शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

ध्येयवेड्या व्यक्तींमुळे उद्योगनगरीला ओळख

By admin | Updated: December 7, 2015 00:01 IST

‘मिनी भारत’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरात राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेले लोक गुण्यागोविंदाने राहतात

पिंपरी : ‘मिनी भारत’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरात राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेले लोक गुण्यागोविंदाने राहतात. सामाजिक बांधिलकीची भावना ते जोपासतात. ध्येयवेड्या व्यक्तींमुळे या शहराला स्वतंत्र ओळख मिळाली आहे. अशी ध्येयवेडी माणसे असल्याने कामे करण्यात अडचणी येत नाहीत. विविध क्षेत्रांत लीलया संचार करणाऱ्या व्यक्तींचा हा गौरव आहे, असे गौरवोद्गार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.पिंपरी-चिंचवड सार्वजनिक विश्वस्त प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांना पुणे जिल्हा सहकार भूषण, प्रसिद्ध उद्योजक राजेशकुमार साकला यांना पिंपरी-चिंचवड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात शनिवारी हा गौरवसोहळा झाला. या कार्यक्रमास महापौर शकुंतला धराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पाटील, मुख्य सल्लागार भाऊसाहेब भोईर, स्थायी समिती सभापती अतूल शितोळे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, श्रीमंत दगडुशेट हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे आदी उपस्थित होते. पुरस्कार वितरण समारंभावेळी पवार म्हणाले, ‘‘समाजामध्ये चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक केले, तर त्यांना समाधान मिळते. या शहराने नेहमीच सर्वांचे आदरातिथ्य केले आहे. शहराला सांस्कृतिक दर्जा मिळावा, साहित्य व कला क्षेत्रात स्थानिकांना वाव मिळावा, यासाठी ते नेहमी प्रयत्न करीत आहेत.’’पुरस्काराला उत्तर देताना गोयल म्हणाले, ‘‘कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या व्यक्तीच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना अभिमान वाटतो. पुरस्कार मिळावा म्हणून कधीच काम केले नाही. जे काम केले, ते मनापासून केले. सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, शैक्षणिक या क्षेत्रांत कारकीर्द घडवत राहिलो. व्यवसायात मिळविलेल्या पैशांतून समाजासाठी काही तरी करायचे, हे माझे ध्येय होते. त्याची दखल घेतली गेली. पुरस्काररूपाने त्याची पावती मिळाली आहे.’’ ‘पिंपरी-चिंचवड ही माझी कार्यभूमी आहे. या शहराने मला सर्व काही भरभरून दिले आहे. या शहराच्या विकासात आपले योगदान राहावे, या उद्देशाने यापुढेही काम करत राहीन,’ अशा भावना साकला यांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रल्हाद कोकरे (प्रशासकीय), ज्ञानेश्वर मुरकुटे (धार्मिक), राहुल भोईर (सामाजिक), रवी महाजन (कामगार संघटन), सुभाष मालुसरे (सामाजिक), अविनाश कदम (क्रीडा) यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या गीतांच्या कार्यक्रमाने समारोप झाला. (प्रतिनिधी)