शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

नारळ पाणी झाले स्वस्त..!, नागरिकांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:30 IST

सध्या बंद बाटलीतील पाणी पिणे हे फ्याड झाल्याचे दिसून येत आहे़ एखादा व्यक्ती घरात नळाचे पाणी पिण्यासाठी वापरतो मात्र घराबाहेर पडले की पहिली पसंती ही बंद बाटलीतील पाण्यालाच दिली जात असल्याचे चित्र सध्यातरी सर्वत्र दिसून येत आहे.

रहाटणी : सध्या बंद बाटलीतील पाणी पिणे हे फ्याड झाल्याचे दिसून येत आहे़ एखादा व्यक्ती घरात नळाचे पाणी पिण्यासाठी वापरतो मात्र घराबाहेर पडले की पहिली पसंती ही बंद बाटलीतील पाण्यालाच दिली जात असल्याचे चित्र सध्यातरी सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे एका लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत दिवसेंदिवस वाढतच आहे.या बाटली बंद पाण्यापेक्षा सध्या नारळाचे पाणी स्वस्त झाले आहे़ त्यामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याची बाटली विकत घेण्याच्या गरजेला व फॅशनला आता नारळ पाण्याने छेद दिला आहे. शहरात दररोज हजारो नारळपाण्याची विक्री होत असून, पिण्याच्या पाण्याची बाटली खरेदी करण्याऐवजी ग्राहक नारळपाणी घेण्यास पसंती देत आहेत.बाटलीबंद पाणी २० ते २५ रुपयांना विकले जात असताना नारळ पाणी मात्र अगदी १५ रुपयांपासून उपलब्ध झाल्याने नागरिकांचा कल त्याकडे वाढला आहे. सध्या शहरात रस्त्याच्या कडेला नारळाचे ढिगचेढिग दिसून येत आहेत़ २० रुपयाला एक, ५० रुपयाला तीन अशी नारळाची विक्री सुरू असल्याने नागरिकांचा कल थंड पाण्याच्या बाटलीपेक्षा नारळ पाण्याकडे वाढत आहे.राज्या बाहेरून नारळाची आवक मोठ्या प्रमाणात पिंपरी-चिंचवड शहरात होत आहे. दररोज सकाळी काळेवाडी परिसरात एक ते दोन ट्रक येतात. एका ट्रकमध्ये किमान आठ ते दहा हजार नारळ येत असतात व त्यासाठी वाहतूक खर्च तीस ते चाळीस हजार रुपये येत असल्याची माहिती ठोक विक्रेत्यांनी दिली. शहरातील अनेक भागात रस्त्याच्या कडेला दुकाने थाटून या नारळपाण्याची विक्री चालू आहे.तसेच काही हातगाड्यांवरही शहराच्या अंतर्गत भागात फिरून नारळपाण्याची विक्री केली जाते. फक्त पाण्याचे नारळ, पाणी व खोबºयाचा गर असलेले नारळ असे विविध प्रकारची नारळे विक्री होत आहेत. एक ते दोन ग्लास पाणी, मलई युक्त नारळ यातून मिळत असल्यामुळे नागरिक तहान भागविण्यासाठी नारळपाणी घेत आहेत.नारळ पाणी आरोग्यासाठी चांगले असते यामुळे शक्ती वाढते. तसेच उन्हात थंडावा मिळतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.रुग्णाला संजीवनी म्हणून व शारीरिक स्वास्थ्यासाठी नारळ पाण्यास पसंती दिली जाते. परंतु, आता टंचाईच्या काळात महागलेल्या बाटलीबंद पाण्याला पर्याय म्हणून लोक नारळपाण्याकडे पाहत आहेत. प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी, त्याची चव व त्याची गुणवत्ता याचे अनेक अनुभव गाठीशी असणारे ग्राहक शुद्धता, चव आणि नैसर्गिक शक्ती म्हणून नारळपाण्यास पसंती देत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड