शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

थंडी मानवली कडधान्यांना

By admin | Updated: March 3, 2017 01:35 IST

कडधान्यांना चांगलाच फायदा झाला असल्याचे मळवंडी ढोरे येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश ढोरे यांनी सांगितले.

शिवणे : पवन मावळात दर वर्षीच्या तुलनेने या वर्षी जास्त पडलेल्या थंडीचा हरभरा, वाटाणा, मसूर, श्रावणी घेवडा, पावडा यांसारख्या कडधान्यांना चांगलाच फायदा झाला असल्याचे मळवंडी ढोरे येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश ढोरे यांनी सांगितले.पवन मावळातील जवळजवळ ९० टक्के शेतकरी हा आपल्या शेतात बाराही महिने वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेत असतो. थंडीच्या कालावधीत येथील शेतकरी गहू, हरभरा, वाटाणा, मसूर, श्रावणी घेवडा, पावडा यांसारखे पिके घेत असतो. काही शेतकऱ्यांची हरभरा, वाटाणा आदी कडधान्य काढणीला आल्याने त्यांची मोठी लगबग चालू असल्याचे दिसत आहे. वाटाणा, हरभरा, मसूर पिके काढून त्यांना घराशेजारील अंगणात किंवा घरावरील पत्र्यावर वाळविण्यासाठी काही दिवस ठेवला जातो. आतील दाणे पूर्ण वाळल्याची खात्री केल्यानंतरच त्याची मळणी केली जात असल्याचे ढोरे यांनी सांगितले. ढोरे स्वत:, त्यांच्या पत्नी मालनबाई आणि कुटुंबातील इतरांची सध्या मळणीनंतर उफणणीची लगबग सुरू आहे.कडधान्यांना या थंडीचा चांगलाच फायदा झाला असल्याचे मळवंडी ढोरे येथील प्रगतिशील शेतकरी भाऊ विश्वनाथ ढोरे यांनी सांगितले. कडधान्यातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होत असल्याचे शेतकरी कुटुंबातील हिराबाई लोखंडे यांनी सांगितले.मावळ तालुक्यात भाताचे भरघोस उत्पादन घेतले जात असले तरी ज्वारी, बाजरी, गहू या सारखी पीकेही शेतकरी घेतात. विशेषत: घरच्या वापरासाठी ही पीके घेणारे अनेक शेतकरी आहेत. वर्षभर लागणाऱ्या डाळींसाठी कडधान्ये पीकविण्यातही अनेक प्रयत्न करतात. खरीप हंगामात आंतरपीक म्हणून थोड्या प्रमाणात कडधान्य घेतली जातात. अलीकडे डाळी किंवा कडधान्याचे दर वाढल्याने नगदी पीक म्हणूनही या पीकाकडे पाहिले जात आहे. (वार्ताहर)