शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

देहूचे पाणी पिंपरी-चिंचवडला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:52 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील वाढीव क्षेत्रातील गावांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी आंद्रा आणि भामा आसखेड धरण पाणीपुरवठा योजनेंतर्गत बोडकेवाडी येथील धरणातून पाणी उचलण्यात येणार असून, यासाठी बोडकेवाडी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या ताब्यातील शिल्लक जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठा विभागाने केली आहे.

देहूगाव : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील वाढीव क्षेत्रातील गावांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी आंद्रा आणि भामा आसखेड धरण पाणीपुरवठा योजनेंतर्गत बोडकेवाडी येथील धरणातून पाणी उचलण्यात येणार असून, यासाठी बोडकेवाडी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या ताब्यातील शिल्लक जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठा विभागाने केली आहे.मात्र, केवळ देहूच्या पाणीपुरवठा योजनेसाठी येथील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत त्यांनी दिलेल्या जागेवर महापालिकेच्या पालिका व जीवन प्राधिकरण किंवा शासनाच्या एखाद्या अधिकाºयाच्या मदतीने हे जमिनीचे हस्तांतरण करण्याचे काम करीत आहे की काय, त्यांच्यात काही अर्थपूर्ण व्यवहार झाला आहे काय असा सवाल करीत असून, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी माजी सरपंच हेमा मोरे यांनी केली आहे.या योजनेसाठी जागा हस्तांतरित करण्यासंदर्भातील मागणी पत्राद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे केली आहे. ही मागणी त्यांनी १४ डिसेंबर २०१७ च्या आयुक्त यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ही मागणी केली असून, तसे पत्रही जीवन प्राधिकरण यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे देहूकरांचाच घसा पाण्याअभावी कोरडा असताना देहूकरांच्या पाण्यावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका डल्ला मारणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. यासाठी देहूकरांनी जागृत होऊन पाणी वाचविणे आवश्यक असल्याचे मत सरपंच उषा चव्हाण व माजी सरपंच हेमा मोरे यांनी व्यक्त केले.आंद्रा व भामा आसखेड धरणातील मुख्य जलवाहिनी मंगरूळ व करंजविहिरे ते नवलाख उंब्रे येथील नियोजित बीपीटीपर्यंत व एकत्रित गुरूत्व जलवाहिनी नवलाख उंब्रे ते बीपीटी चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने पर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी देहू येथील बोडकेवाडी बंधाºयातून पाणी उचलण्याचे नियोजन केले असून, त्याबाबतचा आराखडा तयार करून जागेची पाहणीदेखील केली आहे. या योजनेसाठी आंद्रा धरण पाणी पुरवठा योजनेंतर्गत देहू येथील बोडकेवाडी बंधाºयाजवळ जॅकवेल व पंपिग स्टेशन उभारणे आवश्यक आहे. जॅकवेल व पंपिग स्टेशन बांधण्यासाठी लागणारी आवश्यक जागा आराखड्यानुसार नदीजवळ जागा उपलब्ध असून ही जागा सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या ताब्यात आहे.>शेतकºयांमध्ये वादमात्र, या जागेच्या मालकी हक्क व जागेचा ताब्यावरून शेतकरी व जीवन प्राधिकरण यांच्यात वादात देहूची पाणीपुरवठा योजनाही काही दिवस रखडली होती. मात्र, या जागेवर सध्या जीवन प्राधिकरणाचा ताबा आहे. असे असताना ही पिंपरी-चिंचवड महापालिका येथील शेतकºयांना व ग्रामपंचायत यांना अंधारात ठेवून या जागेचे हस्तांतरण मागत आहे. हे हस्तांतरण झाले तर मूळ मालक असलेले शेतकरी यांच्या तोंडाला पाने पुसली.ही जागा महापालिकेला हस्तांतरण करण्याचा घाट शासकीय अधिकाºयांनी घातला आहे की काय असा सवाल येथील शेतकरी व ग्रामपंचायत पदाधिकारी करीत आहेत. केवळ देहूच्या पाणीपुरवठा योजनेसाठी येथील शेतकºयांनी दिलेल्या जागेवर महापालिका व जीवन प्राधिकरण किंवा शासनाच्या एखाद्या अधिकाºयांच्या मदतीने हे जमिनीचे हस्तांतरण करण्याचे काम करीत आहे की काय, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी हेमा मोरे यांनी केली आहे.