शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे ड्रोनने हल्ले; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
3
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
4
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
5
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
7
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
8
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
9
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
10
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
11
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
13
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
14
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
15
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
16
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
17
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
18
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
19
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
20
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."

अंतर तेच; पुणे-शिरूरला वेळ मात्र तिप्पट

By admin | Updated: December 30, 2014 00:05 IST

कंटेनर आणि लग्नकार्यासाठी मंगल कार्यालयात येणारी वाहने रस्त्यावरच पार्क केल्याने पुणे-अहमदनगर रस्त्यावर वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे.

अभिजित कोळपे ल्ल पुणे चौकाचौकांतील अतिक्रमणे, ठिकठिकाणी रस्त्यावरच उभे असलेले कंटेनर आणि लग्नकार्यासाठी मंगल कार्यालयात येणारी वाहने रस्त्यावरच पार्क केल्याने पुणे-अहमदनगर रस्त्यावर वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. पुणे ते अहमदनगर एकूण अंतर १२० किलोमीटर. पैकी पुणे ते शिरूर ६५, तर शिरूर ते अहमदनगर ५५ किलोमीटर. पुण्याहून शिरूरला पोहोचण्यासाठी अडीच तास लागतात. मात्र, शिरूरहून नगरला पोहोचण्यासाठी फक्त पाऊण तासच लागतो. त्याचे मुख्य कारण पुणे ते शिरूर रस्त्यावर बेकायदेशीरपणे केलेले अतिक्रमण आणि पार्किंग असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. ऊसवाहतूक, चंदननगरचे भाजी मार्केट आणि मोठ्या प्रमाणात गोडाऊन या रस्त्यावर असल्याने जड वाहतुकीचे प्रमाणात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. चंदननगर, खांदवेनगर, चोखी दाणी, सत्यम पार्क, वाघोली, केसनंद फाटा, मरकळ चौक, चाकण, पाबळ आणि कारेगाव या प्रमुख चौकांमध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे पुणे ते नगर या संपूर्ण रस्त्याचे चौपदरीकरण झाले आहे. मात्र, शिरूरपर्यंत ६५ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल अडीच तासांचा वेळ लागत आहे. मात्र, शिरूर ते नगर असा ५५ किलोमीटरच्या प्रवासासाठी फक्त पाऊण तास पुरेसा असल्याचे शुक्रवारी प्रत्ययास आले. याचे मुख्य कारण या ५५ किलोमीटरच्या मार्गावर शिस्तीत वाहतूक होत असल्याने कमी वेळ लागतो. पुणे ते शिरूर मार्गावर केवळ अतिक्रमण आणि पार्किंगच्या समस्येमुळे याउलट परिस्थिती निर्माण होत आहे. ही परिस्थिती कमी टाळण्यासाठी ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी काळजी घेण्याची नितांत गरज असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. सेवा रस्ता झाला पार्किंग रस्ता४पुणे-नगर मार्गावर फक्त चंदननगर ते वाघोली या दरम्यान सर्व्हिस रस्ता केला आहे. परंतु या रस्त्यावरच खासगी वाहने मोठ्या प्रमाणात पार्किंग करण्यास सुरुवात झाल्याने याचा वापर पूर्ण बंद झाला आहे. स्थानिक वाहतूक त्यामुळे मुख्य रस्त्यावरून सुरू झाली आहे. याचा परिणाम दिवसेंदिवस वाहतूककोंडीत भर पडत आहे. हा सर्व्हिस रस्ता तातडीने खुला करणे गरजेचे असल्याचे मत अ‍ॅड. मंदार संकपाळ यांनी व्यक्त केले. दुभाजक तोडून होतेय वाहतूक४खांदवेनगर, उबाळेनगर, सत्यम पार्क आणि चोखी दाणी परिसरात अनेक गोडाऊन असल्याने या ठिकाणी रस्त्यावरच कंटेनर उभे असतात. तसेच येथे एका कंटेनरला वळण्यासाठी जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळात रस्त्यावर साधारण एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. अनेक वेळा येथील दुभाजक बंद केला गेला होता. मात्र, रात्रीच्या वेळी हे दुभाजक जेसीबी आणून काढून टाकले जात आहेत. असे अनेक वेळा घडल्याने कंटाळून वाहतूक पोलिसांनी बॅरिकेड उभे केले आहेत. मात्र, पोलीस उपस्थित नसल्यास हे बॅरिकेड काढून येथून वाहने वळवली जातात. त्यामुळे येथील गोडाऊनचालकांवर कारवाईची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.पुणे-नगर रस्त्यावर अनेक गावांचे आठवडेबाजार भरतात. त्यामुळे भाजीविक्रेते हे रस्त्यावर विक्रीसाठी बसतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. आम्ही बऱ्याचदा बाजार समिती प्रमुखांना आणि भाजीविक्रेत्यांना आत बसण्याचे आवाहन करतो. मात्र, आम्हाला त्यांचा प्रतिसाद मिळत नाही. आमच्याकडे वाहतूक नियंत्रकांची संख्याही अपुरी आहे. त्यामुळे कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करता येत नाही. - नितीन गोकावे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखाउड्डाणपुलासाठी आमच्याकडे निधीच नाही पुणे-नगर रस्त्यावरील वाघोली, कोरेगाव भीमा आणि शिक्रापूर येथील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आमची आणि सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबर चर्चा झाली. आम्ही त्यांना तसे निवेदन दिले आहे. मात्र निधी नसल्याने आम्ही सध्या काही करून शकत नसल्याचे पत्र आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे, असे पुणे ग्रामीणचे वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक नितीन गोकावे यांनी सांगितले.