शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

रस्ता अर्धवट बुजविल्याने धोका, वाहनचालकांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 03:54 IST

वाल्हेकरवाडी ते रावेत या मार्गावर महावितरण कंपनीतर्फे बिजलीनगर ते किवळे दरम्यान टाकण्यात येणाऱ्या केबलसाठी मोठी चर खोदल्याने रस्ता अरुंद झाला आहे. ठेकेदाराने केबल टाकल्यानंतर रस्ता व्यवस्थित न बुजविल्यामुळे येथे खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे.

रावेत - वाल्हेकरवाडी ते रावेत या मार्गावर महावितरण कंपनीतर्फे बिजलीनगर ते किवळे दरम्यान टाकण्यात येणाऱ्या केबलसाठी मोठी चर खोदल्याने रस्ता अरुंद झाला आहे. ठेकेदाराने केबल टाकल्यानंतर रस्ता व्यवस्थित न बुजविल्यामुळे येथे खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे.रस्त्याच्या दुसºया बाजूला उघड्या अवस्थेतील नैसर्गिक नाला आहे. अर्धवट अवस्थेत बुजविण्यात आलेली चर आणि नाल्यामुळे रस्ता केवळ आठ ते दहा फूट राहिल्याने वाहने चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी नवीन वाहनचालकांना नाला लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे नाल्यात वाहने जाऊन अपघात होत आहेत. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत बिजलीनगर येथील मुख्य विद्युत केंद्रातून किवळे येथे राबविण्यात येत असलेल्या योजनेसाठी वाल्हेकरवाडी येथील संत नामदेव चौक ते रावेत दरम्यान मोठी चर रस्त्याच्या कडेला खोदली होती. काम पूर्ण झाल्यानंतर ही चर व्यवस्थित बुजविणे अपेक्षित असताना ती अर्धवट अवस्थेत बुजवली आहे. त्याचा राडारोडा रस्त्यावर पडल्याने दुचाकी वाहनचालक घसरून पडून किरकोळ स्वरूपाचे अपघात झाले आहेत. मुळातच हा रस्ता अरुंद असून, येथून वाहनांची वाहतूक वर्दळ असते. या मार्गाचा वापर अनेक वाहने द्रुतगती मार्ग, रावेत, डांगे चौक आदी ठिकाणी जा-ये करण्यासाठी करीत असतात. ठेकेदाराने तत्काळ रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.वाल्हेकरवाडी-रावेत मार्गावरील हा रस्ता अत्यंत धोकादायक असून रात्रीच्या वेळी अनेकदा या मार्गावरील पथदिवे बंद असतात. त्यातच रस्ता अरुंद आणि धोकादायक वळण असल्याने वाहनचालकांना पुढील वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे येथे अनेकवेळा अपघात घडले आहेत. काही वाहने नाल्यात कोसळली आहेत. त्यामध्ये काहींना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे मुळातच अरुंद असणारा रस्ता या कामामुळे अधिक अरुंद झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.महापालिकेच्या विकासकामाला विरोध नाही. परंतु तो सुनियोजित आणि योग्य पद्धतीने असावा. काही महिन्यांपूर्वी डागडुजी करून तयार करण्यात आलेला रस्ता आणि पदपथ लागलीच उखडल्याने नागरिकांना त्रास होत आहे. रस्ता आणि पदपथ पूर्ववत करण्यासाठी नागरिकांच्या कररूपी पैशांचा वापर न करता महापालिकेने महावितरण कंपनीच्या ठेकेदाराकडून रस्ता आणि पदपथ पूर्ववत करावा- श्रीधर वाल्हेकर,माजी सभापती, शिक्षण मंडळढिसाळ कारभारकाही महिन्यांपूर्वी निगडी ते डांगे चौक दरम्यान टाकण्यात येणाºया जलवाहिनीकरिता रस्ता उखडण्यात आला होता. या कामाच्या पूर्णत्वास काही महिने उलटले होते. त्यानंतर खोदलेला रस्ता व त्याकरिता काढण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक नव्याने बसविण्यात आले. काही दिवसांतच रस्ता आणि पेव्हिंग ब्लॉग पुन्हा उखडून टाकले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या