शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

सर्वपक्षीय लढ्याचा निर्धार

By admin | Updated: September 1, 2015 04:06 IST

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत गुणवत्ता असतानाही पिंपरी-चिंचवडला डावलल्याने विविध क्षेत्रांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या

पिंपरी : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत गुणवत्ता असतानाही पिंपरी-चिंचवडला डावलल्याने विविध क्षेत्रांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या अस्मितेसाठी पिंपरी-चिंचवड शहर स्वाभिमान समितीच्या माध्यमातून सर्वपक्षीय लढा देण्याचा निर्धार ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून सोमवारी करण्यात आला. केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांना भेटून स्मार्ट सिटी सहभागाची मागणी करणार असल्याचे समितीच्या सदस्यांनी या वेळी जाहीर केले. स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेला डावलल्याने शहरात आंदोलन, निषेध करण्यास सुरुवात झाली आहे. गुणवत्ता असतानाही डावलले गेल्याची खंत या शहरातील नागरिकांना आहे. विविध राजकीय पक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे शहराच्या अस्मितेसाठी पिंपरी-चिंचवड शहर स्वाभिमान समितीची स्थापना झाली. या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ पिंपरी-चिंचवड कार्यालयास भेट दिली. पक्षीय मतभेद दूर ठेवून शहराच्या प्रश्नांसाठी एकजूट करण्याचा निर्धार करण्यात आला. या वेळी महापालिकेतील कारभारावर टीका करण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधकांनी शहरविकासाबद्दल भावना व्यक्त करून लढ्यात उतरणार असल्याची भूमिका प्रथमच मांडल्याचे दिसून आले. शहराच्या अस्मितेच्या विषयावर प्रत्येक जण अत्यंत पोटतिडकीने बोलत होता. विकासाच्या मुद्द्यावर साधकबाधक चर्चा झाली. ‘पक्षीय राजकारणाचा फटका शहरास बसला आहे. आम्हाला एक वेळ निधी देऊ नका, पण स्मार्ट सिटीत समावेश करा,’ अशी जोरदार मागणीही करण्यात आली. योजनेची घोषणा झाल्यानंतर श्रेयासाठी भाजपाच्या नेत्यांनी आमच्यामुळे झाले, असे समर्थन केले. श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. मग डावलल्यानंतरची जबाबदारी स्वीकारून आमदार खासदारांनी राजीनामा देऊन निषेध करायला हवा होता. अपयशाचीही जबाबदारी स्वीकारायला हवी होती, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. स्मार्ट सिटीत डावलल्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेले समर्थन, राजकीय हेतूने महापालिकेवर केलेली चिखलफेक यांचा शाब्दिक निषेध केला. तसेच, महापालिका प्रशासनाच्या चुकीमुळे गाफील राहिल्याचे नुकसान झाल्याबद्दलही नाराजी व्यक्त झाली. शांततेच्या मार्गाने जनजागृती करणार असून, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू. न्यायालयीन लढा उभारण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. या प्रश्नाबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांना भेटून विशेष महासभा बोलावण्याची विनंती केली जाणार आहे. महासभेतील भावना सरकारला कळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)