शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतागृह तोडणा-यांवर फौजदारी , सर्वसाधारण सभेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 03:13 IST

स्वच्छ भारत अभियानासंदर्भातील विषय सर्वसाधारण सभेपुढे चर्चेस आल्यानंतर ‘स्वच्छतागृहां’वरून स्थायी समिती सभापती सीमा सावळे आणि माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

पिंपरी : स्वच्छ भारत अभियानासंदर्भातील विषय सर्वसाधारण सभेपुढे चर्चेस आल्यानंतर ‘स्वच्छतागृहां’वरून स्थायी समिती सभापती सीमा सावळे आणि माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. ‘नेहरुनगरातील स्वच्छतागृह पाडणाºयांवर फौजदारी दाखल झालीच पाहिजे, असे सावळे म्हणाल्या. वादंग अधिक वाढू लागल्याने महापौरांनी स्वच्छभारत अभियानाच्या धर्तीवरीलस्वच्छ महाराष्टÑ अभियानाचा विषय मंजूर केला.महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. या विषयावर चर्चा होताना सुरुवातीला दत्ता साने यांनी ‘‘अनधिकृत बांधकामे, शास्तीबाबत विशेष सभा होणार होती. पक्षनेत्यांना या विषयाचा विसर पडला आहे. ती कधी घेणार ते सांगावे. अनधिकृत बांधकामे धोरण आणि शास्तीने नागरिक भयभीत आहेत, अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाची सद्य:स्थिती सभागृहापुढे यावे,’’ अशी मागणी केली. त्यावर महापौरांनी योग्य वेळ कळविली जाईल, असे सांगितले.त्यानंतर डॉ. वैशाली घोडेकर यांनी आपल्या भागातील स्वच्छतेचा प्रश्न सांगितला. त्या म्हणाल्या, ‘‘एचए मैदानावर मोठ्या प्रमाणावर काही लोकांनी पाले टाकली आहेत. या लोकांसाठी स्वच्छतागृह नसल्याने रस्त्यावरच शौचास जावे लागत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. या गोष्टीचे प्रशासनास गांभीर्य नाही.’’ त्यावर सीमा सावळे यांनी नेहरुनगरातील ‘स्वच्छतागृह’ पाडल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून दोन्ही सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.सावळे म्हणाल्या, ‘‘एकीकडे स्वच्छतागृह पाडायचे आणि दुसरीकडे तक्रारी करायच्या नेहरुनगरातील स्वच्छतागृह पाडण्याबाबत प्रशासनाने कोणती कारवाई केली ही माहिती द्यावी.’’ त्यावर ‘तुम्ही वैयक्तिक बोलू नका. ज्यांनी पाडले असेल त्यांच्यावर कारवाई करा. असंसदीय बोलू नये, असे घोडेकर म्हणाल्या. त्यावर संतप्त झालेल्या सावळे म्हणाल्या, ‘‘एकीकडे कारवाई होऊ नये, म्हणून आमच्या नेत्यांच्या पाया पडायचे आणि दुसरीकडे मी स्वच्छ असल्याचा आव आणायचा. हे चुकीचे आहे. प्रशासनाने तातडीने गुन्हा दाखल करावा. नाही तर मला तुमच्या विरोधात अ‍ॅक्शन घ्यावी लागेल.’’स्वच्छता अभियनाच्या विषयाला मंजुरीसावळे आणि घोडेकर यांच्यामधील वाद अधिक वाढू लागल्याने सुरुवातीला महापौरांनी घोडेकर यांना खाली बसा, अशी सूचना केली. तरीही आरोप-प्रत्यारोप सुरूच राहिले म्हणून दोघींनीही खाली बसावे, असा आदेश महापौरांनी दिला. तरीही वाद मिटला नाही. म्हणून महापौरांनी स्वच्छ भारत अभियानाचा मूळ विषय मंजूर केला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड