शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या तोंडावर डाळी महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 03:19 IST

किराणा, कपडे खरेदीस गर्दी; पिंपरी, उपनगरातील बाजापेठेत कंदील दाखल

पिंपरी : दिवाळीचा फराळ करण्यासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीची लगबग सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा किराणा स्वस्त झाला आहे, तर अनेक साहित्याचे दर गेल्या वर्षीप्रमाणेच आहेत. सरकारने अन्न-धान्यावरील कर माफ केला आहे. तसेच इतर खाद्यपदार्थांवरील कर माफ केल्याने फराळासाठी लागणाºया किराणा मालाचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या आहेत.दिवाळी म्हटले की फराळाची मेजवानी ठरलेली असते. अनेक वेळा किराणा मालाच्या वाढलेल्या किंमतीमुळे फराळासाठी लागणाºया साहित्याची खरेदी करताना दिवाळे निघते. मात्र या वर्षी काही साहित्यांचे दर थोड्या प्रमाणात कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीच्या तयारीसाठी दसºयापासूनच भुसारबाजारातील विक्रेत्यांनी तयारी सुरू केली आहे. अनेक गृहिणींची फराळ बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. दिवाळीला अवघे सात दिवस बाकी आहेत. त्यामुळे पिंपरीतील अनेक किराणा माल विक्रेत्यांची दुकाने गर्दीने ओसंडून वाहत आहे.दिवाळीचा सण म्हणजे खिशाला कात्री लावणारा सण समजला जातो. मात्र वर्षातून एकदा येणारा सण म्हणून मागे-पुढे न पाहता खरेदी केली जाते. त्यामुळे प्रत्येकवर्षी दिवाळीमध्ये दिवाळे निघते. मात्र यंदाची दिवाळी सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी जीएसटीमध्ये फेरबदल केले होते. त्यानुसार अन्नधान्यावरील कर मागे घेण्यात आले होते. तसेच इतर साहित्यावरील कर १५ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्यात आला. त्याचा सकारात्मक परिणाम या दिवाळीमध्ये पाह्यला मिळत आहे. बेसनपीठ, चणाडाळ यांचे दर कमी झाले आहेत. तर दगडी पोहे, भाजके पोहे, खसखस, मुरमुरे यांचे दर गेल्यावर्षीप्रमाणेच आहेत. सुक्या खोबºयाची आवक कमी झाल्यामुळे खोबरे महागले आहे. सुक्या मेव्याचे भाव काही प्रमाणात वाढले आहेत. फराळ तयार करण्यासाठी लागणाºया खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. डालड्याची आवक घटल्याने किंमत वाढली आहे.साहित्य आताचे दरमुरमुरे       ६०खसखस   ८००साखर        ४०तेल            ९०चणा डाळ  ६०खोबरे       २००शेंगदाणे     ९५बेसन पीठ  ६०मैदा           २८रवा            २८पिठीसाखर ४५मका पोहे    ४०दगडी पोहे ६०दिवाळीला सहा दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे किराणा मालाच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र अजून बहुतांश नागरिकांचे पगार झाले नाहीत. एक तारखेनंतर पगार व बोनस मिळाल्यावर ग्राहकांची संख्या वाढेल. यंदा किराणा मालाची आवक चांगली झाली आहे. त्याचप्रमाणे सरकारने जीएसटीमध्ये फेरबदल केल्याचा प्रभाव जाणवू लागला आहे. त्यामुळे अनेक खाद्यपदार्थांच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे यंदा ग्राहकांचे खरेदीचे प्रमाणही वाढणार आहे.- कन्हैैया ओझा,किराणा मालविक्रेते.

टॅग्स :Diwaliदिवाळीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड