शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लांबचे मतदान केंद्र मिळाल्याने अडचणींत भर

By admin | Updated: February 18, 2017 03:17 IST

महापालिका निवडणुकांसाठी मतदान केंद्रांवरील अधिकारी नेमण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात असून प्रशासनाने शिक्षकांना नेमण्यात

पिंपरी : महापालिका निवडणुकांसाठी मतदान केंद्रांवरील अधिकारी नेमण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात असून प्रशासनाने शिक्षकांना नेमण्यात आलेली केंद्रेही निश्चित केली आहेत. परंतु, या मतदान केंद्र वाटपामध्ये महिला शिक्षिकांना २५ ते ३० किलोमीटर अंतरावरील ठिकाणे देण्यात आल्याने त्यांची अडचण झाली आहे. महिला शिक्षिकांना दहा ते बारा किलोमीटरच्या आतील केंद्र मिळावीत, अशी विनंती करण्यात येत आहे. तसे करणे शक्य नसल्यास शिक्षकांना सामंजस्याने केंद्रांची अदलाबदल करू देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महिला शिक्षिकांमधून करण्यात येत आहे. येत्या २१ फेब्रुवारी रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोग आणि प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतदान केंद्रांवर एक केंद्राध्यक्ष अणि मतदान अधिकारी नेमण्यात येतात. यावेळी मतदानासाठी चार मशिन्स ठेवण्यात येणार आहेत.मतदान सुरू होण्याच्या साधारण एक ते दीड तास आधी केंद्रावर पोचावे लागते आणि मतदान संपल्यानंतर चार ते पाच तास थांबावे लागते. त्यामुळे भल्या पहाटे घराबाहेर पडलेल्या शिक्षिकांना रात्री घरी येण्यास खूप उशिर होतो. यावेळी तर कोणाला कोणत्या मतदान केंद्रावर नेमण्यात आले आहे, याची माहिती आदल्या दिवशी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे आधी जाऊन केंद्र पाहून घेण्याची सोयच राहिली नाही.‘लोकमत’शी संपर्क साधून आपली कैफियत मांडलेली एक शिक्षिका कोथरूड परिसरात राहण्यास आहे. या शिक्षिकेला मांजरी येथील केंद्र आले आहे. हे अंतर जवळपास ३० ते ३५ किलोमीटर आहे. भल्या पहाटे घर सोडलेल्या महिलांना एकटेच केंद्रापर्यंत जावे लागणार  आहे. पहाटेच्या वेळी रस्त्यांवर  माणसे नसतात, अंधार असतो. अशा स्थितीत रस्ता चुकल्यास  कोणाला पत्ता विचारणार असा प्रश्न आहे. यासोबतच अनेक शिक्षिकांच्या घरी लहान मुले आहेत. त्याचाही विचार करण्यात आलेला दिसत नाही. (प्रतिनिधी)यापूर्वी जर लांबचे मतदान केंद्र मिळाले तर शिक्षक आपापसात सामंजस्याने केंद्राची अदलाबदल करीत असत. मात्र यावेळी त्यालाही नकार देण्यात आल्याने महिलांची अडचण झाली आहे. महिलांच्या बाबतीत हा नियम शिथिल करण्याची मागणी करण्यात येत आहे. आम्हाला काम करायचेच आहे. मतदान केंद्रांवर काम करताना रात्री कितीही उशीर लागला तरी हरकत नाही, परंतु दहा ते बारा किलोमीटरच्या आतील मतदान केंद्र मिळावे, अशी मागणी शिक्षिका करीत आहेत. प्रशासनाने महिलांचे प्रश्न समजूत घेत यावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. ४बुथवरील अन्य सहकारी सोबत असतात मात्र, ते प्रत्येक वेळी सोबत असतीलच असे नाही. कारण यावेळी कोणाला कोणते केंद्र मिळणार आहे, याची काहीच शाश्वती नाही. मतदान केंद्रांवर वेळेत रिलीव्हर न मिळाल्याने महिलांना स्वच्छतागृहांमध्येही जात नाही. एखादी वाईट घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.