शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

दिवाळीच्या तोंडावर डाळी महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 03:19 IST

किराणा, कपडे खरेदीस गर्दी; पिंपरी, उपनगरातील बाजापेठेत कंदील दाखल

पिंपरी : दिवाळीचा फराळ करण्यासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीची लगबग सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा किराणा स्वस्त झाला आहे, तर अनेक साहित्याचे दर गेल्या वर्षीप्रमाणेच आहेत. सरकारने अन्न-धान्यावरील कर माफ केला आहे. तसेच इतर खाद्यपदार्थांवरील कर माफ केल्याने फराळासाठी लागणाºया किराणा मालाचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या आहेत.दिवाळी म्हटले की फराळाची मेजवानी ठरलेली असते. अनेक वेळा किराणा मालाच्या वाढलेल्या किंमतीमुळे फराळासाठी लागणाºया साहित्याची खरेदी करताना दिवाळे निघते. मात्र या वर्षी काही साहित्यांचे दर थोड्या प्रमाणात कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीच्या तयारीसाठी दसºयापासूनच भुसारबाजारातील विक्रेत्यांनी तयारी सुरू केली आहे. अनेक गृहिणींची फराळ बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. दिवाळीला अवघे सात दिवस बाकी आहेत. त्यामुळे पिंपरीतील अनेक किराणा माल विक्रेत्यांची दुकाने गर्दीने ओसंडून वाहत आहे.दिवाळीचा सण म्हणजे खिशाला कात्री लावणारा सण समजला जातो. मात्र वर्षातून एकदा येणारा सण म्हणून मागे-पुढे न पाहता खरेदी केली जाते. त्यामुळे प्रत्येकवर्षी दिवाळीमध्ये दिवाळे निघते. मात्र यंदाची दिवाळी सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी जीएसटीमध्ये फेरबदल केले होते. त्यानुसार अन्नधान्यावरील कर मागे घेण्यात आले होते. तसेच इतर साहित्यावरील कर १५ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्यात आला. त्याचा सकारात्मक परिणाम या दिवाळीमध्ये पाह्यला मिळत आहे. बेसनपीठ, चणाडाळ यांचे दर कमी झाले आहेत. तर दगडी पोहे, भाजके पोहे, खसखस, मुरमुरे यांचे दर गेल्यावर्षीप्रमाणेच आहेत. सुक्या खोबºयाची आवक कमी झाल्यामुळे खोबरे महागले आहे. सुक्या मेव्याचे भाव काही प्रमाणात वाढले आहेत. फराळ तयार करण्यासाठी लागणाºया खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. डालड्याची आवक घटल्याने किंमत वाढली आहे.साहित्य आताचे दरमुरमुरे       ६०खसखस   ८००साखर        ४०तेल            ९०चणा डाळ  ६०खोबरे       २००शेंगदाणे     ९५बेसन पीठ  ६०मैदा           २८रवा            २८पिठीसाखर ४५मका पोहे    ४०दगडी पोहे ६०दिवाळीला सहा दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे किराणा मालाच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र अजून बहुतांश नागरिकांचे पगार झाले नाहीत. एक तारखेनंतर पगार व बोनस मिळाल्यावर ग्राहकांची संख्या वाढेल. यंदा किराणा मालाची आवक चांगली झाली आहे. त्याचप्रमाणे सरकारने जीएसटीमध्ये फेरबदल केल्याचा प्रभाव जाणवू लागला आहे. त्यामुळे अनेक खाद्यपदार्थांच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे यंदा ग्राहकांचे खरेदीचे प्रमाणही वाढणार आहे.- कन्हैैया ओझा,किराणा मालविक्रेते.

टॅग्स :Diwaliदिवाळीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड