शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कामशेत-पवनानगर रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: July 15, 2016 00:13 IST

पवनानगर-कामशेत या पवन मावळामधील ४० गावांना जोडणाऱ्या सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

पवनानगर : पवनानगर-कामशेत या पवन मावळामधील ४० गावांना जोडणाऱ्या सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याला साइटपट्टीदेखील नाही. यात या आठवड्यात झालेल्या पावसात या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. प्रवासासाठी दुप्पट वेळ लागत आहे. खड्ड्यांमुळे अनेक छोटे अपघात होत आहेत. कामगारांना कामावर जायला आणि विद्यार्थ्यांना शाळेत जायला उशीर होतो. रस्त्याची अवस्था दयनीय होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. या रस्त्याचे खडे ताबडतोब बुजवावे व रस्त्याच्या कडेला पाणी जायला जागा करून रस्त्याला साइडपट्टी कराव्यात, अशी मागणी अ‍ॅड. भरत ठाकर प्रतिष्ठानने केली आहे. प्रतिष्ठानचे किसनराव खैरे, संदीप भुतडा, विश्वनाथ जाधव, गणेश ठाकर, शिवाजी सुतार, नवनाथ ठाकर, मनोहर तुपे, संजय केदारी, सचिन ठाकर, बबन कालेकर, संतोष ठुले यांनी केली आहे. उर्से : पवन मावळातील सोमाटणे-परंदवडी या मुख्य रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. पवन मावळातील दहा-बारा गावांना जोडणारा मुख्य रस्ता म्हणून परंदवडी-सोमाटणे हा रस्ता ओळखला जातो. गेल्या दहा वर्षांत या दोन्ही गावांबरोबरच इतर गावांचाही चांगला विकास झाला आहे. गावात मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत.परिसरात अनेक शिक्षण संस्था कार्यरत झाल्या आहेत. यामुळे मुख्य रस्त्यांवरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा चालू असते. मात्र, खराब व खड्डेमय रस्त्यांच्या अवस्थेमुळे वाहनचालकांना याचा खूप त्रास होत आहे. वाहनांचा वेगही खूप मंदावलेला असतो. सध्या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. नुकताच उर्से रस्त्याचे काम झाल्याने या रस्त्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र, याला लागूनच हा रस्ता असल्याने हाही रस्ता होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. पण, ती फोल ठरल्याने रस्त्याचे का डांबरीकरण करण्यात आले नाही, असा प्रश्न येथील नागरिकांनी केला आहे. रिक्षाचालकांना तर हे खड्डे डोकेदुखी वाढवत आहे. प्रवाशांनादेखील याचा त्रास सहन होत असल्याने अनेक जण या खासगी वाहनांना टाळत आहेत. (वार्ताहर)