शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

दिंडीने संगीत संमेलनाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:52 IST

ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी आयोजित संगीत संमेलनाची सुरुवात निगडी प्राधिकरण येथील माऊली उद्यानापासून निघालेल्या संगीत दिंडीने झाली.

पिंपरी : ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी आयोजित संगीत संमेलनाची सुरुवात निगडी प्राधिकरण येथील माऊली उद्यानापासून निघालेल्या संगीत दिंडीने झाली. देवी सरस्वती, ग्रंथ संगीत रत्नाकर व विविध वाद्ये यांचे पूजन केले. यात पारंपरिक वेशभूषा केलेले पाचवी ते सातवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. दिंडी वाजतगाजत आणि प्रबोधन गीते म्हणत शाळेपर्यंत आली. प्राथमिक विभागाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वाराजवळ आनंद व उत्साहात दिंडीचे स्वागत केले.पंडित भीमसेन जोशी संगीत नगरीमध्ये संमेलन अध्यक्ष रामदास पळसुले, उपाध्यक्ष समीर दुबळे, ज्ञानप्रबोधिनीचे संचालक गिरीश बापट, केंद्रप्रमुख वामन अभ्यंकर, केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर, केंद्र व्यवस्थापक यशवंत लिमये, मुख्याध्यापिका प्रज्ञा पाटील, अलका शाळू, नचिकेत देव, शीतल कापशीकर, किशोर जाधव या मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन केले. नचिकेत देव यांच्या सुरेल गणेशवंदनेने कार्यक्रमाची संगीतमय सुरुवात झाली.संगीत ही नुसती कला नसून ते एक शास्त्र आहे म्हणूनच त्याचा विशेष अभ्यास विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी मिळून करण्याच्या उद्देशाने या संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रास्ताविक मनोज देवळेकर यांनी मांडले.लहानपणी घेतलेले चांगले अनुभव हे मोठेपणीच्या उज्ज्वल स्वप्नांचे बीज रुजवतात. कलेकडे व्यवसाय म्हणून बघण्यापेक्षा आनंद, साधना म्हणून बघितले, तरच त्या कलेचा परमोच्च आनंद घेता येतो. अशी दृष्टी देण्यासाठी, तसेच गुरू मिळण्याचे भाग्य असायला हवे. उत्तम गुरू लाभले, तरी त्याचे सोने करण्यासाठी अथक प्रयत्न, रियाज करण्याचीही तयारी हवी. संधी जेव्हा शालेय जीवनात मिळाली, तर त्याचा जरूर लाभ घ्या. सदैव कष्ट घेण्याची तयारी, गुरूवर श्रद्धा ठेवली, तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे विचार संमेलनाध्यक्ष रामदास पळसुले यांनी आपल्या बीज भाषणात मांडले.संगीत हे फक्त कला माध्यम नसून यातून संपूर्ण अभिव्यक्ती विकास साधतो. या दोन दिवसांच्या संमेलनातून भावी सांगीतिक वाटचालीची दिशा प्रत्येकाला मिळू दे. उत्तम कलाकार होण्याबरोबरच आस्वाद घेणारे रसिकही यातून तयार होऊ दे, असे सांगत संचालक गिरीश बापट यांनी उद्घाटन सोहळ्याची सांगता केली.कीर्तनाविष्कारास दादपिंपरी : संमेलनाचे द्वितीय सत्र ‘संगीताचे सादरीकरण’ या विषयावर झाले. ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे यांनी छोटेसे कीर्तनाचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यांना संवादिनीवर रेशीम खेडकर तर तबला मिलिंद तायवडे यांनी साथ दिली. यात आफळे यांनी ‘नमन माझे गजवंदना’ या गणेश गीत व कथेचे अतिशय सुरस सादरीकरण केले. हे करताना कीर्तन म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते याविषयी माहिती दिली.कीर्तन सादरीकरण एकूण आठ भागांत विभागलेले आहे़ हे त्यांनी प्रत्यक्ष एक एक भाग उलगडत सांगितले. कीर्तनातून चांगल्यामध्ये सहभागी व्हायचा संस्कार आहे. कीर्तन ही श्रवणीय व प्रेक्षणीय कला आहे. यात बोलावे कसे, गायन कसे करावे, उभे कसे राहावे याचा अभ्यास असतो. उत्तम सादरीकरण करताना वेळेचे भान राखता यायला हवे, दिलेल्या वेळेत आपली कला सादर करताना तितकेच प्रभावी होण्यासाठी योग्य अभ्यास हवा. कीर्तनातील वादन हे फक्त साथसंगत इतकेच मर्यादित नसून अभंग, श्लोक, कथा यांचे विवेचन करताना वातावरण निर्मितीसाठीही उपयुक्त असतात. असे अनेक छोट्या छोट्या गोष्टी सहजतेने सांगत आफळे यांनी सर्वांचीच मने जिंकली. त्यांनतर या विषयाची अधिक माहिती परिसंवाद व प्रात्यक्षिक स्वरूपात दिली. याची सूत्रे अतिशय प्रभावीपणे सांभाळत श्रेष्ठ कलाकारांकडून त्यांच्या कलेची तोंडओळख सर्वांना करून दिली. यात सर्वप्रथम शास्त्रीय संगीताविषयी डॉ. पौर्णिमा धुमाळे यांनी यमन रागातील दर्शन देवो मज शंकर महादेव ही बंदिश व एक सुंदर तराना याचे सादरीकरण करत त्याविषयी सविस्तर माहिती दिली.