शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पुण्यामध्ये जलजन्य आजारांचा वाढला उद्रेक

By admin | Updated: January 5, 2017 03:04 IST

गॅस्ट्रो, अतिसार, टायफॉईड (विषमज्वर) आणि कॉलरा (पटकी) या जलजन्य म्हणजेच पाण्यापासून पसरणाऱ्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली असून, मागील वर्षात राज्यभरात

पुणे : गॅस्ट्रो, अतिसार, टायफॉईड (विषमज्वर) आणि कॉलरा (पटकी) या जलजन्य म्हणजेच पाण्यापासून पसरणाऱ्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली असून, मागील वर्षात राज्यभरात या आजारामुळे ३० जणांचा बळी गेला आहे. जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ या एका वर्षात राज्याच्या विविध भागांत एकूण ११६ जणांना लागण झाली होती. त्यातील काही रुग्णांना गंभीर लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यापैकी सर्वाधिक उद्रेक हा ठाणे विभागात झाला असून, ८ जणांचा पाण्यामार्फत होणाऱ्या आजारांनी मृत्यू झाला आहे. कोणत्याही आजाराचा उद्रेक म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशात एखाद्या आजाराचे सर्वसाधारण संख्येपेक्षा अधिक रुग्ण सापडणे. जलजन्य आजारांमध्ये गॅस्ट्रो, अतिसार, टायफाईड आणि कॉलरा यांचा समावेश होतो. राज्यभरात लागण झालेल्या ११६ रुग्णांमध्ये सर्वाधिक उद्रेक अतिसाराचा असून, या रुग्णांची संख्या ५२, गॅस्ट्रो ४४, काविळ ११ आणि कॉलरा ८ इतकी नोंदवण्यात आली आहे. हे सर्व उद्रेक दूषित पाण्यामुळे झाले असून, त्या ठिकाणी आरोग्य विभागाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. जलजन्य आजार हे साठलेल्या पावसाच्या पाण्याने किंवा पिण्याचे पाणी दूषित झाल्याने होतात. ग्रामीण भागात जास्त पाऊस झाल्यामुळे पाणी साचून राहते त्यानंतर त्यामध्ये घाण, कचरा गेल्याने ते दूषित बनते, ग्रामीण भागात तेच पाणी पिण्यासाठी वापरल्याने नागरिकांना बाधा होऊ शकते. तर शहरी भागात पिण्याच्या पाण्यासाठी असणारी पाईपलाईन जुनी झाल्यास किंवा गंजल्यास त्याद्वारे दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळते आणि आजारांची लागण होते. याबरोबरच नदी, नाले यांमध्ये अस्वच्छ आणि सांडपाणी सोडल्यामुळेही आजारांचा उद्रेक होण्यास कारणीभूत ठरते.ठाणे विभागात जलजन्य आजारांचे सर्वाधिक म्हणजे ३२ उद्रेक झाले असून, त्यातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नागपूर विभागात १९ उद्रेक व सात मृत्यू, नाशिक विभागात २० उद्रेक आणि पाच मृत्यू, अकोला विभागात १३ उद्रेक आणि ५ मृत्यू तर पुणे विभागात ३ उद्रेक आणि दोन मृत्यू झाले आहेत. पुणे विभागातील सोलापूरमध्ये दोन जणांचा मृत्यू हा गॅस्ट्रोने झाल्याची माहिती साथरोग विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. सन २०१५मध्ये याच आजारांची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ११८ होती तर केवळ सात जणांचा जलजन्य आजारांनी मृत्यू झाला होता.