शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांवर स्वायत्तता लादू नये

By admin | Updated: March 23, 2017 04:16 IST

स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांना समाजाच्या विकासासाठी अनेक गोष्टी करता येऊ शकतात. परंतु, शिक्षण संस्थांनी आपल्या प्राध्यापकांवर स्वायत्तता लादू नये.

स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांना समाजाच्या विकासासाठी अनेक गोष्टी करता येऊ शकतात. परंतु, शिक्षण संस्थांनी आपल्या प्राध्यापकांवर स्वायत्तता लादू नये. तसेच शासनाने महाविद्यालयांवर अधिक विश्वास ठेवून प्राध्यापकांची पदभरती करण्यासाठी परवानगी द्यावी. संस्थांनी केलेली भरती शासनाने नंतर तपासून पाहावी, त्यामुळे महाविद्यालयांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळेल, असे मत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. कुंटे म्हणाले, जगभरातील विद्यापीठांमध्ये विद्यापीठीय शिक्षण आणि उद्योग यांचा एकमेकांशी समन्वय असल्याचे दिसून येते. मात्र, असे वातावरण भारतात फारसे दिसून येत नाही. विद्यापीठांचा आकार लहान असला आणि उद्योगांनी सहकार्य ठेवले तर संशोधन क्षमतेमध्ये नक्कीच वाढ झालेली दिसून येईल.शिक्षण संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना उत्तेजन आणि काम न करणाऱ्यांना शिक्षा दिली तरच शिक्षण संस्थांमध्ये गुणात्मक बदल होऊ शकतात. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आलेली निष्क्रियता झटकणे, हा महाविद्यालयांच्या विकासाचा एकमेव मार्ग आहे. सध्या विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांवरच अनुदानित महाविद्यालये सुरू आहेत. आधुनिक काळातील बदलनानुसार शिक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे वर्षातून एकदा प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे, असे नमूद करून कुंटे म्हणाले, प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देऊ नये. तर पुस्तकाबाहेरील आणि जीवनात उपयुक्त पडणारे ज्ञानही दिले पाहिजे. ग्रंथालयातील पुस्तकांबरोबच आधुनिक तंत्राचा ज्ञान वापर प्राध्यापकांनी केला पाहिजे. स्वायत्त महाविद्यालयांचा समाजासाठी उपयोग कसा करून घेता येईल याची दृष्टी संबंधित संस्थेच्या व्यवस्थापनाकडे असल्यास अनेक चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात. मात्र, त्यामुळे पूर्वीच्या यंत्रणेवर ताण पडणार आहे. याची खात्री बाळगली पाहिजे. प्राध्यापकांना विश्वासात घेऊन स्वायत्ततेचा निर्णय घेणे अपेक्षित आहे.समाजाची गरज भागविण्यासाठी शिक्षण संस्थांनी आवश्यक बदल केले पाहिजेत. या मानसिकतेतून प्राध्यापकांनी काम करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करून कुंटे म्हणाले, फर्ग्युसन महाविद्यालयातील प्राध्यापकांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर त्यांना शक्य असलेल्या गोष्टींवर काम करण्यास सांगण्यात आले. स्वायत्तता घेतल्यामुळे महाविद्यालयाच्या संशोधनात वाढ होणार आहे.राज्य शासन व केंद्र शासनाच्या मदतीने महाविद्यालयात अधिक चांगल्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. शिक्षण क्षेत्रात कोणतेही बदल त्वरित होत नाहीत. तुमची दिशा निश्चित असेल तर शिक्षण क्षेत्रातही योग्य बदल घडू शकतात. फर्ग्युुसन पाठोपाठ आता बीएमसीसीलाही लवकरच स्वायत्तता मिळेल. त्यादृष्टीने संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी रोजगाराभिमुख, संशोधनाला चालना देणारे आणि नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम राबविल्याशिवाय विद्यार्थी महाविद्यालयात येणार नाहीत, असेही कुंटे म्हणाले. महाविद्यालयांमधील उपकरणे एकत्र आणून फर्ग्युसन महाविद्यालयांमध्ये उत्तम संशोधन केंद्र सुरू करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले आहेत, असे नमूद करून कुंटे म्हणाले, महाविद्यालयांनी आपल्यातील कमतरता ओळखून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संशोधनाला गती देण्यासाठी महाविद्यालयात ‘रिसर्च कल्चर’ तयार होणे आवश्यक आहे. प्राध्यापकांच्या तुटवड्यामुळे महाविद्यालये चालवणे कठीण जात आहे. त्यामुळे शासनाने प्राध्यापकांच्या भरतीबाबत महाविद्यालयांवर विश्वास टाकण्याची गरजेचे आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.