शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

कामशेत-पवनानगर रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: July 15, 2016 00:13 IST

पवनानगर-कामशेत या पवन मावळामधील ४० गावांना जोडणाऱ्या सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

पवनानगर : पवनानगर-कामशेत या पवन मावळामधील ४० गावांना जोडणाऱ्या सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याला साइटपट्टीदेखील नाही. यात या आठवड्यात झालेल्या पावसात या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. प्रवासासाठी दुप्पट वेळ लागत आहे. खड्ड्यांमुळे अनेक छोटे अपघात होत आहेत. कामगारांना कामावर जायला आणि विद्यार्थ्यांना शाळेत जायला उशीर होतो. रस्त्याची अवस्था दयनीय होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. या रस्त्याचे खडे ताबडतोब बुजवावे व रस्त्याच्या कडेला पाणी जायला जागा करून रस्त्याला साइडपट्टी कराव्यात, अशी मागणी अ‍ॅड. भरत ठाकर प्रतिष्ठानने केली आहे. प्रतिष्ठानचे किसनराव खैरे, संदीप भुतडा, विश्वनाथ जाधव, गणेश ठाकर, शिवाजी सुतार, नवनाथ ठाकर, मनोहर तुपे, संजय केदारी, सचिन ठाकर, बबन कालेकर, संतोष ठुले यांनी केली आहे. उर्से : पवन मावळातील सोमाटणे-परंदवडी या मुख्य रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. पवन मावळातील दहा-बारा गावांना जोडणारा मुख्य रस्ता म्हणून परंदवडी-सोमाटणे हा रस्ता ओळखला जातो. गेल्या दहा वर्षांत या दोन्ही गावांबरोबरच इतर गावांचाही चांगला विकास झाला आहे. गावात मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत.परिसरात अनेक शिक्षण संस्था कार्यरत झाल्या आहेत. यामुळे मुख्य रस्त्यांवरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा चालू असते. मात्र, खराब व खड्डेमय रस्त्यांच्या अवस्थेमुळे वाहनचालकांना याचा खूप त्रास होत आहे. वाहनांचा वेगही खूप मंदावलेला असतो. सध्या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. नुकताच उर्से रस्त्याचे काम झाल्याने या रस्त्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र, याला लागूनच हा रस्ता असल्याने हाही रस्ता होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. पण, ती फोल ठरल्याने रस्त्याचे का डांबरीकरण करण्यात आले नाही, असा प्रश्न येथील नागरिकांनी केला आहे. रिक्षाचालकांना तर हे खड्डे डोकेदुखी वाढवत आहे. प्रवाशांनादेखील याचा त्रास सहन होत असल्याने अनेक जण या खासगी वाहनांना टाळत आहेत. (वार्ताहर)