शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

वीजसमस्यांनी दिघीतील ग्राहक त्रस्त, कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:51 IST

परिसर व उपनगरात वीजपुरवठा खंडित होणे, ग्राहकांना अवास्तव रकमेची वीज बिले, भूमिगत केबलची कामे पूर्ण झाली असतानाही वीजतारांचे खांब हटविण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी उघड्या तारांवर दिलेले अनेक वीजजोड, अशा अनेक समस्या आणि तक्रारींकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.

दिघी : परिसर व उपनगरात वीजपुरवठा खंडित होणे, ग्राहकांना अवास्तव रकमेची वीज बिले, भूमिगत केबलची कामे पूर्ण झाली असतानाही वीजतारांचे खांब हटविण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी उघड्या तारांवर दिलेले अनेक वीजजोड, अशा अनेक समस्या आणि तक्रारींकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. महावितरणच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयांना याबाबत सांगूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे दिघीकर संतप्त आहेत. या सर्व प्रकारांमुळे येथील सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सध्या विविध परीक्षांचा काळ आहे. त्यामुळे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यासात व्यस्त असतात. असे असतानाही महावितरण कंपनीकडून सातत्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. व्यावसायिक आणि व्यापाºयांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराविरोधात दिघीकरांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला होता.दिघीतील वीजसंबंधित समस्यांचे गाºहाणे महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांसमोर मांडण्यात आले. समस्या सोडवण्याचे आश्वासन संबंधित अधिकाºयांकडून देण्यात आले होते; मात्र अद्यापही समस्या सोडविण्यात आलेल्यानाहीत.दिघीत स्वतंत्र वीज तक्रार निवारण केंद्र नाही. दिघीतील वीज समस्येबाबत तक्रार करण्यासाठी भोसरीतील केंद्रात जावे लागते. त्यामुळे वेळ व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस दिघीतील तक्रारी वाढत आहेत. वाढत्या तक्रारी व अपुºया कर्मचाºयांची संख्या यामुळे तक्रार निवारणाला वेळ लागत आहे. दिघीत वीजतक्रार निवारण केंद्राची मागणी जुनी आहे. याकडे गांभीर्याने बघितले जात नाही. परिणामी दिघीतील स्थानिकांना भोसरीकडे धाव घेऊन तक्रार दाखल करावी लागते. परिसरातील बहुतांश भागात भूमिगत केबलची कामे पूर्ण झाली आहेत. वीजजोड देऊन पुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, विद्युत खांबावरून उघड्या तारा काढून घेतल्यानंतर ते खांब हटविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे स्थानिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खांब हटविण्यासाठी तक्रार करून पाच महिने झाले, तरी अद्याप ता काढले नसल्याची तक्रार नागरिकांनी बोलून दाखविली.दिघी परिसरातील ज्या भागांमध्ये भूमिगत केबलची कामे प्रलंबित आहेत, त्या ठिकाणीही महावितरणच्या विभागाची कामगिरी व्यवस्थित नाही. छत्रपती संभाजीमहाराज चौकातील व्यावसायिकांना लागणारी वीजजोडणी ही उघड्या विद्युत खांबावरून दिली आहे. प्रमाणापेक्षा जास्त जोड दिल्याने नेहमी शॉर्ट सर्किट होण्याचे प्रकार घडतात.>अपघाताची शक्यता : लोंबकळणाºया तारामहावितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभाराचा फटका ज्ञानेश्वर पार्क मधील रहिवाशांना बसत आहे. कित्येक वेळा महावितरणच्या अधिकाºयांना समस्या सांगूनही कामे होत नसल्याच्या नागरिकांच्यातक्रारी आहेत. परिसरात ८६ घरे आहेत. त्या सर्व घरांना वीजजोड देताना सुरक्षेची काळजी किंवा नियमांचे पालन करण्यात आल्याचे दिसून येत नाही. ज्ञानेश्वर पार्क मधील एकाच विद्युत खांबावर हे सर्व जोड दिले असल्याने वायरींचे जाळे तयार झाले आहे. वीज मीटरपासून ते विद्युत खांबापर्यंत वायरची लांबी शंभर मीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे वायर जळणे, हवेने तुटून पडणे, जोड निघून वीज बंद होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. २० फुटांच्या खांबावर वेलींचे प्रस्थ वाढले आहे. खांबाभोवती झाडाच्या फांद्या, वेली काढण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. विद्युत खांबावरील वीज तारा जमिनीपासून कमी उंचीवर आहेत. त्यामुळे या लोंबकळणाºया वीजतारांना वाहनांचा स्पर्श होतो. त्यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विजेच्या उघड्या तारा लोंबकळत असल्याने विजेचा प्रवाह वाहत असलेल्या तारा जोराच्या वाºयाने शॉर्ट सर्किट होऊन तुटून पडल्याच्या घटना सारख्या घडतात. दिघीकरांच्या या अनेक समस्यांवर मलमपट्टी न करता मुळापासून समस्या सोडविण्याची मागणी परिसरात जोर धरू पाहत आहे.