शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

लिंबू, मिरचीची भीती?, सायन्स पार्क असलेल्या उद्योगनगरीतील विदारकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:37 IST

शहर स्मार्ट सिटी होऊ घातले असताना पिंपरी-चिंचवडमधील अंधश्रद्धा काही कमी होत नाहीत. येथील स्मशानभूमीला लागून असलेल्या रस्त्यावर लिंबू, मिरची व इतर उतारा म्हणून केलेल्या वस्तू सर्रास पाहायला मिळतात.

पिंपरी : शहर स्मार्ट सिटी होऊ घातले असताना पिंपरी-चिंचवडमधील अंधश्रद्धा काही कमी होत नाहीत. येथील स्मशानभूमीला लागून असलेल्या रस्त्यावर लिंबू, मिरची व इतर उतारा म्हणून केलेल्या वस्तू सर्रास पाहायला मिळतात. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये अंधश्रद्धा फोफावत चालली असल्याचे पाहयला मिळते. विद्यार्थ्यांना हसत खेळत विज्ञान समजून घेता यावे म्हणून महापालिकेतर्फे चिंचवड येथे सायन्स पार्क उभारण्यात आले आहे. या पार्कमधून विज्ञानाचे धडे दिले जात असतानाच अंधश्रद्धेबाबतची ही विदारकता शहरवासीयांची मानसिकता स्पष्ट करते.येथील स्मशानभूमीमध्ये मोठ्या प्रमाणावर उताऱ्याचे साहित्य पाहयला मिळते. रस्त्यावर लिंबू, मिरच्या, बिबवे व काळ््या बाहुल्या टाकल्या जातात. अनेक ठिकाणी नारळावर हळद, कुंकू लावून रस्त्याच्या मधोमध ठेवले जाते. त्यामुळे शाळेत जाणारे लहान मुले घाबरतात. या गोष्टीने माणसाच्या जीवनावर काहीही फरक पडत नसला तरी पालकांच्या मनातही भीतीचे वातावरण पसरले आहे.शाहू, फुले व आंबेडकरांच्या कर्मभूमी असलेल्या पुणे शहरामध्ये आजही अंधश्रद्धेला मानून लोक राहत आहेत. शैक्षणिक आणि औद्योगिक वारसा लाभलेल्या आपल्या शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचे कार्य प्रगतिपथावर आहे. मात्र दुसरीकडे शहरातील स्मशानभूमीमध्ये उतारे करून लिंबू, मिरची टाकल्या जातात. मागील अनेक अंधश्रद्धेच्या घटनांमुळे शहरामध्ये चर्चेला उधाण आले होते. त्यातच अशाप्रकारे शहरात अंधश्रद्धेला खतपाणी घालणाºया गोष्टी घडत असल्यामुळे शहरातील वातावरण बिघडत आहे. ज्या वेळी लोक सुशिक्षित नव्हते, त्या काळी अशाप्रकारे कर्मकांडे केली जात होती. परंतु आज समाज सुशिक्षित झाला आहे.आज चालणाºया या वाईट प्रथांमुळे पुढील पिढीवर त्याचा वाईट परिणाम होणार आहे. त्यामुळे या कुप्रथा समाजाने थांबवल्या पाहिजे. लिंबू, मिरची हे अन्नपदार्थ आहेत़ त्यामध्ये शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्व असतात. त्यामुळे त्याची अशाप्रकारे नासाडी करणे थांबवले पाहिजे’’, अशी अपेक्षा सुजाण नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. काही संधीसाधू नागरिक सर्वसामान्यांमध्ये अंधश्रद्धा पसरवून गैरफायदा घेतात. त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे.1वाहनांना लिंबू-मिरची, बिब्बा तारेला बांधून अंधश्रद्धेचे दर्शन घडविले जाते. दर शनिवारी अशा प्रकारे लिंबू मिरची वाहनांना लावण्यात येते. जुने झालेले लिंबू मिरची काढून ते भररस्त्यात, तीन रस्ते एकत्र येणाºया ठिकाणी टाकण्यात येते. लिंबू मिरची अडकवलेल्या तारा रस्त्यात पडून त्यामुळे वाहने पंक्चर होण्याचेही प्रकार घडतात.2वाहनांना दृष्ट लागू नये म्हणून काळ्या बाहुल्या, चप्पलचाही वापर सर्रास केला जातो. वाहनाच्या मागच्या किंवा पुढच्या बाजूला बाहुली किंवा चप्पल अडकवलेली असते.जी काही समस्या असेल त्यावर वैज्ञानिक कारणे शोधली पाहिजेत. त्यासाठी मांत्रिक-तांत्रिक करून काहीही होत नाही. लिंबू, मिरची टाकून कुणाचेही चांगले अथवा वाईट होत नाही. या गोष्टी लक्षात घेऊन नागरिकांनी अशा अंधश्रद्धांपासून दूर राहयला पाहिजे. माणसांनी संतांच्या शिकवणुकीप्रमाणे वागायला पाहिजे. संतांनी अनेक वर्षांपूर्वी या कर्मकांडावर लिहून त्याचा विरोध केला आहे.’’- मिलिंद देशमुख, अंनिस, महाराष्ट्र राज्य प्रधान सचिव

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या