शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

काही झाले तरी जमीन विकू नका

By admin | Updated: May 30, 2017 02:27 IST

काही झाले तरी आपली शेती विकू नका. शेतात कुंपण दिसले की माझा जीव खालीवर होतो, असे प्रतिपादन आमदार संजय भेगडे

लोकमत न्यूज नेटवर्कशिरगाव : काही झाले तरी आपली शेती विकू नका. शेतात कुंपण दिसले की माझा जीव खालीवर होतो, असे प्रतिपादन आमदार संजय भेगडे यांनी दारुंब्रे येथे केले. दारुंब्रे येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार भेगडे बोलत होते. त्यांनी शेतकऱ्यांकडून शेतीविषयक अडचणी समजून घेऊन त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या योजना समजावून सांगितल्या. गावातील शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाढा आमदारासमोर वाचला. भेगडे म्हणाले की, जर गटागटाने शेती केली तर मोठ्या योजना राबविणे सोपे जाते. दूध संघासारखे प्रकल्प उभा करता येतात, त्यामुळे गट करून शेती करा. पण, कोणत्याही परिस्थितीत शेती विकू नका. कारण आपल्या येणाऱ्या पिढ्या या शेतीवरच अवलंबून असणार आहेत.या संवाद सभेनंतर या सर्व शेतकऱ्यांसोबत उपस्थितांनी चटणी भाकरीचा आस्वाद घेतला. या वेळी सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, पंचायत समिती सदस्य निकिता घोटकुले, माजी नगरसेवक गणेश भेगडे, मावळ भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, युवा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, किरण राक्षे, अनंता आंद्रे, भाऊसाहेब ढोरे, अनंता कुडे, अजित आगळे, बाबूलाल गराडे, शिवाजी लोहर, सांगवडेचे श्यामराव राक्षे, शेतकरी मुरलीधर पानमंद, अशोक थोरवे, सूर्यकांत सोरटे, अंकुश सोरटे, हिरामण सोरटे आदी उपस्थित होते.शेततळे, विमा योजना, गट शेती, गटशेतीसाठी बांधावर खत, बी-बियाणे, भूमिहीन शेतकऱ्यांना पेन्शन योजना, सिंचनासाठी अनुदान, महाविद्यालयीन शिक्षण घेण्याऱ्या शेतकरीपुत्रांसाठीच्या योजना आदींची माहिती सांगून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार भेगडे यांनी दिले.एकच रिंगरोड व्हावापवन मावळ भागातून महाराष्ट्र शासन व पीएमआरडीचा स्वतंत्र दोन रिंग रोडचा प्रस्ताव आहे. मावळातील कसदार जमिनीमधून रिंगरोड जाणार असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसणार असल्याने एकच रिंग रोड करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्यात, अशी मागणी आमदार भेगडे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली. याचा पाठपुरावा मी स्वत: करत असून तुम्ही एकी तोडू नका, असा सल्ला भेगडे यांनी दिला. कासारसाई धरणातील पाणी याच धरणाच्या अंतर्गत येणाऱ्या शेतजमिनींना मिळावे. याचा वापर दुसऱ्या कामासाठी होऊ नये यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.