शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

थंड प्रशासन, वाढले अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2015 00:49 IST

चिखली-तळवडे परिसरात नोव्हेंबर महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जणांना प्राण गमवावे लागले. अपघात होऊनही ते कशामुळे झाले,

शशिकांत जाधव , तळवडेचिखली-तळवडे परिसरात नोव्हेंबर महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जणांना प्राण गमवावे लागले. अपघात होऊनही ते कशामुळे झाले, ते रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत प्रशासनाने हालचाल केली नाही. प्रशासनाला आणखी किती बळींची प्रतीक्षा आहे, असा सवाल परिसरातून विचारला जात आहे. यामध्ये सोनवणेवस्ती, चिखली येथे दुचाकी व ट्रक यांची समोरासमोर टक्कर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार नीलेश वरगट या युवकाला प्राण गमवावा लागला. तळवडे येथे झालेल्या अपघातामध्ये दीपक चव्हाण यांचा बळी गेला, चिखली जाधववाडी येथे स्पाइन रोड परिसरात पायी रस्ता ओलांडणाऱ्या महापालिका कर्मचारी रोहिदास पठारे यांना धावत्या वाहनाने ठोकरल्याने मृत्यू झाला. हे तीनही अपघात एवढे भीषण होते की, अपघातग्रस्त व्यक्तींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बेशिस्त वाहन चालवणे, रस्त्यावर सूचना फलक नसणे, गतिरोधक नसणे यासारखी कारणे यामागे आहेत. पण त्या समस्या सोडविण्यासाठी कोणीच प्रयत्न केले नाहीत.देहू-आळंदी रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. तळवडे गावातून सॉफ्टवेअर पार्क, तसेच चाकण एम.आय.डी.सी.परिसरात होणारी प्रचंड वाहतूक लक्षात घेऊन तळवडे चौक ते कॅनबे चौक या मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जावे, अशी मागणी ‘फ’ प्रभाग समिती स्वीकृत सदस्य प्रवीण भालेकर यांनी केली आहे.शहरातील अनेक ठिकाणी केवळ प्रशासकीय चुकीमुळेच अपघाताच्या घटना घडत आहेत. पण तेथे कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. या प्रकरणी सामाजिक संस्थाही शांत असून, प्रशासकीय यंत्रणेला जाग आणण्यासाठी आंदोलनाचे शस्त्र उगारले जात नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा थंडच पडते. निगडी, प्राधिकरणातही अनेक रस्त्यावर वाहतुकीचे नियम मोडले जातात. परंतु, नियम मोडणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. नियम मोडणाऱ्यांनाच पाठिशी घातल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. या घटना रोखणे गरजेचे आहे.