शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मातृभाषेविषयी उदासीनता - उषा तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:20 IST

आज साहित्य संस्थांच्या कार्यपद्धतीत कमालीचा फरक पडला आहे. पूर्वी साहित्य वाद असायचे आता साहित्यापर्यंत आपण पोहोचत नाही, भाषा कशी टिकेल इथपासूनच सुरूवात होते.

पुणे  - आज साहित्य संस्थांच्या कार्यपद्धतीत कमालीचा फरक पडला आहे. पूर्वी साहित्य वाद असायचे आता साहित्यापर्यंत आपण पोहोचत नाही, भाषा कशी टिकेल इथपासूनच सुरूवात होते. भाषेचे व्याकरण , शुद्धधीकरण, प्रमाण भाषा, बोलीच का मानायची? अशा चर्चा ऐकायला मिळतात. घरातून बाहेर पडलो की समाजाची भाषा बोलू लागतो. मराठी भाषिकच मातृभाषेविषयी विशेष आग्रही नसतात, अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र साहित्य परिषद व जोगळेकर कुटुंबीयांच्या वतीने उषा तांबे यांना डॉ. गं. ना. जोगळेकर पुरस्कार देऊन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पराग जोगळेकर उपस्थित होते.डॉ. गं.ना जोगळेकर यांच्या नावाने मिळणारा हा अत्यंत मानाचा पुरस्कार आहे, अशी भावना व्यक्त करून उषा तांबे यांनी जोगळेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. कराडला साहित्य संमेलन होते. त्यामधील एका परिसंवादाचे सूत्रसंचालन माझ्याकडे दिले होते. त्या परिसंवादातील एकही वक्ता माझ्या ओळखीचा नव्हता. तेव्हा जोगळेकर यांनी मला विविध ठिकाणाहून आलेल्या सगळ्या वक्त्यांची माहिती दिली. संमेलन म्हणजे टीकेचे धनी होण्याचा कार्यक्रम असतो. पण ते निभावण्याची ताकद त्यांच्यात होती, असे त्या म्हणाल्या.तुम्ही काही चिलखत घालून जाता का संमेलनाला?साहित्य महामंडळात काम करताना अनेक संघर्षाला पदाधिका-यांना तोंड द्यावे लागते. कुठेही काही घडते आणि महामंडळालाच विचारले जाते. मला आई गंमतीने म्हणायची तुम्ही काही चिलखत घालून जाता का संमेलनाला? अशी मिस्किल टिप्पणी करीत संमेलन नवीन लोकांना संधी दिली तर कोण हे? यांना आम्ही ओळ्खतच नाही आणि प्रस्थापित लोकांना बोलावले तर यांच्याशिवाय दुसरे दिसत नाहीत का? असे दोन्ही बाजूने बोलले जाते. संमेलन अखिल भारतीय आहे तर सर्व घटक संस्था सहभागी करून घ्यायला पाहिजेत का नकोत? असा सवालही डॉ. उषा तांबे यांनी केला.

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्या