शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

निवडणूक खर्चात दुप्पट वाढ

By admin | Updated: February 1, 2017 04:43 IST

महापालिका निवडणुकसाठी एका इच्छूक उमेदवाराला खर्च करण्यासाठी ४ लाखांच्या मर्यादेमध्ये दुप्पटीने वाढ करून ती ८ लाख इतकी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून

पिंपरी : महापालिका निवडणुकसाठी एका इच्छूक उमेदवाराला खर्च करण्यासाठी ४ लाखांच्या मर्यादेमध्ये दुप्पटीने वाढ करून ती ८ लाख इतकी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून मंगळवारी काढण्यात आले आहेत. त्यामुळे अवघ्या ४ लाखात निवडणुकीचा हिशोब कसा दाखवायचा याच्या चिंतेत असलेल्या इच्छूक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी पैशांचा मोठयाप्रमाणात वापर करून निवडणुकीवर प्रभाव पाडू नये यासाठी निवडणूक आयोगाकडून उमेदवारांनी निवडणुकीमध्ये करावयाच्या खर्चावर मर्यादा घातली जाते. राज्यातील आगामी दहा महापालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या, त्यावेळी उमेदवारांना खर्च करण्यासाठी ४ लाख रूपये निश्चित करण्यात आली होती. मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभुमीवर इतक्या खर्चात निवडणुक लढविणे अवघड असल्याने त्यामध्ये दुप्पटीने वाढ करून ती ८ लाख इतकी करण्याचा निर्णय निवडणुक आयोगाकडून घेण्यात आला आहे.राज्य निवडणुक आयोगाकडून १५० ते १६१ सदस्यसंख्या असलेल्या महापालिकांच्या उमेदवारांसाठी १० लाख इतकी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. ११६ ते १५० सदस्यसंख्या असलेल्या महापालिकांसाठी ८ लाखांपर्यंत, ८६ ते ११५ सदस्यसंख्येच्या महापालिकांसाठी ७ लाख, ६५ ते ८५ सदस्यसंख्या असलेल्या पालिकांसाठी ५ लाख इतकी उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदांसाठी ४ लाख ते ६ लाख तर पंचायत समित्यांसाठी ३ ते ४ लाख इतकी उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. (प्रतिनिधी)उमेदवारी अर्जानंतर खर्चाचा होणार हिशेब उमेदवाराने निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर मतदान होईपर्यंत त्याच्याकडून निवडणुकीसाठी केला जाणारा खर्च मोजला जातो. निवडणुकीसाठी दररोज केल्या जाणाऱ्या खर्चाची माहिती त्यांना निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागते. उमेदवारांना घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा त्यांना जास्तीचा खर्च करता येत नाही, तसे आढळून आल्यास त्यांच्यावर निवडणुक आयोगाकडून कारवाई केली जाते.