शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस ओसरल्याने पुराचा धोका टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 02:47 IST

शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पावसाचा अंदाज घेऊन धरणातील पाणी इंद्रायणीत

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पावसाचा अंदाज घेऊन धरणातील पाणी इंद्रायणीत सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मावळचे तहसीलदार रणजित देसाई यांनी शनिवारी दिला होता. आज पावसाचा जोर ओसरल्याने तूर्तास पुराचा धोका टळला असून, नदीकाठच्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.टाटा कंपनीच्या लोणावळा धरणातून भिवपुरी येथील वीजनिर्मिती केंद्राला पाणी सोडण्यात येते. मात्र, खोपोली व रायगड जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने बहुतांश नद्यांना पूर आला असल्याने लोणावळा धरणातील पाणी रायगड जिल्ह्यात न सोडता लोणावळ्यातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीत सोडण्यात येणार असल्याचे पत्र शनिवारी टाटा कंपनीने मावळ प्रशासनाला दिले आहे. या पत्राचा हवाला देत तहसीलदार देसाई यांनी पोलीस व प्रशासकीय यंत्रणांना पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यास नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे, असे सूचित केले होते. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिसराला पुराचा विळखा बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. सुदैवाने रविवारी जोर ओसरल्याने तूर्तास हा धोका टळला आहे. इंद्रायणी नदीपात्राला आलेला पूरदेखील ओसरल्याने पाण्याखाली गेलेले पूल पुन्हा वाहतुकीसाठी मोकळे झाले आहेत.आंदर, नाणे मावळात बत्ती गुलमुळे हालटाकवे बुद्रुक : आंदर मावळामध्ये गेल्या आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही गावांत बत्ती गुलमुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत.आंदर मावळाला वीजपुरवठा करणारे सब स्टेशन बेलिज येथे असून, येथूनच खांड ते सावळा या भागातील गावाना वीजपुरवठा केला जातो. परंतु वीजप्रवाह कमी-जास्त होत असल्याने ठिकठिकाणचे डी. पी. स्वीच ड्रिप होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. तक्रार करूनही महावितरणचे कर्र्मचारी दखल घेत नसल्याचे नागरिक सांगत आहेत.चार दिवस माऊ, वडेश्वर, नागाथली, शिंदेवाडी, वहानगाव, कुसवली, डाहुली, कुसूर, खांड, सावळा, माळेगाव, पारिठेवाडी, अनसुट, किवळे, कशाळ, भोयरे आदी गावांत वीजपुरवठा खंडित आहे. संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, वेगवेगळी कारणे सांगून दोन तासांत वीजपुरवठा सुरू होईल, अशी उत्तरे दिली जातात. वीज गायब असल्याने स्थानिकांना भर पावसात पाण्यासाठी फिरावे लागत आहे. पीठ गिरण्या बंद असल्याने २० कि.मी. दूर जाऊन दळण आणावे लागत आहे. मोबाइल चार्ज नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ंकामशेत परिसरात आठवड्यानंतर झाले सूर्यदर्शनकामशेत : गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मावळातील सर्व ठिकाणी पाणी झाले होते. त्यात गुरुवारपासून पावसाचा जोर वाढून इंद्रायणी नदीला पूर आल्याने शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी रात्रीपर्यंत नाणे रस्ता, सांगिसे पूल पाण्याखाली गेले होते. ठिकठिकाणी पाणी साचून रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. त्यामुळे नाणे मावळातील २० ते २५ गावांचा व सांगिसे पुलापलीकडील आठ गावांचा संपर्क तुटला होता. पण रविवारी पावसाने उघडीप दिल्याने पाणी ओसरल्याने जनजीवन सुरळीत झाले आहे. नागरिकांची ये-जा सुरू झाली.रविवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन सुरळीत झाले असून, अडकून पडलेले पर्यटक व नागरिक सुखरूप त्यांच्या घरी परतले आहेत. एक आठवड्यानंतर रविवारी प्रथमच सूर्यनारायणाने काही काळ दर्शन दिले. मावळ तालुक्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याने तसेच लोणावळा येथील धरणे, वडिवळे धरण पूर्ण भरल्याने मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदीला पूर आला होता. यात सांगिसे पूल, कामशेतचा जुना पूल, शिवाय नाणे रस्ता पाण्याखाली गेल्याने पश्चिम भागातील नदीच्या पलीकडील गावांचा संपर्क तुटला होता. शनिवारचा संपूर्ण दिवस या भागांमध्ये पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पर्यटक ठिकठिकाणी अडकून पडले होते. नोकरदार, दूध व्यावसायिक व विद्यार्थी कामशेत येथे अडकले होते.