शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक गावांची कामे ठप्प, योग्य वेळी निधी प्राप्त न झाल्याने विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:48 IST

माळीण दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनातर्फे शोधण्यात आलेल्या धोकादायक २३ गावांची विकासकामे पावसामुळे ठप्प आहेत. राज्य शासनाकडून या गावांसाठी योग्य वेळी निधी प्राप्त न झाल्यामुळे या गावांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे शक्य झाले नाही, असे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

पुणे : माळीण दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनातर्फे शोधण्यात आलेल्या धोकादायक २३ गावांची विकासकामे पावसामुळे ठप्प आहेत. राज्य शासनाकडून या गावांसाठी योग्य वेळी निधी प्राप्त न झाल्यामुळे या गावांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे शक्य झाले नाही, असे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे धोकादायक गावांची कामेही निविदा प्रक्रियेत अडकून राहिल्याचे बोलले जात आहे.जिल्ह्यातील वेल्हे, मुळशी, भोर, जुन्नर, आंबेगाव आणि मावळ या तालुक्यांतील २३ गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला देण्यात आला होता.त्यानुसार संबंधित गावांभोवती सुरक्षा भिंत बांधणे, पावसाच्या पाण्याला योग्य दिशा देणे, झाडे लावणे आदी कामे केलीजाणार होती. त्यामुळे शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. गेल्या वर्षी ही या गावांच्या विकासकामांसाठी निधी नव्हता. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून निधी घेण्याबाबत चर्चा झाली होती.फुलवडेजवळील भगतवाडी, माळीण परिसरातील परसवाडी, आसाणे, जांभोरीजवळील काळेवाडी आणि बेंडारवाडी (सर्व आंबेगाव तालुका), लोहगड, ताजे, बोरज, तुंग-भैरवनाथ मंदिर परिसर, माळवाडी, माऊ गबाळे वस्ती, माऊ मोरमाची वाडी, भुशी (सर्व मावळ), मोरगिरी पदर वस्ती, भोमाळे (खेड), जांभूळवाडी (कोर्ले), पांगारी सोनारवाडी, डेहेन, धानवली खालची (सर्व भोर), घुटके (मुळशी), आंबवणे, घोल (वेल्हा), निमगिरी अंतर्गत तळमाची (जुन्नर).त्यामुळे या गावांची कामे सुरू करण्यास विलंब झाला.जिल्हा प्रशासनातर्फे काही गावांची विकास कामे सुरू करण्यत आली होती.तर, काही गावांच्या कामांची निविदा काढण्यात आली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या