शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

अग्निशामक दलातील कर्मचारी असुरक्षित

By admin | Updated: December 10, 2015 01:14 IST

जवडीतील स्वर्गीय राजीव माहिती-तंत्रज्ञाननगरीतून कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनास मिळतो. मात्र, येथील अग्निशामक दलाकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे

पिंपरी : हिंंजवडीतील स्वर्गीय राजीव माहिती-तंत्रज्ञाननगरीतून कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनास मिळतो. मात्र, येथील अग्निशामक दलाकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. विमाकवच नसल्याने दुसऱ्यांचा जीव वाचविणारे अग्निशामक दलाचे कर्मचारी असुरक्षित आहेत. चोवीस तास पिळवून घेतले जात आहे. महामंडळ दाद देईना आणि सरकार निर्णय घेईना, अशी स्थिती कर्मचाऱ्यांची झाली आहे. त्यांनी दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न आहे.हिंजवडी- माण-मारुंजीत टप्पा एक, दोन आणि तीनमध्ये आयटी पार्क विकसित झाला आहे. सुमारे दीड हजार छोट्या-मोठ्या कंपन्या आणि सुमारे सव्वादोन लाख कामगार, संगणक अभियंते या परिसरात काम करतात. फेज एक आणि फेज तीनमध्ये अग्निशामक दलाचे कार्यालय आहे. या दोन्ही ठिकाणी असणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, मुनष्यबळ अपुरे आहे. निम्म्याहून कमी असा कर्मचारीवर्ग येथे आहे. याबाबत कामगारांनी रयत कामगार संघटनेच्या वतीने महामंडळ, एमआयडीसीकडे आणि कामगार मंत्र्यांकडे दाद मागितली. मात्र, त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. आग विझविणे, गॅस गळती होणे, बांधकाम पडले, अपघात झाला. त्या वेळी मदतीसाठी या केंद्रातील कर्मचारी जात असतात. आयटी पार्क परिसरात वर्षभरात शंभर एक घटना घडतात. या घटनांमध्ये कमीत कमी वित्तहानी किंवा मनुष्यहानी व्हावी, या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी दलाचे कर्मचारी झटत असतात. अग्निशामक दलाचे कार्यालय आहे, म्हणून लाखो कामगार निश्चिंत असतात. मात्र, कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याने आयटी पार्कमधील लाखो कामगारांचे जीवन धोक्यात घालण्याचे काम महामंडळ करीत आहे.आयटी पार्कमधील केंद्रात अग्निशमनच्या गाड्या, आग विझविण्यासाठी प्राथमिक स्वरूपाची यंत्रणा येथे उपलब्ध आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर लागलेली आग विझविण्यासाठी फायर सूट नाहीत. आयटी इंडस्ट्री असल्याने या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. आयटी पार्कच्या सुरक्षिततेसाठी सध्या या केंद्राकडे ३५ मीटर आणि ५५ मीटर उंचची शिडी उपलब्ध आहे. साधारणपणे अठरा मजल्यांपर्यंत पोहोचता येते. या परिसरात आता २२ मजल्यांपर्यंत इमारती निर्माण झाल्या आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना झाल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी सध्या उपलब्ध असलेली शिडी कमी पडत आहे. महाराष्ट्र शासन, महामंडळ, तसेच इतर अग्निशामक संस्थांच्या नियमाप्रमाणे दैनंदिन काम हे सर्वांसाठी समान आठ तासांचे असले पाहिजे, असा नियम आहे. मात्र, नियम काही कर्मचाऱ्यांसाठी खंडित स्वरूपाचा असेल, असा महामंडळाचा कोणताही नियम नाही. मात्र, कर्मचारी उपलब्ध नसल्याने आठ तासांपेक्षा अधिक काळ राबवून घेतले जात आहे. (प्रतिनिधी)