शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

दिघीकरांनी काढली रात्र जागून

By admin | Updated: November 24, 2015 00:54 IST

येथील काटे वस्ती विनायक पार्क, होरीझन शाळा, कृष्णानगर, गोल्डन बेकरी, विजयनगर, बी. यू. भंडारीसारख्या उच्चभ्रू सोसायट्या व इतरत्र भागातील घराघरांत कुठे गुडघाभर,

दिघी : येथील काटे वस्ती विनायक पार्क, होरीझन शाळा, कृष्णानगर, गोल्डन बेकरी, विजयनगर, बी. यू. भंडारीसारख्या उच्चभ्रू सोसायट्या व इतरत्र भागातील घराघरांत कुठे गुडघाभर, तर कुठे कमरेएवढे पाणी साचले. रात्रभर जागरण करीत व घरातील पाण्याचा उपसा करीत दिघीकरांनी रात्र घालवली. पावसाळी गटार नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.काटेनगर, विजयनगर परिसरातील विनायक पार्क भागातील रस्त्यावरची विद्युत विभागाची डीपी पडली आहे. या भागातील लालचंद बाबूलाल परदेशी, किसन लिम्बडकर, संजय मोरे अनेकांच्या घरात व घराच्या कानाकोपऱ्यात पाणीच पाणी झाले आहे. या भागातील घरा-घरांत पाणीच पाणी झाले आहे. रस्त्यावरही पाणीच पाणी वाहत असलेले दिसून आले. याच परिसरात असलेल्या होरीझन शाळेजवळील मुरलीधर लोखंडे यांच्या घरात जवळपास कमरेइतके पाणी साचल्यामुळे अख्खा परिवार रात्रभर पाणी काढत राहिला. तरीही दुपारी बारापर्यंत पाणी हटवण्याची प्रक्रिया सुरूच होती. डोंगर भागातून मोठा उतार असल्यामुळे उंचावरून वेगाने वाहणारे पाणी थेट त्याच वेगात खाली येते. हे थेट आलेले पाणी वाहणारी प्रभावी यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे येथून आलेले पाणी बी यू भंडारी, वाटिका, स्पार्कल अ‍ॅव्हेन्यू या उच्चभ्रू सोसायट्यांकडे वळते होते. याच भागातील बी यू भंडारी सोसायटीतील प्लॉट क्र ६८ची भयंकर दयनीय अवस्था झाली असून, येथील तळमजला भागातील प्रत्येक सदनिकेत पाणीच पाणी झाले आहे. प्रत्येक पावसाळ्यात होणारी ही परिस्थिती या भागातील नाागरिकांनी अनुभवली असून, त्याच्यावर कायमचा उपाय होत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी नोंदवल्या, तर सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब शेंडगे यांनी सांगितले की, डोंगराकडून आलेले पाणी वाहण्यासाठी मोठा ओढा होता. तो ओढाच नष्ट करून त्यावर उंच इमारती उभ्या केल्या आहेत. हाच नैसर्गिक ओढा प्रवाहित असता तर असा भयंकर प्रसंग आमच्यावर आला नसता. दिघी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड, संतोष बबन वाळके, विश्वकांत वाळके आदींनी मदत केली. दिवसभर गारठा जाणवत होता. अचानक पाऊस आल्याने सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. तसेच बसथांब्यावरही अचानक आलेल्या पावसामुळे प्रवाशांना भिजण्याशिवाय पर्यायच उरला नसल्याने प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले. निवारा शेडचाही वापर करता आला नाही.(प्रतिनिधी)