पिंपरी : कुदळवाडी, चिखली येथील भंगार दुकाने आणि गोदामास लागलेल्या भीषण आगीत महावितरणच्या वीजवाहिनी, खांब आणि फीडर पिलर जळाल्याने सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांची गैरसोय झाली. ही आगीची घटना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास लागली. या भीषण आगीत वीजयंत्रणा जळाली. २०० मीटर उच्च दाबाची २२ केव्ही वाहिनी, कंडक्टर, तीन वीज खांब व तीन फीडर पिलर, भूमिगत केबलचे दोन बॉक्स वितळले. त्यामुळे सहा रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडित झाला. बुधवारी सकाळी पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. दुकानातील १५ मीटर जळाले आहेत. या आगीत महावितरणचे दीड लाखांचे नुकसान झाले, अशी माहिती भोसरी विभागाचे सहायक अभियंता विक्रांत वरुडे यांनी दिली. आग अद्याप विझली नसल्याने त्या ठिकाणी अग्निशामक विभागाने एक बंब सज्ज ठेवला आहे. १८ बंबांच्या साहाय्याने तब्बल पाच तासांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक विभागाला यश आले. आग धुमसत असल्याने वीज तारा जोडणी करता आली नाही.(प्रतिनिधी)
वीज फिडर जळाल्याने वीजपुरवठा खंडित
By admin | Updated: February 25, 2016 03:58 IST