शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
5
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
6
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
7
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
8
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
9
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
10
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
11
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
12
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
13
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
14
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
15
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
16
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
17
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
18
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
19
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
20
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर

काही झाले तरी जमीन विकू नका

By admin | Updated: May 30, 2017 02:27 IST

काही झाले तरी आपली शेती विकू नका. शेतात कुंपण दिसले की माझा जीव खालीवर होतो, असे प्रतिपादन आमदार संजय भेगडे

लोकमत न्यूज नेटवर्कशिरगाव : काही झाले तरी आपली शेती विकू नका. शेतात कुंपण दिसले की माझा जीव खालीवर होतो, असे प्रतिपादन आमदार संजय भेगडे यांनी दारुंब्रे येथे केले. दारुंब्रे येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार भेगडे बोलत होते. त्यांनी शेतकऱ्यांकडून शेतीविषयक अडचणी समजून घेऊन त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या योजना समजावून सांगितल्या. गावातील शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाढा आमदारासमोर वाचला. भेगडे म्हणाले की, जर गटागटाने शेती केली तर मोठ्या योजना राबविणे सोपे जाते. दूध संघासारखे प्रकल्प उभा करता येतात, त्यामुळे गट करून शेती करा. पण, कोणत्याही परिस्थितीत शेती विकू नका. कारण आपल्या येणाऱ्या पिढ्या या शेतीवरच अवलंबून असणार आहेत.या संवाद सभेनंतर या सर्व शेतकऱ्यांसोबत उपस्थितांनी चटणी भाकरीचा आस्वाद घेतला. या वेळी सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, पंचायत समिती सदस्य निकिता घोटकुले, माजी नगरसेवक गणेश भेगडे, मावळ भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, युवा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, किरण राक्षे, अनंता आंद्रे, भाऊसाहेब ढोरे, अनंता कुडे, अजित आगळे, बाबूलाल गराडे, शिवाजी लोहर, सांगवडेचे श्यामराव राक्षे, शेतकरी मुरलीधर पानमंद, अशोक थोरवे, सूर्यकांत सोरटे, अंकुश सोरटे, हिरामण सोरटे आदी उपस्थित होते.शेततळे, विमा योजना, गट शेती, गटशेतीसाठी बांधावर खत, बी-बियाणे, भूमिहीन शेतकऱ्यांना पेन्शन योजना, सिंचनासाठी अनुदान, महाविद्यालयीन शिक्षण घेण्याऱ्या शेतकरीपुत्रांसाठीच्या योजना आदींची माहिती सांगून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार भेगडे यांनी दिले.एकच रिंगरोड व्हावापवन मावळ भागातून महाराष्ट्र शासन व पीएमआरडीचा स्वतंत्र दोन रिंग रोडचा प्रस्ताव आहे. मावळातील कसदार जमिनीमधून रिंगरोड जाणार असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसणार असल्याने एकच रिंग रोड करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्यात, अशी मागणी आमदार भेगडे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली. याचा पाठपुरावा मी स्वत: करत असून तुम्ही एकी तोडू नका, असा सल्ला भेगडे यांनी दिला. कासारसाई धरणातील पाणी याच धरणाच्या अंतर्गत येणाऱ्या शेतजमिनींना मिळावे. याचा वापर दुसऱ्या कामासाठी होऊ नये यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.