शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

स्वच्छतागृह तोडणा-यांवर फौजदारी , सर्वसाधारण सभेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 03:13 IST

स्वच्छ भारत अभियानासंदर्भातील विषय सर्वसाधारण सभेपुढे चर्चेस आल्यानंतर ‘स्वच्छतागृहां’वरून स्थायी समिती सभापती सीमा सावळे आणि माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

पिंपरी : स्वच्छ भारत अभियानासंदर्भातील विषय सर्वसाधारण सभेपुढे चर्चेस आल्यानंतर ‘स्वच्छतागृहां’वरून स्थायी समिती सभापती सीमा सावळे आणि माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. ‘नेहरुनगरातील स्वच्छतागृह पाडणाºयांवर फौजदारी दाखल झालीच पाहिजे, असे सावळे म्हणाल्या. वादंग अधिक वाढू लागल्याने महापौरांनी स्वच्छभारत अभियानाच्या धर्तीवरीलस्वच्छ महाराष्टÑ अभियानाचा विषय मंजूर केला.महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. या विषयावर चर्चा होताना सुरुवातीला दत्ता साने यांनी ‘‘अनधिकृत बांधकामे, शास्तीबाबत विशेष सभा होणार होती. पक्षनेत्यांना या विषयाचा विसर पडला आहे. ती कधी घेणार ते सांगावे. अनधिकृत बांधकामे धोरण आणि शास्तीने नागरिक भयभीत आहेत, अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाची सद्य:स्थिती सभागृहापुढे यावे,’’ अशी मागणी केली. त्यावर महापौरांनी योग्य वेळ कळविली जाईल, असे सांगितले.त्यानंतर डॉ. वैशाली घोडेकर यांनी आपल्या भागातील स्वच्छतेचा प्रश्न सांगितला. त्या म्हणाल्या, ‘‘एचए मैदानावर मोठ्या प्रमाणावर काही लोकांनी पाले टाकली आहेत. या लोकांसाठी स्वच्छतागृह नसल्याने रस्त्यावरच शौचास जावे लागत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. या गोष्टीचे प्रशासनास गांभीर्य नाही.’’ त्यावर सीमा सावळे यांनी नेहरुनगरातील ‘स्वच्छतागृह’ पाडल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून दोन्ही सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.सावळे म्हणाल्या, ‘‘एकीकडे स्वच्छतागृह पाडायचे आणि दुसरीकडे तक्रारी करायच्या नेहरुनगरातील स्वच्छतागृह पाडण्याबाबत प्रशासनाने कोणती कारवाई केली ही माहिती द्यावी.’’ त्यावर ‘तुम्ही वैयक्तिक बोलू नका. ज्यांनी पाडले असेल त्यांच्यावर कारवाई करा. असंसदीय बोलू नये, असे घोडेकर म्हणाल्या. त्यावर संतप्त झालेल्या सावळे म्हणाल्या, ‘‘एकीकडे कारवाई होऊ नये, म्हणून आमच्या नेत्यांच्या पाया पडायचे आणि दुसरीकडे मी स्वच्छ असल्याचा आव आणायचा. हे चुकीचे आहे. प्रशासनाने तातडीने गुन्हा दाखल करावा. नाही तर मला तुमच्या विरोधात अ‍ॅक्शन घ्यावी लागेल.’’स्वच्छता अभियनाच्या विषयाला मंजुरीसावळे आणि घोडेकर यांच्यामधील वाद अधिक वाढू लागल्याने सुरुवातीला महापौरांनी घोडेकर यांना खाली बसा, अशी सूचना केली. तरीही आरोप-प्रत्यारोप सुरूच राहिले म्हणून दोघींनीही खाली बसावे, असा आदेश महापौरांनी दिला. तरीही वाद मिटला नाही. म्हणून महापौरांनी स्वच्छ भारत अभियानाचा मूळ विषय मंजूर केला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड