शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
4
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
5
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
7
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
8
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
10
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
12
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
13
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
15
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
16
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
18
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
19
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
20
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

पिंपरीत आवक घटल्याने फळभाज्या महाग

By admin | Updated: July 4, 2017 03:49 IST

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून उपवासाच्या पदार्थाला मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पिंपरी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून उपवासाच्या पदार्थाला मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पिंपरी बाजारात फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भेंडी, भुईमुगाच्या शेंगा, बटाटे आणि रताळे यांच्या भावात वाढ झाली आहे.मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. मात्र, जुलै सुरू झाल्यानंतरही पावसाने ओढ दिली आहे. यामुळे उत्पादन कमी झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. उत्पादन कमी असल्याने फळभाज्यांची आवकेत घट झाल्याचे विक्रते व व्यापा-यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गावरान रताळी चवीला गोड आणि पौष्टिक असल्याने ग्राहकांची पसंती गावरान रताळ्यास जास्त आहे. गावरान रताळे ३५ ते ४० रुपये प्रति किलो, तर सटाणा रताळे ३० रुपये प्रति किलो दराने मिळत आहे. भुईमुगाच्या शेंगांची ४० ते ५० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. पिंपरी मंडईत फळांची आवाक चांगली आहे. त्यामुळे केळी, सरफरचंद, सीताफळ, मोसंबी, संत्री, पेरू व डाळिंबाची आवक पुरेशी आहे. त्यामुळे राज्यातील व परराज्यातून येणा-या फळांचे भाव स्थीर आहेत, असे व्यापा-यांनी सांगितले.हिरवी मिरची तेजीतपिंपरीतील मुख्य भाजी मंडईत काल मिरचीचे भावही तेजीत होते. आवक कमी झाल्याने मिरची प्रतिकिलो ८० रुपये होती. फळभाज्यांमध्ये भेंडी ४० रुपये, गवार ४० रुपये, टोमॅटो २० रुपये, तर बटाटा १० रुपये किलो दराने होता. फळामध्ये केळी ४० रुपये डझन, तर पपई ३० रुपये किलोने विक्री केली जात होती.मागील वर्षी एकादशीच्या काळात रताळ्याची आवक जास्त होती. त्यामुळे २० ते २५ रुपये किलोने विक्री केली जात होती. मात्र, यंदा उत्पादनच कमी झाल्याने मार्केटला मालच नाही. त्यामुळे आपोआप रताळ्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे.- शांताबाई चव्हाण, भाजी विक्रेत्या