शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नारळ पाणी झाले स्वस्त..!, नागरिकांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:30 IST

सध्या बंद बाटलीतील पाणी पिणे हे फ्याड झाल्याचे दिसून येत आहे़ एखादा व्यक्ती घरात नळाचे पाणी पिण्यासाठी वापरतो मात्र घराबाहेर पडले की पहिली पसंती ही बंद बाटलीतील पाण्यालाच दिली जात असल्याचे चित्र सध्यातरी सर्वत्र दिसून येत आहे.

रहाटणी : सध्या बंद बाटलीतील पाणी पिणे हे फ्याड झाल्याचे दिसून येत आहे़ एखादा व्यक्ती घरात नळाचे पाणी पिण्यासाठी वापरतो मात्र घराबाहेर पडले की पहिली पसंती ही बंद बाटलीतील पाण्यालाच दिली जात असल्याचे चित्र सध्यातरी सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे एका लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत दिवसेंदिवस वाढतच आहे.या बाटली बंद पाण्यापेक्षा सध्या नारळाचे पाणी स्वस्त झाले आहे़ त्यामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याची बाटली विकत घेण्याच्या गरजेला व फॅशनला आता नारळ पाण्याने छेद दिला आहे. शहरात दररोज हजारो नारळपाण्याची विक्री होत असून, पिण्याच्या पाण्याची बाटली खरेदी करण्याऐवजी ग्राहक नारळपाणी घेण्यास पसंती देत आहेत.बाटलीबंद पाणी २० ते २५ रुपयांना विकले जात असताना नारळ पाणी मात्र अगदी १५ रुपयांपासून उपलब्ध झाल्याने नागरिकांचा कल त्याकडे वाढला आहे. सध्या शहरात रस्त्याच्या कडेला नारळाचे ढिगचेढिग दिसून येत आहेत़ २० रुपयाला एक, ५० रुपयाला तीन अशी नारळाची विक्री सुरू असल्याने नागरिकांचा कल थंड पाण्याच्या बाटलीपेक्षा नारळ पाण्याकडे वाढत आहे.राज्या बाहेरून नारळाची आवक मोठ्या प्रमाणात पिंपरी-चिंचवड शहरात होत आहे. दररोज सकाळी काळेवाडी परिसरात एक ते दोन ट्रक येतात. एका ट्रकमध्ये किमान आठ ते दहा हजार नारळ येत असतात व त्यासाठी वाहतूक खर्च तीस ते चाळीस हजार रुपये येत असल्याची माहिती ठोक विक्रेत्यांनी दिली. शहरातील अनेक भागात रस्त्याच्या कडेला दुकाने थाटून या नारळपाण्याची विक्री चालू आहे.तसेच काही हातगाड्यांवरही शहराच्या अंतर्गत भागात फिरून नारळपाण्याची विक्री केली जाते. फक्त पाण्याचे नारळ, पाणी व खोबºयाचा गर असलेले नारळ असे विविध प्रकारची नारळे विक्री होत आहेत. एक ते दोन ग्लास पाणी, मलई युक्त नारळ यातून मिळत असल्यामुळे नागरिक तहान भागविण्यासाठी नारळपाणी घेत आहेत.नारळ पाणी आरोग्यासाठी चांगले असते यामुळे शक्ती वाढते. तसेच उन्हात थंडावा मिळतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.रुग्णाला संजीवनी म्हणून व शारीरिक स्वास्थ्यासाठी नारळ पाण्यास पसंती दिली जाते. परंतु, आता टंचाईच्या काळात महागलेल्या बाटलीबंद पाण्याला पर्याय म्हणून लोक नारळपाण्याकडे पाहत आहेत. प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी, त्याची चव व त्याची गुणवत्ता याचे अनेक अनुभव गाठीशी असणारे ग्राहक शुद्धता, चव आणि नैसर्गिक शक्ती म्हणून नारळपाण्यास पसंती देत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड