शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

थंड प्रशासन, वाढले अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2015 00:49 IST

चिखली-तळवडे परिसरात नोव्हेंबर महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जणांना प्राण गमवावे लागले. अपघात होऊनही ते कशामुळे झाले,

शशिकांत जाधव , तळवडेचिखली-तळवडे परिसरात नोव्हेंबर महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जणांना प्राण गमवावे लागले. अपघात होऊनही ते कशामुळे झाले, ते रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत प्रशासनाने हालचाल केली नाही. प्रशासनाला आणखी किती बळींची प्रतीक्षा आहे, असा सवाल परिसरातून विचारला जात आहे. यामध्ये सोनवणेवस्ती, चिखली येथे दुचाकी व ट्रक यांची समोरासमोर टक्कर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार नीलेश वरगट या युवकाला प्राण गमवावा लागला. तळवडे येथे झालेल्या अपघातामध्ये दीपक चव्हाण यांचा बळी गेला, चिखली जाधववाडी येथे स्पाइन रोड परिसरात पायी रस्ता ओलांडणाऱ्या महापालिका कर्मचारी रोहिदास पठारे यांना धावत्या वाहनाने ठोकरल्याने मृत्यू झाला. हे तीनही अपघात एवढे भीषण होते की, अपघातग्रस्त व्यक्तींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बेशिस्त वाहन चालवणे, रस्त्यावर सूचना फलक नसणे, गतिरोधक नसणे यासारखी कारणे यामागे आहेत. पण त्या समस्या सोडविण्यासाठी कोणीच प्रयत्न केले नाहीत.देहू-आळंदी रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. तळवडे गावातून सॉफ्टवेअर पार्क, तसेच चाकण एम.आय.डी.सी.परिसरात होणारी प्रचंड वाहतूक लक्षात घेऊन तळवडे चौक ते कॅनबे चौक या मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जावे, अशी मागणी ‘फ’ प्रभाग समिती स्वीकृत सदस्य प्रवीण भालेकर यांनी केली आहे.शहरातील अनेक ठिकाणी केवळ प्रशासकीय चुकीमुळेच अपघाताच्या घटना घडत आहेत. पण तेथे कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. या प्रकरणी सामाजिक संस्थाही शांत असून, प्रशासकीय यंत्रणेला जाग आणण्यासाठी आंदोलनाचे शस्त्र उगारले जात नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा थंडच पडते. निगडी, प्राधिकरणातही अनेक रस्त्यावर वाहतुकीचे नियम मोडले जातात. परंतु, नियम मोडणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. नियम मोडणाऱ्यांनाच पाठिशी घातल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. या घटना रोखणे गरजेचे आहे.