शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

न्यायालयाचा निकाल : टाटा मोटर्स कामगारांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:44 IST

चौकशी समिती ठरवली अयोग्य

पिंपरी : टाटा मोटर्समधील सहा कामगार नेत्यांवर बडतर्फ करण्याची कारवाई काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. त्यास कामगारांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार कामगार न्यायालयात सुनावणी झाली असून, चौकशी समिती अयोग्य असल्याचा निकाल कामगार न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे संबंधित कामगारांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

औद्योगिकनगरीतील टाटा मोटर्स कंपनीतील वेतनकरारांचा प्रश्न अनेक दिवस रखडला होता. वेतनवाढ रखडल्याने कामगारांची बाजू कामगार नेत्यांनी लावून धरली होती. त्यामुळे बारा सदस्यांची कंपनीने खातेनिहाय चौकशी केली. त्यात सहा जणांवर बडतर्फ करण्याची कारवाई केली, असे सुरेश फाले यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले, चौकशी समितीने माझे मत ऐकून घेतले नाही. चौकशी चुकीच्या पद्धतीने केली. या कारवाईबाबत कामगार न्यायालयात दाद मागितली होती. २०१७ मध्ये दावा दाखल केला होता. याप्रकरणी ६ आॅगस्टला निकाल लागला आहे.

चौकशी समिती अयोग्य असल्याचा निकाल कामगार न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे कंपनीविरोधात फौजदारीकारवाई करणार आहे, असे फाले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. फाले यांच्या वतीने अ‍ॅड. प्रशांत क्षीरसागर, अनिरुद्ध सानप, संकेत मोरे यांनी काम पाहिले.बेशिस्तीबद्दल कारवाईटाटा मोटर्सच्या संबंधित कामगारांवर बेशिस्तीबद्दल खातेनिहाय चौकशी करुन कायदेशीररित्या बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींनी दिली. तसेच न्यायालयाची प्रत मिळाल्यानंतर कंपनीची बाजू मांडण्यात येईल, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयTataटाटाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड