शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिला दिलासा

By admin | Updated: August 18, 2015 23:47 IST

चॉकलेट, गोळ्या, बिस्किटांऐवजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात दुष्काळी भागातील, डोक्यावर पाणी घालून डाळिंबाच्या बागा जगविणारे हरितक्रांती फार्मर्स क्लब, उंबरगाव

पिंपरी : चॉकलेट, गोळ्या, बिस्किटांऐवजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात दुष्काळी भागातील, डोक्यावर पाणी घालून डाळिंबाच्या बागा जगविणारे हरितक्रांती फार्मर्स क्लब, उंबरगाव, (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शेतकऱ्यांची डाळिंबे विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा अभिनव उपक्रम माणमधील अभिनव फार्मर्स क्लबतर्फे राबविण्यात आला. या उपक्रमातून होणाऱ्या डाळिंबविक्रीचे सर्व पैसे उंबरगाव येथील शंकर पवार आणि त्यांच्या फर्ममधील शेतकऱ्यांना देण्यात आले.डाळिंब विकत घेऊन माण तालुक्यातील सुनील नामदेव भरणे, माजी उपसरपंच माण आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांनी जिल्हा परिषद शाळा, माण येथील २००० विद्यार्थ्यांना डाळिंबवाटप करून सोलापूरच्या शेतकऱ्यांना मदत केली आहे.मुळशी तालुक्यातील सुरेश हुलावळे यांनी या शेतकऱ्यांची डाळिंब विकत घेऊन हिंजवडी, माण अपंग शाळा, चांदे, नांदे, मूलखेड, घोटवडे येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये वाटप करून शेतकऱ्यांना मदत केली.माण येथील सामाजिक कार्यकर्ते राम बोडके यांनी जिल्हा परिषद शाळा, बोडकेवाडी येथील १५० विद्यार्थी व नागरिकांना वाटून एक वेगळा उपक्रम येथे सुरू केला आहे. अशोक अप्पा साठे यांनी पिंपरी-चिंचवडमधील वेगवेगळ्या शाळांमध्ये डाळिंब विकत घेऊन वाटप करण्यात आले. चॉकलेटऐवजी डाळिंब मिळाल्याने विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला. डाळिंबामुळे हिमोग्लोबीनमध्येही वाढ होते.चंद्रकांत भूमकर भूमकरवस्ती यांनीही भूमकरवस्तीवरील शाळेमध्ये डाळिंबवाटप करून शेतकऱ्यांना मदत केली. अशा पद्धतीने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यामध्ये ५ टन डाळिंबांचे वाटप करून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली. अभिनव फार्मर्स क्लबच्या या उपक्रमाचे ज्ञानेश्वर बोडके, शंकर पवार, भानुदास वैराट यांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)