शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

पिंपरीत आवक घटल्याने फळभाज्या महाग

By admin | Updated: July 4, 2017 03:49 IST

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून उपवासाच्या पदार्थाला मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पिंपरी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून उपवासाच्या पदार्थाला मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पिंपरी बाजारात फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भेंडी, भुईमुगाच्या शेंगा, बटाटे आणि रताळे यांच्या भावात वाढ झाली आहे.मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. मात्र, जुलै सुरू झाल्यानंतरही पावसाने ओढ दिली आहे. यामुळे उत्पादन कमी झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. उत्पादन कमी असल्याने फळभाज्यांची आवकेत घट झाल्याचे विक्रते व व्यापा-यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गावरान रताळी चवीला गोड आणि पौष्टिक असल्याने ग्राहकांची पसंती गावरान रताळ्यास जास्त आहे. गावरान रताळे ३५ ते ४० रुपये प्रति किलो, तर सटाणा रताळे ३० रुपये प्रति किलो दराने मिळत आहे. भुईमुगाच्या शेंगांची ४० ते ५० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. पिंपरी मंडईत फळांची आवाक चांगली आहे. त्यामुळे केळी, सरफरचंद, सीताफळ, मोसंबी, संत्री, पेरू व डाळिंबाची आवक पुरेशी आहे. त्यामुळे राज्यातील व परराज्यातून येणा-या फळांचे भाव स्थीर आहेत, असे व्यापा-यांनी सांगितले.हिरवी मिरची तेजीतपिंपरीतील मुख्य भाजी मंडईत काल मिरचीचे भावही तेजीत होते. आवक कमी झाल्याने मिरची प्रतिकिलो ८० रुपये होती. फळभाज्यांमध्ये भेंडी ४० रुपये, गवार ४० रुपये, टोमॅटो २० रुपये, तर बटाटा १० रुपये किलो दराने होता. फळामध्ये केळी ४० रुपये डझन, तर पपई ३० रुपये किलोने विक्री केली जात होती.मागील वर्षी एकादशीच्या काळात रताळ्याची आवक जास्त होती. त्यामुळे २० ते २५ रुपये किलोने विक्री केली जात होती. मात्र, यंदा उत्पादनच कमी झाल्याने मार्केटला मालच नाही. त्यामुळे आपोआप रताळ्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे.- शांताबाई चव्हाण, भाजी विक्रेत्या