शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यामध्ये जलजन्य आजारांचा वाढला उद्रेक

By admin | Updated: January 5, 2017 03:04 IST

गॅस्ट्रो, अतिसार, टायफॉईड (विषमज्वर) आणि कॉलरा (पटकी) या जलजन्य म्हणजेच पाण्यापासून पसरणाऱ्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली असून, मागील वर्षात राज्यभरात

पुणे : गॅस्ट्रो, अतिसार, टायफॉईड (विषमज्वर) आणि कॉलरा (पटकी) या जलजन्य म्हणजेच पाण्यापासून पसरणाऱ्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली असून, मागील वर्षात राज्यभरात या आजारामुळे ३० जणांचा बळी गेला आहे. जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ या एका वर्षात राज्याच्या विविध भागांत एकूण ११६ जणांना लागण झाली होती. त्यातील काही रुग्णांना गंभीर लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यापैकी सर्वाधिक उद्रेक हा ठाणे विभागात झाला असून, ८ जणांचा पाण्यामार्फत होणाऱ्या आजारांनी मृत्यू झाला आहे. कोणत्याही आजाराचा उद्रेक म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशात एखाद्या आजाराचे सर्वसाधारण संख्येपेक्षा अधिक रुग्ण सापडणे. जलजन्य आजारांमध्ये गॅस्ट्रो, अतिसार, टायफाईड आणि कॉलरा यांचा समावेश होतो. राज्यभरात लागण झालेल्या ११६ रुग्णांमध्ये सर्वाधिक उद्रेक अतिसाराचा असून, या रुग्णांची संख्या ५२, गॅस्ट्रो ४४, काविळ ११ आणि कॉलरा ८ इतकी नोंदवण्यात आली आहे. हे सर्व उद्रेक दूषित पाण्यामुळे झाले असून, त्या ठिकाणी आरोग्य विभागाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. जलजन्य आजार हे साठलेल्या पावसाच्या पाण्याने किंवा पिण्याचे पाणी दूषित झाल्याने होतात. ग्रामीण भागात जास्त पाऊस झाल्यामुळे पाणी साचून राहते त्यानंतर त्यामध्ये घाण, कचरा गेल्याने ते दूषित बनते, ग्रामीण भागात तेच पाणी पिण्यासाठी वापरल्याने नागरिकांना बाधा होऊ शकते. तर शहरी भागात पिण्याच्या पाण्यासाठी असणारी पाईपलाईन जुनी झाल्यास किंवा गंजल्यास त्याद्वारे दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळते आणि आजारांची लागण होते. याबरोबरच नदी, नाले यांमध्ये अस्वच्छ आणि सांडपाणी सोडल्यामुळेही आजारांचा उद्रेक होण्यास कारणीभूत ठरते.ठाणे विभागात जलजन्य आजारांचे सर्वाधिक म्हणजे ३२ उद्रेक झाले असून, त्यातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नागपूर विभागात १९ उद्रेक व सात मृत्यू, नाशिक विभागात २० उद्रेक आणि पाच मृत्यू, अकोला विभागात १३ उद्रेक आणि ५ मृत्यू तर पुणे विभागात ३ उद्रेक आणि दोन मृत्यू झाले आहेत. पुणे विभागातील सोलापूरमध्ये दोन जणांचा मृत्यू हा गॅस्ट्रोने झाल्याची माहिती साथरोग विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. सन २०१५मध्ये याच आजारांची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ११८ होती तर केवळ सात जणांचा जलजन्य आजारांनी मृत्यू झाला होता.