कंपन्यांही या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे व्यवसायिक स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. परदेशातील कंपन्यांचे अ‍ॅटोमायझेशन आहे. त्या कंपन्यांमध्ये उच्च दर्जाची यंत्रणा वापरली जाते. त्यामुळे ज्या ठिकाणी १० लोक काम करत होते, त्या ठिकाणी आता यंत्रावर १ किंवा दोनच कामगार काम करतात. त्यामुळे कामगार कपात झाली आहे. भोसरी, चिंचवड व पिंपरी भागातील काही नामांकित कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर सकाळी सात वाजल्यापासूनच नोकरीच्या आशेने शेकडो तरुण उभे राहिलेले दिसतात. यामध्ये शहरासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून, तसेच परराज्यांतून नोकरीसाठी आलेल्यांची संख्या मोठी आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद, जळगाव या या जिल्ह्यांतील, तसेच उत्तर प्रदेश, बिहार या परप्रांतांतून आलेले तरुण पूर्वीच शहरात स्थायिक झालेल्या एखाद्या तरुणाच्या ओळखीने शहरात येतात. काम मिळेपर्यंत सर्व जण एक खोली घेऊन एकत्र राहतात. एकमेकांच्या चर्चेतून शहरातील कंपन्यांची माहिती घेतात. काही कंपनीत थेट, तर काही कंपनीत ठेकेदारांच्या मदतीने काम मिळविण्याचा प्रयत्न करतात. एमआयडीसीतील अनेक कंपन्यांमध्ये कालावधी, तर काही कंपनीत रोजंदारी पद्धतीने काम असते. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा झालेली तरुण सकाळी आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे घेऊन कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी लावतात. प्रवेशद्वाराच्या बाजूलाच संबंधित कंपनीचे काही ठेकेदार असतात. व्यवस्थापनाकडून जशी मागणी होते, त्यानुसार पात्र झालेल्या तरुणांना कामाची संधी मिळते. इतर तरुण निराश होऊन परत निघून जातात व दुसऱ्या दिवशी परत कामाच्या अपेक्षेने येतात. उत्तर प्रदेश बिहारचे तरुण जड, कष्टाचे काम करण्यास तयार होतात. या कंपन्यांमध्ये दिवसाला ३०० ते ५०० रुपयांपर्यंत हजेरी दिली जाते.