शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

थंड प्रशासन, वाढले अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2015 00:49 IST

चिखली-तळवडे परिसरात नोव्हेंबर महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जणांना प्राण गमवावे लागले. अपघात होऊनही ते कशामुळे झाले,

शशिकांत जाधव , तळवडेचिखली-तळवडे परिसरात नोव्हेंबर महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जणांना प्राण गमवावे लागले. अपघात होऊनही ते कशामुळे झाले, ते रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत प्रशासनाने हालचाल केली नाही. प्रशासनाला आणखी किती बळींची प्रतीक्षा आहे, असा सवाल परिसरातून विचारला जात आहे. यामध्ये सोनवणेवस्ती, चिखली येथे दुचाकी व ट्रक यांची समोरासमोर टक्कर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार नीलेश वरगट या युवकाला प्राण गमवावा लागला. तळवडे येथे झालेल्या अपघातामध्ये दीपक चव्हाण यांचा बळी गेला, चिखली जाधववाडी येथे स्पाइन रोड परिसरात पायी रस्ता ओलांडणाऱ्या महापालिका कर्मचारी रोहिदास पठारे यांना धावत्या वाहनाने ठोकरल्याने मृत्यू झाला. हे तीनही अपघात एवढे भीषण होते की, अपघातग्रस्त व्यक्तींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बेशिस्त वाहन चालवणे, रस्त्यावर सूचना फलक नसणे, गतिरोधक नसणे यासारखी कारणे यामागे आहेत. पण त्या समस्या सोडविण्यासाठी कोणीच प्रयत्न केले नाहीत.देहू-आळंदी रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. तळवडे गावातून सॉफ्टवेअर पार्क, तसेच चाकण एम.आय.डी.सी.परिसरात होणारी प्रचंड वाहतूक लक्षात घेऊन तळवडे चौक ते कॅनबे चौक या मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जावे, अशी मागणी ‘फ’ प्रभाग समिती स्वीकृत सदस्य प्रवीण भालेकर यांनी केली आहे.शहरातील अनेक ठिकाणी केवळ प्रशासकीय चुकीमुळेच अपघाताच्या घटना घडत आहेत. पण तेथे कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. या प्रकरणी सामाजिक संस्थाही शांत असून, प्रशासकीय यंत्रणेला जाग आणण्यासाठी आंदोलनाचे शस्त्र उगारले जात नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा थंडच पडते. निगडी, प्राधिकरणातही अनेक रस्त्यावर वाहतुकीचे नियम मोडले जातात. परंतु, नियम मोडणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. नियम मोडणाऱ्यांनाच पाठिशी घातल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. या घटना रोखणे गरजेचे आहे.