शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पर्यायी अहवाल स्वीकारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 06:35 IST

शहरामध्ये सध्या एचसीएमटीआर रिंगरोडचा प्रश्न पेटलेला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून समिती रिंगरोड रद्द करावा, रीअलायमेन्ट अर्थात पर्यायी अहवाल स्वीकारावा, अशी मागणी घरबचाव संघर्ष समितीने केली आहे.

रावेत : शहरामध्ये सध्या एचसीएमटीआर रिंगरोडचा प्रश्न पेटलेला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून समिती रिंगरोड रद्द करावा, रीअलायमेन्ट अर्थात पर्यायी अहवाल स्वीकारावा, अशी मागणी घरबचाव संघर्ष समितीने केली आहे.दाट वस्तीतून जाणाºया या कालबाह्य रिंगरोडमुळे सुमारे तीन हजार घरे व २५ हजार रहिवासी प्रत्यक्ष बाधित होणार आहेत. त्यामुळे समितीने याकरिता पर्याय अहवाल तयार केला आहे, या अहवालामुळेतीन विभागातील म्हणजेच बिजलीनगर (गुरुद्वारा, चिंचवडेनगर), थेरगाव, पिंपळे गुरव (कासारवाडी) परिसरातील नागरिकांची घरेवाचू शकतील, तसेच या पर्या यी मार्गामुळे इतर कोणाचेही घर पडणार नाही व कोणतेही नुकसान होणार नाही.या प्रकल्पाची ७० टक्के जागा पालिकेच्या ताब्यात आहे, उर्वरित ३० टक्के नवनगर विकास प्राधिकरण, औद्योगिक महामंडळ आणि पालिका प्रशासनाच्या अख्यत्यारित आहे. परंतु या जागेवर गेल्या ३० वर्षांपासून अनेक रहिवासी राहत आहेत. असा हा प्रस्तावित रस्ता जर योग्य मार्गाने वळविला, तर मात्र अनधिकृत घरांचा ज्वलंत प्रश्न त्वरित सुटू शकेल. याकरिता घर बचाव संघर्ष समितीने मुख्य समन्वयक विजय व पाटील यांच्या नावाने ‘री-अलायमेन्ट’ अहवाल बनविला आणि सर्व सरकारी स्वायत्त संस्थांना, पालिका प्रशासनाला, मंत्रालय नगररचना विभाग येथे जमा केलेला आहे.प्राधिकरण - महापालिकेचा रस्ता विकास आराखडा हा बदलणे क्रमप्राप्त ठरते. त्याकरिता समितीने हा ‘नकाशा री-अलायमेन्ट’अहवाल प्रशासनाला सादर केलेला आहे.(फ नकाशा) नवीन गावांचा समावेश, वाढलेली लोकसंख्या, अनधिकृत घरांची बांधकामे. कालबाह्य प्रकल्पामुळे सदरचा प्रश्न सध्या शहरामध्ये ‘आ’ करून उभा आहे. यामध्ये प्रशासनाने तोडगा काढणे आवश्यक आहे. नाहीतर शहराची शांतता भंग होऊ शकते. त्याचप्रमाणे कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे अहवालावरून दिसून येते. अहवालासंदर्भात घर बचाव संघर्ष समितीचे विजय पाटील म्हणाले, ‘‘प्राधिकरण नियोजन विभागाने याबाबत त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पालिकेच्या नगररचना विभागाने फेरसर्वेक्षण करून सदरच्या ‘एचसीएमटीआर’ रिंगरोडमध्ये अलायमेंट करणे आवश्यक आहे. या बदलामुळे गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, पिंपळे गुरव, रहाटणी, कासारवाडी परिसरातील हजारो घरे उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतील.