शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा १७ जणांना चावा; २२ दिवसात १०२ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 15:07 IST

पिसाळलेल्या कुत्र्याने आज चिंववडगावात धुमाकूळ घालत सतरा जणांचा चावा घेतल्याची घटना घडली. या मुळे चिंचवडमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देपिसाळलेल्या कुत्र्याने घातला धुमाकूळ, नागरिकांमध्ये भितीचे वातावरणजानेवारी महिन्यात चिंचवड परिसरातील १०२ नागरिकांना कुत्र्याने चावल्याची नोंद

चिंचवड : पिसाळलेल्या कुत्र्याने आज चिंववडगावात धुमाकूळ घालत सतरा जणांचा चावा घेतल्याची घटना घडली. या मुळे चिंचवडमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.रात्री उशिरापर्यंत गावातील कार्यकर्ते हातात काठ्या घेऊन या कुत्र्याचा शोध घेत होते. सायंकाळी पाच वाजल्यापासून चिंचवडमधील तानाजीनगर, केशवनगर, काकडेपार्क, गांधीपेठ, धनेश्वर मंदिर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. रस्त्यात दिसणाऱ्या नागरिकांना चावा घेत जखमी केले. यात आठ लहान मुलांचा समावेश आहे. यातील अनेकांना उपचारासाठी पालिकेच्या तालेरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.जानेवारी महिन्यात चिंचवड परिसरातील १०२ नागरिकांना कुत्र्याने चावल्याची नोंद पालिकेच्या तालेरा रुग्णालयात झाली आहे.चिंववड गावात पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांना चावा घेत जखमी केले असल्याची बातमी परिसरात पसरली. तानाजीनगर, केशवनगर भागात या कुत्र्याने हल्ला करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिक सैरावैरा पळत होते. इतर कुत्री यांच्या मागे भुंकत असल्याने चवताळलेल्या या कुत्र्याने दिसेल त्याच्या अंगावर धाव घेतली.रात्री उशिरापर्यंत या कुत्र्याच्या हल्ल्यात १४ जण जखमी झाले. रात्री नऊ वाजता धनेश्वर मंदीर परिसरात या कुत्र्याने ३ जणांवर हल्ला केला. या वेळी परिसरातील अनेक कार्यकर्ते हातात काठ्या घेऊन या कुत्र्याचा शोध घेत होते. मात्र रात्री उशिरापर्यंत या कुत्र्याचा शोध लागला नाही. चिंचवडमधील भटक्या कुत्र्यांचा वावर सध्या वाढला आहे. अनेक रस्त्यावर कुत्री भटकत असल्याचे वास्तव सध्या दिसत आहे. या पूर्वीही एकाच दिवसात २१ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने जखमी केल्याची घटना घडली आहे. मात्र पालिका प्रशासनाला या बाबत गांभीर्य नसल्याने उपाययोजना केल्या जात नाहीत. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा काम करत नसल्याने अशा कुत्र्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांवर होणारे कुत्र्यांचे हल्ले लक्षात घेऊन योग्य उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे.भटक्या कुत्र्यांबाबत योग्य नियोजन होत नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड