शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

थंडी मानवली कडधान्यांना

By admin | Updated: March 3, 2017 01:35 IST

कडधान्यांना चांगलाच फायदा झाला असल्याचे मळवंडी ढोरे येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश ढोरे यांनी सांगितले.

शिवणे : पवन मावळात दर वर्षीच्या तुलनेने या वर्षी जास्त पडलेल्या थंडीचा हरभरा, वाटाणा, मसूर, श्रावणी घेवडा, पावडा यांसारख्या कडधान्यांना चांगलाच फायदा झाला असल्याचे मळवंडी ढोरे येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश ढोरे यांनी सांगितले.पवन मावळातील जवळजवळ ९० टक्के शेतकरी हा आपल्या शेतात बाराही महिने वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेत असतो. थंडीच्या कालावधीत येथील शेतकरी गहू, हरभरा, वाटाणा, मसूर, श्रावणी घेवडा, पावडा यांसारखे पिके घेत असतो. काही शेतकऱ्यांची हरभरा, वाटाणा आदी कडधान्य काढणीला आल्याने त्यांची मोठी लगबग चालू असल्याचे दिसत आहे. वाटाणा, हरभरा, मसूर पिके काढून त्यांना घराशेजारील अंगणात किंवा घरावरील पत्र्यावर वाळविण्यासाठी काही दिवस ठेवला जातो. आतील दाणे पूर्ण वाळल्याची खात्री केल्यानंतरच त्याची मळणी केली जात असल्याचे ढोरे यांनी सांगितले. ढोरे स्वत:, त्यांच्या पत्नी मालनबाई आणि कुटुंबातील इतरांची सध्या मळणीनंतर उफणणीची लगबग सुरू आहे.कडधान्यांना या थंडीचा चांगलाच फायदा झाला असल्याचे मळवंडी ढोरे येथील प्रगतिशील शेतकरी भाऊ विश्वनाथ ढोरे यांनी सांगितले. कडधान्यातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होत असल्याचे शेतकरी कुटुंबातील हिराबाई लोखंडे यांनी सांगितले.मावळ तालुक्यात भाताचे भरघोस उत्पादन घेतले जात असले तरी ज्वारी, बाजरी, गहू या सारखी पीकेही शेतकरी घेतात. विशेषत: घरच्या वापरासाठी ही पीके घेणारे अनेक शेतकरी आहेत. वर्षभर लागणाऱ्या डाळींसाठी कडधान्ये पीकविण्यातही अनेक प्रयत्न करतात. खरीप हंगामात आंतरपीक म्हणून थोड्या प्रमाणात कडधान्य घेतली जातात. अलीकडे डाळी किंवा कडधान्याचे दर वाढल्याने नगदी पीक म्हणूनही या पीकाकडे पाहिले जात आहे. (वार्ताहर)