शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

ई-पेमेंटच्या बोजवाऱ्याने विद्यार्थी बक्षिसांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 01:49 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोठा गाजावाजा करून दहावी आणि बारावीतील गुणवंतांना ६ कोटी ६ लाख ४० हजार रुपयांच्या बक्षिसांचे वाटप नुकतेच केले.

- विश्वास मोरे पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोठा गाजावाजा करून दहावी आणि बारावीतील गुणवंतांना ६ कोटी ६ लाख ४० हजार रुपयांच्या बक्षिसांचे वाटप नुकतेच केले. जाहीर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ई-पेमेंट करण्यात आले. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याबद्दल पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नागरवस्ती विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला असून, आॅनलाइन पेमेंटचे तीनतेरा वाजले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शाळांतील गुणवंत आणि शहराच्या हद्दीतील दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जातात. नागरवस्ती विभागाच्या कल्याणकारी योजनेंतर्गत बक्षिसे दिली जातात. यासाठी अर्ज मागविले जातात. अर्ज येऊन वर्ष झाले आहे. गेल्या वर्षीचे बक्षीस वितरण दुसऱ्या वर्षीच्या परीक्षेच्या वेळी झाले. चिंचवड येथे दोन दिवसांपूर्वीमोठा गाजावाजा करून महापौरराहुल जाधव यांच्या हस्ते ६ कोटी ६ लाख ४० हजार रुपयांच्या बक्षिसांचे वाटप केले.केवळ मेसेज, पैसै नाहीचई पेमेंटद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे फोटोसेशनही केले. विद्यार्थ्यांना आपल्या खात्यात बक्षिसाची रक्कम जमा झाली आहे, असा एसएमएसही पाठविण्यात आला. मात्र, रक्कम जमा झालीच नाही. त्यामुळे नागरवस्ती विभागात पालकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर राहुल जाधव यांनाही पालकांनी दूरध्वनी करून छळले आहे.महापौरांनाही विद्यार्थ्यांना रक्कम न मिळाल्याबाबत मनस्ताप सहन करावा लागत आहे. पालक आणि विद्यार्थी यांनी महापौरांकडे तक्रार केली आहे. महापौरांनी नागरवस्ती विभागाच्या सहायक आयुक्त स्मिता झगडे यांच्याकडे विचारणा केली. मनपाने बक्षीस वितरण कार्यक्रमातच ई पेमेंटद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले. मग ती रक्कम गेली कुठे, असा प्रश्न केला.>दहावीच्या विद्यार्थ्यांना ४.५ कोटींची बक्षिसेदहावीमधील ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या १३४० विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून दोन कोटी एक लाख रुपयांचे वितरण डिजिटल पेमेंटद्वारे करण्यात आले. इयत्ता १० वीमधील ८० ते ९० टक्क्यांपर्यंत गुण प्राप्त केलेल्या २६४१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार प्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून २ कोटी ६४ लाख १० हजारांची बक्षिसे देण्यात आली.>बारावी विद्यार्थ्यांना ६ कोटींची बक्षिसेमहापालिकेतर्फे ४९२३ विद्यार्थ्यांना सहा कोटींची बक्षिसे इयत्ता १२ वीमधील विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या ९४२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजारप्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून १ कोटी ४१ लाख ३० हजार रुपयांचे वितरण डिजिटल पेमेंटद्वारे करण्यात आले. याप्रमाणे एकूण ४९२३ लाभार्थी विद्यार्थ्यांना एकूण रक्कम रुपये ६ कोटी ६ लाख ४० हजार फक्त इतकी प्रोत्साहनपर बक्षिसे डिजिटल पेमेंटद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली.बक्षीस वितरण समारंभ झाल्यानंतर त्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असा दावा प्रशासनाने केला होता. पालकांच्या तक्रारी येत आहे. एसएमएस आला; परंतु रक्कम जमा झाली नाही. पैसे गेले कोठे, असा प्रश्न उपस्थित होतो. नागरवस्ती विभागाने पालकांच्या तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. दर वर्षी बक्षीस वितरणास वेळ होतो. निकालानंतर महिनाभराच्या आतच बक्षीस वितरण करायला हवे. - राहुल जाधव, महापौरडिजिटल पेमेंटद्वारे बक्षिसाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली आहे. डिजिटल पद्धतीने ही रक्कम विद्यार्थ्यांना दिली असली, तरी प्रत्यक्षात ही रक्कम जमा होण्यास आठवडाभराचा कालखंड जाणार आहे. त्यामुळे आठ दिवसात जर रक्कम जमा झाली नाही, तर नागरवस्ती विभागात संपर्क साधावा. पालकांच्या तक्रारींची दखल घेतली जाईल. नागरवस्ती विकास योजना विभागाकडून विशेष बाब म्हणून १००पैकी ९८ टक्के विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला.- स्मिता झगडे, सहायक आयुक्त