शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

दुष्काळग्रस्तांना मदत करून घडवले माणुसकीचे दर्शन

By admin | Updated: October 15, 2015 00:36 IST

राज्यातील विविध जिल्ह्यांतून येथे शिकण्यासाठी आलेल्या, वाल्हेकरवाडी परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुमारे दीड लाख रुपये गोळा केले.

पिंपरी : राज्यातील विविध जिल्ह्यांतून येथे शिकण्यासाठी आलेल्या, वाल्हेकरवाडी परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुमारे दीड लाख रुपये गोळा केले. ही रक्कम त्यांनी नाम फाउंडेशनला दिली आहे.वाल्हेकरवाडी परिसरात राहणारे हे विद्यार्थी प्राधिकरणातील एका क्लासच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. बहुतांश विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. दुष्काळाच्या झळा त्यांनी अनुभवल्या असल्याने या शेतकरी बांधवांसाठी काही तरी केले पाहिजे या तळमळीतून सर्वांनी एकत्र येत निधी जमा करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी निगडी-प्राधिकरण परिसरातील विविध महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांना दुष्काळाच्या विदारक परिस्थितीची जाणीव करून दिली आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन केले. सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, वाल्हेकरवाडी परिसरातून दुष्काळग्रस्तांसाठी मदतफेरी काढली. सर्वसामान्य लोक, व्यापारी, फेरीवाले, विके्रते, ग्राहक अशा सर्वांच्या मदतीतून एक लाख ३६ हजार रुपये जमा झाले. विद्यार्थ्यांनी ते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’कडे तीन टप्प्यांत जमा केले. यातील अनेक विद्यार्थी कृषी पदवीधर असून, दुष्काळ आणि शेतीसंदर्भात आणखी काही वेगळ्या प्रकारे मदत करता येईल का, या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. (वा. प्र.)