शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

भ्र्रष्टाचारमुक्त, पारदर्शक कारभाराची प्रतीक्षा, अनधिकृतवरील शास्ती करमाफीचा रखडला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:26 IST

महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या कारकिर्दीस १४ मार्चला एक वर्ष पूर्ण होत आहे. ‘भय आणि भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक कारभाराचे अभिवचन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपाला आत्मपरीक्षणाची गरज आहे.

पिंपरी : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या कारकिर्दीस १४ मार्चला एक वर्ष पूर्ण होत आहे. ‘भय आणि भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक कारभाराचे अभिवचन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. वर्षभरात पोलीस आयुक्तालय, शास्तीकर माफी, अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, नदीसुधार कार्यक्रम, बीआरटी मार्गांना गती असे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. भाजपाच्या हाती सत्ता देऊन शहरवासीयांना प्रलंबित प्रश्न सोडविण्याची प्रतिक्षा कायम आहे.राष्टÑवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता उलथवून भारतीय जनता पक्षाला पिंपरी-चिंचवडकरांना सत्ता दिली. मात्र, वर्षभरात अजूनही सूर गवसलेला नाही. महापालिका निवडणुकीत दिलेली आश्वासने वर्षभरानेही पूर्ण होऊ शकलेली नाहीत. प्रशासकीय कामास शिस्त लावणे, अर्थसंकल्पाचा आकार लहान करणे, पक्षनेते आणि स्थायी समिती सभापतींनी शासकीय वाहन न वापरणे, शून्य तरतुदी रद्द करणे, आर्थिक दुर्बल घटकांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी चांगले निर्णय झाले असले, तरी उपसूचना स्वीकारणे, ताडपत्री खरेदी, ४२५ कोटीच्या कामांतील रिंग, वाकड येथील सीमाभिंत अशा विविध प्रकरणांत भ्रष्टाचाराचे आरोप मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. जाहीरनाम्यातील आश्वासने वर्षानंतरही सत्यात उतरली नसल्याचे दिसून येत आहे. वर्षानंतरही पक्षात अंतर्गत गटबाजीचे लोण अधिक असल्याचे दिसून येत आहे.पोलीस आयुक्तालयाची प्रतिक्षागेल्या वर्षभरात जुन्याच कामांची उद्घाटने आणि भूमिपूजने सत्ताधाºयांनी केली आहेत. निगडी ते दापोडी बीआरटी मार्ग आणि एम्पायर पुलाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. समाविष्ट गावांना अधिक निधी दिला असला, तरी प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. पोलीस आयुक्तालय मंजूर झाले असले, तरी त्याला मुहूर्त कधी लागणार, असा प्रश्न आहे. स्मार्ट सिटीत समावेश होऊनही प्रत्यक्षात केंद्राकडून एक रुपयाचाही निधी आलेला नाही. घरकुल योजनांचे आणि पिण्याच्या पाण्याचे केवळ डीपीआर झाले. प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. पक्षांतर्गत असणारी भांडणे आणि भ्रष्टाचाराचे झालेले आरोप भाजपाच्या हाती सत्ता देऊन शहरवासीयांना ‘खुशी कम गम अधिक’ आहे.>आश्वासनाची सद्य:स्थितीमहापालिकेत सत्तेत आल्यानंतर अनधिकृत बांधकांमांवरील शंभर टक्के शास्ती माफ करू असे आश्वासन दिले होते. शास्तीतही टप्पे करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली.शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात अधिसूचना जारी झाली असली, तरी जाचक अटींमुळे केवळ नऊच जणांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा शहरवासीयांना झालेला नाही.पाणी, आरोग्य, वैद्यकीय अशा मूलभूत सुविधा सक्षम झालेल्या नाहीत. एकाही प्रभागात पूर्णवेळ पाणी मिळत नाही. आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत. कोणाला ठेका द्यायचा, यावर संशोधन सुरू आहे.स्मार्ट सिटीत सहभाग करू, मेट्रोला गती देण्याचे आश्वासन होत आहे. स्मार्ट सिटीचे एकही काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. मेट्रोही पिंपरीपर्यंतच येऊन थांबली आहे.पवना, इंद्रायणी, मुळा नदीसुधार प्रकल्प राबवू या आश्वासनावर कार्यवाही नाही. डीपीआरही तयार नाही.भ्रष्टाचार आणि भयमुक्त पारदर्शक कारभार करू असे आश्वासन दिले होते. भ्रष्टाचाराचे सर्वाधिक आरोप झाले आहे. त्यामुळे सत्ताधाºयांचेच भय वाटू लागले आहे.पिंपरी-चिंचवडसाठी स्वंतत्र पोलीस आयुक्तालय सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला. पण प्रत्यक्षात मुहूर्त सापडलेला नाही. तारीख पे तारीख सुरू आहे.विविध शासकीय कार्यालये पिंपरीत आणू या आश्वासनापैकी एकही कार्यालय वर्षभरात आले नाही.हिंजवडी, वाकड परिसरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी हिंजवडी-शिवाजीनगर या मेट्रोची घोषणा झाली. त्याचा शहराला फायदा होणार नाही. जगताप डेअरी चौकातील ग्रेडसेपरेटरचे काम सुरू आहे.समाविष्ट गावांचा विकास करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असून, ४२५ कोटींच्या विकासकामांना गती दिली आहे. त्यात भोसरी विधानसभेतील कामे अधिक आहेत. चिंचवड आणि पिंपरीतील कामे कमी आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड