शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिघीकरांनी काढली रात्र जागून

By admin | Updated: November 24, 2015 00:54 IST

येथील काटे वस्ती विनायक पार्क, होरीझन शाळा, कृष्णानगर, गोल्डन बेकरी, विजयनगर, बी. यू. भंडारीसारख्या उच्चभ्रू सोसायट्या व इतरत्र भागातील घराघरांत कुठे गुडघाभर,

दिघी : येथील काटे वस्ती विनायक पार्क, होरीझन शाळा, कृष्णानगर, गोल्डन बेकरी, विजयनगर, बी. यू. भंडारीसारख्या उच्चभ्रू सोसायट्या व इतरत्र भागातील घराघरांत कुठे गुडघाभर, तर कुठे कमरेएवढे पाणी साचले. रात्रभर जागरण करीत व घरातील पाण्याचा उपसा करीत दिघीकरांनी रात्र घालवली. पावसाळी गटार नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.काटेनगर, विजयनगर परिसरातील विनायक पार्क भागातील रस्त्यावरची विद्युत विभागाची डीपी पडली आहे. या भागातील लालचंद बाबूलाल परदेशी, किसन लिम्बडकर, संजय मोरे अनेकांच्या घरात व घराच्या कानाकोपऱ्यात पाणीच पाणी झाले आहे. या भागातील घरा-घरांत पाणीच पाणी झाले आहे. रस्त्यावरही पाणीच पाणी वाहत असलेले दिसून आले. याच परिसरात असलेल्या होरीझन शाळेजवळील मुरलीधर लोखंडे यांच्या घरात जवळपास कमरेइतके पाणी साचल्यामुळे अख्खा परिवार रात्रभर पाणी काढत राहिला. तरीही दुपारी बारापर्यंत पाणी हटवण्याची प्रक्रिया सुरूच होती. डोंगर भागातून मोठा उतार असल्यामुळे उंचावरून वेगाने वाहणारे पाणी थेट त्याच वेगात खाली येते. हे थेट आलेले पाणी वाहणारी प्रभावी यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे येथून आलेले पाणी बी यू भंडारी, वाटिका, स्पार्कल अ‍ॅव्हेन्यू या उच्चभ्रू सोसायट्यांकडे वळते होते. याच भागातील बी यू भंडारी सोसायटीतील प्लॉट क्र ६८ची भयंकर दयनीय अवस्था झाली असून, येथील तळमजला भागातील प्रत्येक सदनिकेत पाणीच पाणी झाले आहे. प्रत्येक पावसाळ्यात होणारी ही परिस्थिती या भागातील नाागरिकांनी अनुभवली असून, त्याच्यावर कायमचा उपाय होत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी नोंदवल्या, तर सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब शेंडगे यांनी सांगितले की, डोंगराकडून आलेले पाणी वाहण्यासाठी मोठा ओढा होता. तो ओढाच नष्ट करून त्यावर उंच इमारती उभ्या केल्या आहेत. हाच नैसर्गिक ओढा प्रवाहित असता तर असा भयंकर प्रसंग आमच्यावर आला नसता. दिघी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड, संतोष बबन वाळके, विश्वकांत वाळके आदींनी मदत केली. दिवसभर गारठा जाणवत होता. अचानक पाऊस आल्याने सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. तसेच बसथांब्यावरही अचानक आलेल्या पावसामुळे प्रवाशांना भिजण्याशिवाय पर्यायच उरला नसल्याने प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले. निवारा शेडचाही वापर करता आला नाही.(प्रतिनिधी)