शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

काही झाले तरी जमीन विकू नका

By admin | Updated: May 30, 2017 02:27 IST

काही झाले तरी आपली शेती विकू नका. शेतात कुंपण दिसले की माझा जीव खालीवर होतो, असे प्रतिपादन आमदार संजय भेगडे

लोकमत न्यूज नेटवर्कशिरगाव : काही झाले तरी आपली शेती विकू नका. शेतात कुंपण दिसले की माझा जीव खालीवर होतो, असे प्रतिपादन आमदार संजय भेगडे यांनी दारुंब्रे येथे केले. दारुंब्रे येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार भेगडे बोलत होते. त्यांनी शेतकऱ्यांकडून शेतीविषयक अडचणी समजून घेऊन त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या योजना समजावून सांगितल्या. गावातील शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाढा आमदारासमोर वाचला. भेगडे म्हणाले की, जर गटागटाने शेती केली तर मोठ्या योजना राबविणे सोपे जाते. दूध संघासारखे प्रकल्प उभा करता येतात, त्यामुळे गट करून शेती करा. पण, कोणत्याही परिस्थितीत शेती विकू नका. कारण आपल्या येणाऱ्या पिढ्या या शेतीवरच अवलंबून असणार आहेत.या संवाद सभेनंतर या सर्व शेतकऱ्यांसोबत उपस्थितांनी चटणी भाकरीचा आस्वाद घेतला. या वेळी सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, पंचायत समिती सदस्य निकिता घोटकुले, माजी नगरसेवक गणेश भेगडे, मावळ भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, युवा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, किरण राक्षे, अनंता आंद्रे, भाऊसाहेब ढोरे, अनंता कुडे, अजित आगळे, बाबूलाल गराडे, शिवाजी लोहर, सांगवडेचे श्यामराव राक्षे, शेतकरी मुरलीधर पानमंद, अशोक थोरवे, सूर्यकांत सोरटे, अंकुश सोरटे, हिरामण सोरटे आदी उपस्थित होते.शेततळे, विमा योजना, गट शेती, गटशेतीसाठी बांधावर खत, बी-बियाणे, भूमिहीन शेतकऱ्यांना पेन्शन योजना, सिंचनासाठी अनुदान, महाविद्यालयीन शिक्षण घेण्याऱ्या शेतकरीपुत्रांसाठीच्या योजना आदींची माहिती सांगून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार भेगडे यांनी दिले.एकच रिंगरोड व्हावापवन मावळ भागातून महाराष्ट्र शासन व पीएमआरडीचा स्वतंत्र दोन रिंग रोडचा प्रस्ताव आहे. मावळातील कसदार जमिनीमधून रिंगरोड जाणार असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसणार असल्याने एकच रिंग रोड करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्यात, अशी मागणी आमदार भेगडे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली. याचा पाठपुरावा मी स्वत: करत असून तुम्ही एकी तोडू नका, असा सल्ला भेगडे यांनी दिला. कासारसाई धरणातील पाणी याच धरणाच्या अंतर्गत येणाऱ्या शेतजमिनींना मिळावे. याचा वापर दुसऱ्या कामासाठी होऊ नये यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.