शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वीजसमस्यांनी दिघीतील ग्राहक त्रस्त, कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:51 IST

परिसर व उपनगरात वीजपुरवठा खंडित होणे, ग्राहकांना अवास्तव रकमेची वीज बिले, भूमिगत केबलची कामे पूर्ण झाली असतानाही वीजतारांचे खांब हटविण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी उघड्या तारांवर दिलेले अनेक वीजजोड, अशा अनेक समस्या आणि तक्रारींकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.

दिघी : परिसर व उपनगरात वीजपुरवठा खंडित होणे, ग्राहकांना अवास्तव रकमेची वीज बिले, भूमिगत केबलची कामे पूर्ण झाली असतानाही वीजतारांचे खांब हटविण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी उघड्या तारांवर दिलेले अनेक वीजजोड, अशा अनेक समस्या आणि तक्रारींकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. महावितरणच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयांना याबाबत सांगूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे दिघीकर संतप्त आहेत. या सर्व प्रकारांमुळे येथील सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सध्या विविध परीक्षांचा काळ आहे. त्यामुळे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यासात व्यस्त असतात. असे असतानाही महावितरण कंपनीकडून सातत्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. व्यावसायिक आणि व्यापाºयांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराविरोधात दिघीकरांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला होता.दिघीतील वीजसंबंधित समस्यांचे गाºहाणे महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांसमोर मांडण्यात आले. समस्या सोडवण्याचे आश्वासन संबंधित अधिकाºयांकडून देण्यात आले होते; मात्र अद्यापही समस्या सोडविण्यात आलेल्यानाहीत.दिघीत स्वतंत्र वीज तक्रार निवारण केंद्र नाही. दिघीतील वीज समस्येबाबत तक्रार करण्यासाठी भोसरीतील केंद्रात जावे लागते. त्यामुळे वेळ व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस दिघीतील तक्रारी वाढत आहेत. वाढत्या तक्रारी व अपुºया कर्मचाºयांची संख्या यामुळे तक्रार निवारणाला वेळ लागत आहे. दिघीत वीजतक्रार निवारण केंद्राची मागणी जुनी आहे. याकडे गांभीर्याने बघितले जात नाही. परिणामी दिघीतील स्थानिकांना भोसरीकडे धाव घेऊन तक्रार दाखल करावी लागते. परिसरातील बहुतांश भागात भूमिगत केबलची कामे पूर्ण झाली आहेत. वीजजोड देऊन पुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, विद्युत खांबावरून उघड्या तारा काढून घेतल्यानंतर ते खांब हटविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे स्थानिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खांब हटविण्यासाठी तक्रार करून पाच महिने झाले, तरी अद्याप ता काढले नसल्याची तक्रार नागरिकांनी बोलून दाखविली.दिघी परिसरातील ज्या भागांमध्ये भूमिगत केबलची कामे प्रलंबित आहेत, त्या ठिकाणीही महावितरणच्या विभागाची कामगिरी व्यवस्थित नाही. छत्रपती संभाजीमहाराज चौकातील व्यावसायिकांना लागणारी वीजजोडणी ही उघड्या विद्युत खांबावरून दिली आहे. प्रमाणापेक्षा जास्त जोड दिल्याने नेहमी शॉर्ट सर्किट होण्याचे प्रकार घडतात.>अपघाताची शक्यता : लोंबकळणाºया तारामहावितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभाराचा फटका ज्ञानेश्वर पार्क मधील रहिवाशांना बसत आहे. कित्येक वेळा महावितरणच्या अधिकाºयांना समस्या सांगूनही कामे होत नसल्याच्या नागरिकांच्यातक्रारी आहेत. परिसरात ८६ घरे आहेत. त्या सर्व घरांना वीजजोड देताना सुरक्षेची काळजी किंवा नियमांचे पालन करण्यात आल्याचे दिसून येत नाही. ज्ञानेश्वर पार्क मधील एकाच विद्युत खांबावर हे सर्व जोड दिले असल्याने वायरींचे जाळे तयार झाले आहे. वीज मीटरपासून ते विद्युत खांबापर्यंत वायरची लांबी शंभर मीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे वायर जळणे, हवेने तुटून पडणे, जोड निघून वीज बंद होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. २० फुटांच्या खांबावर वेलींचे प्रस्थ वाढले आहे. खांबाभोवती झाडाच्या फांद्या, वेली काढण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. विद्युत खांबावरील वीज तारा जमिनीपासून कमी उंचीवर आहेत. त्यामुळे या लोंबकळणाºया वीजतारांना वाहनांचा स्पर्श होतो. त्यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विजेच्या उघड्या तारा लोंबकळत असल्याने विजेचा प्रवाह वाहत असलेल्या तारा जोराच्या वाºयाने शॉर्ट सर्किट होऊन तुटून पडल्याच्या घटना सारख्या घडतात. दिघीकरांच्या या अनेक समस्यांवर मलमपट्टी न करता मुळापासून समस्या सोडविण्याची मागणी परिसरात जोर धरू पाहत आहे.