शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

बिल भरूनही ग्राहकांना ‘शॉक’, देयके भरूनही अनेक जणांचा खंडित केला वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:28 IST

वीज बिलाची वसुली करण्यासाठी सध्या महावितरण कंपनी आक्रमक झाली आहे. मात्र वीजबिल वाटपात सावळा गोंधळ असल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत.

चिंचवड : वीज बिलाची वसुली करण्यासाठी सध्या महावितरण कंपनी आक्रमक झाली आहे. मात्र वीजबिल वाटपात सावळा गोंधळ असल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. बिले भरूनही विद्युत प्रवाह खंडित करणे अथवा बिल भरल्याची शहानिशा न करता वीजतोड करण्याचा सपाटा सध्या चिंचवडमधील महावितरण कार्यालयाने सुरू केला आहे. परीक्षेच्या काळात या कारवाईची मोहीम अधिक तीव्र झाल्याने अनेक ग्राहक संतप्त झाले आहेत. कारवाईत तत्पर असणारे अधिकारी व कर्मचारी नियोजनात मागे पडत असल्याचे वास्तव समोर आले आहे.मंगळवारी सकाळी चिंचवडमधील महावितरणच्या कर्मचाºयांना आदेश मिळताच परिसरातील बिल न भरलेल्या ग्राहकांचा विद्युतपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली. या वेळी अनेक ग्राहकांचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. उन्हाच्या त्रासाने त्रस्त झालेले व परीक्षेचा काळ असल्याने संतप्त झालेल्या ग्राहकांनी महावितरण कार्यालय गाठले.या वेळी संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने अनेकांचा पारा चढला.काहींनी बिल भरूनही विद्युतपुरवठा खंडित केल्याच्या तक्रारी केल्या. तर काहींनी बिल मिळाले नसल्याच्या तक्रारी मांडल्या. नियमित बिल भरत असूनही कोणतीही विचारपूस न करता वीजपुरवठा खंडित केल्याचे सांगितले.काही वेळात हजर झालेल्या अधिकाºयांनी या ग्राहकांना वीजपुरवठा जोडण्याचा दंड ना घेता वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना कर्मचाºयांनी दिल्या. अनेकांना वेळेत बिल मिळत नसल्याने अडचणी येत असल्याचा तक्रारीवरून वाद झाले. विचारपूस न करता मुदतीनंतर दोन दिवसांतच कारवाई केल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला.कारवाईत तत्पर असलेल्या अधिकाºयांनाही नियोजनातही तत्पर व्हावे अशा सूचना केल्या. सर्व सामान्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला. वीजबिल वाटपात गोंधळ असल्याने ही व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.>वीजचोरीवर नाहीनियंत्रणनियमित बिले भरूनही आमचा विद्युतपुरवठा खंडित केला जातो. मात्र वीज चोरांवर महावितरण कंपनी कारवाई करत नाही. झोपडपट्टी भागात अनेकांनी आकडे टाकून वीज चोरी केल्याची बाब एका ग्राहकाने महावितरण अधिकाºयांना सांगितल्याने या अधिकाºयांचा पारा चढला. संबंधित अधिकाºयाने या ग्राहकाला तुम्ही झोपडपट्टीत राहायला जावा, असे उद्धट उत्तर दिल्याने ग्राहक व अधिकाºयांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. काही ग्राहकांनी आॅनलाइन बिल भरूनही पुरवठा बंद केल्याचे सांगितले. या प्रकारामुळे कार्यालयात गोंधळ निर्माण झाला.>अधिकारी म्हणतात... : ग्राहकांना कार्यालयाकडून केले जाते सहकार्य

नियमाप्रमाणे आमचे कर्मचारी कारवाई करत असतात. बिल मिळाले नसल्यास ग्राहकाने कार्यालयातून बिल घेणे महत्त्वाचे आहे. बिलाबाबत काही तक्रारी असल्यास ग्राहक तक्रार अर्ज करू शकतात. आॅनलाइन पेमेंट जमा होण्यास उशीर झाल्यास अडचणी येतात. विद्युतपुरवठा खंडित केल्यानंतर अनेक ग्राहक तक्रारी करण्यासाठी नियमित येत असतात. त्यांना सहकार्य करण्याचे काम कार्यालयाकडून केले जाते. के. डी. जाधव, सहायक अभियंतावेळेवर बिल मिळत नसल्याने अडचणी येतात. नियमित बिल भरत असूनही कोणतीही चौकशी न करता विद्युतपुरवठा खंडित केला जातो. मुलांच्या परीक्षा सुरू असल्याने याचा त्रास होतो. बिल भरले अथवा नाही याची चौकशी करणे महत्त्वाचे आहे. घरात कोणी नसताना अचानक वीजपुरवठा खंडित केला जातो. आज असाच प्रकार घडल्याने मी तक्रार करण्यासाठी कार्यालयात गेलो होतो. मात्र ग्राहकांना समाधान कारक उत्तरे मिळत नसल्याचा प्रकार आज पाहावयास मिळाला. - राहुल लुंकड, ग्राहकविद्युतपुरवठा खंडित करण्यासाठी आज कर्मचारी घरी आले. आम्हाला बिलच मिळाले नसल्याने बिल भरले न्हवते. नियमित बिल भरत असतो. बिल भरण्याबाबत मेसेज जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र मलाबिलाची कॉपी मिळाली नाही.नवीन बिल काढण्यासाठी कार्यालयात यावे लागते. आॅनलाइन पद्धत मी वापरत नसल्याने अडचणी येतात. या साठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.- रोहित गोखले, ग्राहक