शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

पर्यायी अहवाल स्वीकारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 06:35 IST

शहरामध्ये सध्या एचसीएमटीआर रिंगरोडचा प्रश्न पेटलेला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून समिती रिंगरोड रद्द करावा, रीअलायमेन्ट अर्थात पर्यायी अहवाल स्वीकारावा, अशी मागणी घरबचाव संघर्ष समितीने केली आहे.

रावेत : शहरामध्ये सध्या एचसीएमटीआर रिंगरोडचा प्रश्न पेटलेला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून समिती रिंगरोड रद्द करावा, रीअलायमेन्ट अर्थात पर्यायी अहवाल स्वीकारावा, अशी मागणी घरबचाव संघर्ष समितीने केली आहे.दाट वस्तीतून जाणाºया या कालबाह्य रिंगरोडमुळे सुमारे तीन हजार घरे व २५ हजार रहिवासी प्रत्यक्ष बाधित होणार आहेत. त्यामुळे समितीने याकरिता पर्याय अहवाल तयार केला आहे, या अहवालामुळेतीन विभागातील म्हणजेच बिजलीनगर (गुरुद्वारा, चिंचवडेनगर), थेरगाव, पिंपळे गुरव (कासारवाडी) परिसरातील नागरिकांची घरेवाचू शकतील, तसेच या पर्या यी मार्गामुळे इतर कोणाचेही घर पडणार नाही व कोणतेही नुकसान होणार नाही.या प्रकल्पाची ७० टक्के जागा पालिकेच्या ताब्यात आहे, उर्वरित ३० टक्के नवनगर विकास प्राधिकरण, औद्योगिक महामंडळ आणि पालिका प्रशासनाच्या अख्यत्यारित आहे. परंतु या जागेवर गेल्या ३० वर्षांपासून अनेक रहिवासी राहत आहेत. असा हा प्रस्तावित रस्ता जर योग्य मार्गाने वळविला, तर मात्र अनधिकृत घरांचा ज्वलंत प्रश्न त्वरित सुटू शकेल. याकरिता घर बचाव संघर्ष समितीने मुख्य समन्वयक विजय व पाटील यांच्या नावाने ‘री-अलायमेन्ट’ अहवाल बनविला आणि सर्व सरकारी स्वायत्त संस्थांना, पालिका प्रशासनाला, मंत्रालय नगररचना विभाग येथे जमा केलेला आहे.प्राधिकरण - महापालिकेचा रस्ता विकास आराखडा हा बदलणे क्रमप्राप्त ठरते. त्याकरिता समितीने हा ‘नकाशा री-अलायमेन्ट’अहवाल प्रशासनाला सादर केलेला आहे.(फ नकाशा) नवीन गावांचा समावेश, वाढलेली लोकसंख्या, अनधिकृत घरांची बांधकामे. कालबाह्य प्रकल्पामुळे सदरचा प्रश्न सध्या शहरामध्ये ‘आ’ करून उभा आहे. यामध्ये प्रशासनाने तोडगा काढणे आवश्यक आहे. नाहीतर शहराची शांतता भंग होऊ शकते. त्याचप्रमाणे कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे अहवालावरून दिसून येते. अहवालासंदर्भात घर बचाव संघर्ष समितीचे विजय पाटील म्हणाले, ‘‘प्राधिकरण नियोजन विभागाने याबाबत त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पालिकेच्या नगररचना विभागाने फेरसर्वेक्षण करून सदरच्या ‘एचसीएमटीआर’ रिंगरोडमध्ये अलायमेंट करणे आवश्यक आहे. या बदलामुळे गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, पिंपळे गुरव, रहाटणी, कासारवाडी परिसरातील हजारो घरे उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतील.