शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड : स्वच्छता अभियानासाठी उभारला महागडा मंडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 02:28 IST

गेल्या महिन्यात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओंनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विकासकामे करण्यासाठी बोर्डाकडे पैसे नसल्याचे जाहीर केले होते.

देहूरोड - गेल्या महिन्यात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओंनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विकासकामे करण्यासाठी बोर्डाकडे पैसे नसल्याचे जाहीर केले होते. याला अवघे तीन आठवडे उलटले असताना शनिवारी झालेल्या स्वच्छता अभियानाच्या उद्घाटनालाही आलिशान महागडा मंडप टाकण्यात आला होता. ‘होऊ द्या खर्च पद्धती’ अंगलट येऊनही पुन्हा नव्या जोमाने खर्च करण्यात येत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.स्वच्छ भारत अभियानाच्या चौथ्या वर्धानपदिनानिमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ हा संदेश देत स्वच्छतेसाठी जनआंदोलन गतिमान करण्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने गांधी जयंतीपर्यंत चालणाऱ्या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला़ त्या वेळी ते बोलत होते. या वेळी बोर्ड उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, बोर्ड सदस्य रघुवीर शेलार, विशाल खंडेलवाल, ललित बालघरे, लष्करी मुख्यालयाचे कर्नल विवेक कोचर, कर्नल पाटील, डॉ़ त्रिंबक वाकचौरे यांच्यासह देहूरोड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अ‍ॅड़ कृष्णा दाभोळे, भाजपचे शहराध्यक्ष अ‍ॅड़ कैलास पानसरे, नंदकुमार पिंजण, तुकाराम जाधव, मेहरबानसिंग आदी नागरिक, बोर्डाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीईओ सानप यांनी उपस्थित सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. आमदार भेगडे, सीईओ सानप, उपाध्यक्ष नाईकनवरे, शेलार यांनी मनोगत व्यक्त केले.स्वच्छता राखणे ही केवळ कॅन्टोन्मेंट बोर्डाची जबाबदारी नसून, सर्वांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर भर द्यावा, स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी, सर्वांनी अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन मावळचे आमदार संजय भेगडे यांनी देहूरोड येथे केले.सीईओ सानप यांनीप्रास्तविक केले. सुनील गुरव यांनी सूत्रसंचालन केले. आरोग्य निरीक्षक किरण गोंटे यांनी आभार मानले. कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संयोजन केले .देहूरोड परिसरात रॅलीस्वच्छ भारत अभियानाचा चौथ्या वर्धापन दिनानिमित्त स्वच्छतेसाठी जनजागृती कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळांतील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी, बोर्डातील सर्व अधिकारी, पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व बोर्ड कर्मचाºयांसह बोर्ड कार्यालयापासून देहूरोड परिसरात रॅली काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या हातात स्वच्छतेचे संदेश देणारे फलक झळकत होते. स्वच्छता अभियानाची सुरुवात गेल्या वर्षी लोकप्रतिनिधींनी हातात झाडू घेऊन केली होती. मात्र या वर्षी तसे घडले नाही.गेल्या वर्षी कॅन्टोन्मेंट बोर्डाने राबविलेल्या स्वच्छता अभियानाच्या उद्घाटनाच्या वेळी उभारलेल्या मंडपासाठी चक्क ६३ हजार ६२५ व सांगता सोहळ्यासाठी ५९ हजार ८५० रुपयांचा मंडप उभारण्यात आलेला होता. तसेच अभियानात गौरवचिन्ह, प्रमाणपत्रे, पदके यांवर ४५ हजार ९०० रुपये, तसेच अभियानासाठी छापलेल्या फ्लेक्ससाठी १ लाख ७१ हजार १४७ रुपये खर्च केल्याची माहिती उपलब्ध झाली.

 

टॅग्स :dehuroadदेहूरोडnewsबातम्या