शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

‘सीएसआर’साठी कंपन्या उदासीन, परराज्यासाठी केली जाते मोठी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:02 IST

आयटीनगरीतील गावांची व्यथा : परराज्यासाठी केली जाते मोठी मदत

हिंजवडी : हिंजवडी आयटीनगरी परिसरात माहिती-तंत्रज्ञान, तसेच खासगी कंपन्यांचे मोठे जाळे आहे. मात्र ठरावीक गावांचा अपवाद वगळता परिसरातील इतर गावे, वाड्या-वस्त्यांना सीएसआर निधीतून मदत करण्याबाबत या कंपन्या उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे.

आयटीनगरीमध्ये माहिती-तंत्रज्ञान, तसेच इतर २५० हून अधिक कंपन्या आहेत. कंपनी कायदा २०१३ कलम १३५ नुसार ज्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल एक हजार कोटींपेक्षा जास्त आहे किंवा वार्षिक निव्वळ नफा ५ कोटी आहे, अशा कंपन्यांना नफ्याच्या किमान दोन टक्के निधी समाजासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. येथील कंपन्यांकडून केरळमधील महापूर, उत्तराखंडचा महाप्रलय, राज्यातील दुष्काळग्रस्त गावे, सामाजिक संस्था, आश्रमशाळा यांना मदतीचा ओघ सुरू असतो. मात्र, आयटीनगरीतील गावांना कंपनी सीएसआर निधीतून फारशी मदत होत नसल्याचे ग्रामपंचायतींकडून सांगितले जाते. आयटीनगरीतील माणमधील जिल्हा परिषद शाळेची भव्य इमारत, तसेच विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र संगणक लॅब, २५ संगणक, ग्रंथालयासाठी उपयुक्त पुस्तके, स्वखचार्तून दर शनिवारी मार्गदर्शन शिबिरे, शौचालय, तसेच नेरे गावामध्ये शाळेची इमारत अशा प्रकारची मदत झालेली आहे. लगतची इतर गावे मात्र मागील काही वर्षांपासून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनसुद्धा कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येते. ज्या परिसरात कंपन्या विस्तारलेल्या आहेत, त्या परिसरातील गावांना सीएसआर निधी खर्च करताना प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे काही ग्रामस्थ, पदाधिकाऱ्यांचे मत आहे.हिंजवडी ग्रामपंचायत हद्दीत ९० पेक्षा जास्त कंपन्या आहेत. दीड वर्षापासून अनेक कंपन्यांना सीएसआर निधीतून मदत मिळण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र कोणाकडूनही कसलीच मदत मिळाली नाही की केलेल्या पत्रव्यवहाराला उत्तरसुद्धा मिळालेले नाही. सगळीच विकासकामे ग्रामपंचायत करू शकत नाही. त्यामुळे जवळील कंपन्यांकडे मदत मागितली जाते. कंपन्यांनीसुद्धा सीएसआर निधी खर्च करताना स्थानिक गावांचा प्राधान्याने प्रथम विचार करणे गरजेचे आहे.- तुळशीदास रायकर, ग्रामविकास अधिकारी, हिंजवडी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड