शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीत मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
2
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
3
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
4
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
5
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
6
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
7
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
8
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
9
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
10
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
11
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
12
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
13
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
14
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
15
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
16
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
17
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
18
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
19
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
20
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

उद्योगनगरीत कंपन्यांसमोर सुशिक्षितांची वेठबिगारी

By admin | Updated: October 5, 2015 01:46 IST

कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर नोकरीच्या आशेने तासन्तास उभे राहणाऱ्या तरुणांचे विदारक वास्तव उद्योगनगरीत पहावयास मिळत आहे.

नीलेश जंगम, पिंपरीकंपन्यांच्या प्रवेशद्वारावर नोकरीच्या आशेने तासन्तास उभे राहणाऱ्या तरुणांचे विदारक वास्तव उद्योगनगरीत पहावयास मिळत आहे. मजूर अड्ड्यावर दिसणाऱ्या मजूरांच्या लोंढ्यांप्रमाणे आयटीआय, तसेच अन्य शिक्षण घेतलेले सुक्षितांचे लोंढे कंपन्यांवर धडकू लागले आहेत.दिवसभर थांबूनही काम न मिळाल्याने हे तरुण निराश होऊन परत माघारी फिरतात. दुसऱ्या दिवशी त्याच किंवा इतरत्र काम मिळवण्याचा प्रयत्न करतात. मंदीमुळे कंपन्यांमध्ये उत्पादनही कमी झाले आहे. यामुळे खूप अपेक्षा मनात बाळगून बोहरगावाहून आलेल्या या तरुणांचा रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जागतिक आर्थिक मंदीच्या झळा उद्योगनगरीलाही बसू लागल्या आहेत. या ठिकाणी आठ हजार लघुउद्योग, सुमारे १७५ मोठ्या कंपन्या आहेत. यापैकी ७० टक्के कंपन्या वाहन उद्योगाशी निगडीत आहेत. परदेशी कंपन्यांही या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे व्यवसायिक स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. परदेशातील कंपन्यांचे अ‍ॅटोमायझेशन आहे. त्या कंपन्यांमध्ये उच्च दर्जाची यंत्रणा वापरली जाते. त्यामुळे ज्या ठिकाणी १० लोक काम करत होते, त्या ठिकाणी आता यंत्रावर १ किंवा दोनच कामगार काम करतात. त्यामुळे कामगार कपात झाली आहे. भोसरी, चिंचवड व पिंपरी भागातील काही नामांकित कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर सकाळी सात वाजल्यापासूनच नोकरीच्या आशेने शेकडो तरुण उभे राहिलेले दिसतात. यामध्ये शहरासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून, तसेच परराज्यांतून नोकरीसाठी आलेल्यांची संख्या मोठी आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद, जळगाव या या जिल्ह्यांतील, तसेच उत्तर प्रदेश, बिहार या परप्रांतांतून आलेले तरुण पूर्वीच शहरात स्थायिक झालेल्या एखाद्या तरुणाच्या ओळखीने शहरात येतात. काम मिळेपर्यंत सर्व जण एक खोली घेऊन एकत्र राहतात. एकमेकांच्या चर्चेतून शहरातील कंपन्यांची माहिती घेतात. काही कंपनीत थेट, तर काही कंपनीत ठेकेदारांच्या मदतीने काम मिळविण्याचा प्रयत्न करतात. एमआयडीसीतील अनेक कंपन्यांमध्ये कालावधी, तर काही कंपनीत रोजंदारी पद्धतीने काम असते. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा झालेली तरुण सकाळी आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे घेऊन कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी लावतात. प्रवेशद्वाराच्या बाजूलाच संबंधित कंपनीचे काही ठेकेदार असतात. व्यवस्थापनाकडून जशी मागणी होते, त्यानुसार पात्र झालेल्या तरुणांना कामाची संधी मिळते. इतर तरुण निराश होऊन परत निघून जातात व दुसऱ्या दिवशी परत कामाच्या अपेक्षेने येतात. उत्तर प्रदेश बिहारचे तरुण जड, कष्टाचे काम करण्यास तयार होतात. या कंपन्यांमध्ये दिवसाला ३०० ते ५०० रुपयांपर्यंत हजेरी दिली जाते.