शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

काही झाले तरी जमीन विकू नका

By admin | Updated: May 30, 2017 02:27 IST

काही झाले तरी आपली शेती विकू नका. शेतात कुंपण दिसले की माझा जीव खालीवर होतो, असे प्रतिपादन आमदार संजय भेगडे

लोकमत न्यूज नेटवर्कशिरगाव : काही झाले तरी आपली शेती विकू नका. शेतात कुंपण दिसले की माझा जीव खालीवर होतो, असे प्रतिपादन आमदार संजय भेगडे यांनी दारुंब्रे येथे केले. दारुंब्रे येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार भेगडे बोलत होते. त्यांनी शेतकऱ्यांकडून शेतीविषयक अडचणी समजून घेऊन त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या योजना समजावून सांगितल्या. गावातील शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाढा आमदारासमोर वाचला. भेगडे म्हणाले की, जर गटागटाने शेती केली तर मोठ्या योजना राबविणे सोपे जाते. दूध संघासारखे प्रकल्प उभा करता येतात, त्यामुळे गट करून शेती करा. पण, कोणत्याही परिस्थितीत शेती विकू नका. कारण आपल्या येणाऱ्या पिढ्या या शेतीवरच अवलंबून असणार आहेत.या संवाद सभेनंतर या सर्व शेतकऱ्यांसोबत उपस्थितांनी चटणी भाकरीचा आस्वाद घेतला. या वेळी सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, पंचायत समिती सदस्य निकिता घोटकुले, माजी नगरसेवक गणेश भेगडे, मावळ भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, युवा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, किरण राक्षे, अनंता आंद्रे, भाऊसाहेब ढोरे, अनंता कुडे, अजित आगळे, बाबूलाल गराडे, शिवाजी लोहर, सांगवडेचे श्यामराव राक्षे, शेतकरी मुरलीधर पानमंद, अशोक थोरवे, सूर्यकांत सोरटे, अंकुश सोरटे, हिरामण सोरटे आदी उपस्थित होते.शेततळे, विमा योजना, गट शेती, गटशेतीसाठी बांधावर खत, बी-बियाणे, भूमिहीन शेतकऱ्यांना पेन्शन योजना, सिंचनासाठी अनुदान, महाविद्यालयीन शिक्षण घेण्याऱ्या शेतकरीपुत्रांसाठीच्या योजना आदींची माहिती सांगून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार भेगडे यांनी दिले.एकच रिंगरोड व्हावापवन मावळ भागातून महाराष्ट्र शासन व पीएमआरडीचा स्वतंत्र दोन रिंग रोडचा प्रस्ताव आहे. मावळातील कसदार जमिनीमधून रिंगरोड जाणार असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसणार असल्याने एकच रिंग रोड करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्यात, अशी मागणी आमदार भेगडे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली. याचा पाठपुरावा मी स्वत: करत असून तुम्ही एकी तोडू नका, असा सल्ला भेगडे यांनी दिला. कासारसाई धरणातील पाणी याच धरणाच्या अंतर्गत येणाऱ्या शेतजमिनींना मिळावे. याचा वापर दुसऱ्या कामासाठी होऊ नये यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.