शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मातृभाषेविषयी उदासीनता - उषा तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:20 IST

आज साहित्य संस्थांच्या कार्यपद्धतीत कमालीचा फरक पडला आहे. पूर्वी साहित्य वाद असायचे आता साहित्यापर्यंत आपण पोहोचत नाही, भाषा कशी टिकेल इथपासूनच सुरूवात होते.

पुणे  - आज साहित्य संस्थांच्या कार्यपद्धतीत कमालीचा फरक पडला आहे. पूर्वी साहित्य वाद असायचे आता साहित्यापर्यंत आपण पोहोचत नाही, भाषा कशी टिकेल इथपासूनच सुरूवात होते. भाषेचे व्याकरण , शुद्धधीकरण, प्रमाण भाषा, बोलीच का मानायची? अशा चर्चा ऐकायला मिळतात. घरातून बाहेर पडलो की समाजाची भाषा बोलू लागतो. मराठी भाषिकच मातृभाषेविषयी विशेष आग्रही नसतात, अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र साहित्य परिषद व जोगळेकर कुटुंबीयांच्या वतीने उषा तांबे यांना डॉ. गं. ना. जोगळेकर पुरस्कार देऊन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पराग जोगळेकर उपस्थित होते.डॉ. गं.ना जोगळेकर यांच्या नावाने मिळणारा हा अत्यंत मानाचा पुरस्कार आहे, अशी भावना व्यक्त करून उषा तांबे यांनी जोगळेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. कराडला साहित्य संमेलन होते. त्यामधील एका परिसंवादाचे सूत्रसंचालन माझ्याकडे दिले होते. त्या परिसंवादातील एकही वक्ता माझ्या ओळखीचा नव्हता. तेव्हा जोगळेकर यांनी मला विविध ठिकाणाहून आलेल्या सगळ्या वक्त्यांची माहिती दिली. संमेलन म्हणजे टीकेचे धनी होण्याचा कार्यक्रम असतो. पण ते निभावण्याची ताकद त्यांच्यात होती, असे त्या म्हणाल्या.तुम्ही काही चिलखत घालून जाता का संमेलनाला?साहित्य महामंडळात काम करताना अनेक संघर्षाला पदाधिका-यांना तोंड द्यावे लागते. कुठेही काही घडते आणि महामंडळालाच विचारले जाते. मला आई गंमतीने म्हणायची तुम्ही काही चिलखत घालून जाता का संमेलनाला? अशी मिस्किल टिप्पणी करीत संमेलन नवीन लोकांना संधी दिली तर कोण हे? यांना आम्ही ओळ्खतच नाही आणि प्रस्थापित लोकांना बोलावले तर यांच्याशिवाय दुसरे दिसत नाहीत का? असे दोन्ही बाजूने बोलले जाते. संमेलन अखिल भारतीय आहे तर सर्व घटक संस्था सहभागी करून घ्यायला पाहिजेत का नकोत? असा सवालही डॉ. उषा तांबे यांनी केला.

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्या