शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

सर्वपक्षीय लढ्याचा निर्धार

By admin | Updated: September 1, 2015 04:06 IST

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत गुणवत्ता असतानाही पिंपरी-चिंचवडला डावलल्याने विविध क्षेत्रांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या

पिंपरी : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत गुणवत्ता असतानाही पिंपरी-चिंचवडला डावलल्याने विविध क्षेत्रांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या अस्मितेसाठी पिंपरी-चिंचवड शहर स्वाभिमान समितीच्या माध्यमातून सर्वपक्षीय लढा देण्याचा निर्धार ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून सोमवारी करण्यात आला. केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांना भेटून स्मार्ट सिटी सहभागाची मागणी करणार असल्याचे समितीच्या सदस्यांनी या वेळी जाहीर केले. स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेला डावलल्याने शहरात आंदोलन, निषेध करण्यास सुरुवात झाली आहे. गुणवत्ता असतानाही डावलले गेल्याची खंत या शहरातील नागरिकांना आहे. विविध राजकीय पक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे शहराच्या अस्मितेसाठी पिंपरी-चिंचवड शहर स्वाभिमान समितीची स्थापना झाली. या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ पिंपरी-चिंचवड कार्यालयास भेट दिली. पक्षीय मतभेद दूर ठेवून शहराच्या प्रश्नांसाठी एकजूट करण्याचा निर्धार करण्यात आला. या वेळी महापालिकेतील कारभारावर टीका करण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधकांनी शहरविकासाबद्दल भावना व्यक्त करून लढ्यात उतरणार असल्याची भूमिका प्रथमच मांडल्याचे दिसून आले. शहराच्या अस्मितेच्या विषयावर प्रत्येक जण अत्यंत पोटतिडकीने बोलत होता. विकासाच्या मुद्द्यावर साधकबाधक चर्चा झाली. ‘पक्षीय राजकारणाचा फटका शहरास बसला आहे. आम्हाला एक वेळ निधी देऊ नका, पण स्मार्ट सिटीत समावेश करा,’ अशी जोरदार मागणीही करण्यात आली. योजनेची घोषणा झाल्यानंतर श्रेयासाठी भाजपाच्या नेत्यांनी आमच्यामुळे झाले, असे समर्थन केले. श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. मग डावलल्यानंतरची जबाबदारी स्वीकारून आमदार खासदारांनी राजीनामा देऊन निषेध करायला हवा होता. अपयशाचीही जबाबदारी स्वीकारायला हवी होती, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. स्मार्ट सिटीत डावलल्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेले समर्थन, राजकीय हेतूने महापालिकेवर केलेली चिखलफेक यांचा शाब्दिक निषेध केला. तसेच, महापालिका प्रशासनाच्या चुकीमुळे गाफील राहिल्याचे नुकसान झाल्याबद्दलही नाराजी व्यक्त झाली. शांततेच्या मार्गाने जनजागृती करणार असून, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू. न्यायालयीन लढा उभारण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. या प्रश्नाबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांना भेटून विशेष महासभा बोलावण्याची विनंती केली जाणार आहे. महासभेतील भावना सरकारला कळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)