शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

पवनेतील साठा कमी झाल्याने टप्प्याटप्प्याने होणार पाणीकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 01:55 IST

औद्योगिकनगरीची तहान भागविणाऱ्या पवना धरणात पाणीसाठा कमी झाला आहे.

पिंपरी : औद्योगिकनगरीची तहान भागविणाऱ्या पवना धरणात पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे आत्तापासूनच पाणीकपात करणे आवश्यक आहे. अन्यथा उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल. धरणातील साठा आणि शहराची गरज पाहता आतापासूनच टप्प्याटप्प्याने पाणीकपात गरजेची आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.शहराला पाणी पुरविणाºया पवना धरणात ६० टक्के पाणीसाठा असून, तो गतवर्षीपेक्षा १० टक्क्यांनी कमी आहे. तो १५ जूनपर्यंतच पुरू शकणार आहे. धरणातून दिवसाला ४८० ऐवजी ४४० एमएलडीच पाणी उचलावे, अशी सूचना पाटबंधारे विभागाने केली आहे.>१५ जूनपर्यंत पुरेल इतकाच साठाधरणात १० टक्के पाणीसाठा कमी आहे. तो १५ जूनपर्यंत पुरेल एवढाच आहे. चार आॅक्टोबरला कालवा समितीच्या झालेल्या बैठकीत महापालिकेला पाणीकपात करण्याचे निर्देश दिले होते. आतापासूनच पाणीकपात करणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात जास्त पाणीकपात करुन पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे, असे पवना धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गडवाल यांनी सांगितले.>पवना धरणात पाणीसाठा सीमित आहे. त्यामुळे आतापासूनच टप्प्याटप्प्याने पाणीकपात करणे आवश्यक आहे. अन्यथा उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होईल. धरणातील साठा आणि एकंदर गरज पाहता आतापासूनच पाणीकपात करावी लागणार आहे अन्यथा भविष्यात जास्त पाणीकपात करावी लागेल. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी महापौर राहुल जाधव यांना पत्र दिले आहे. गटनेत्यांची बैठक घेऊन लवकरच निर्णय घेतला जाईल.श्रावण हर्डीकर, आयुक्त