शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शहरात साथीच्या आजारांचे थैमान, नागरिकांची दवाखान्यांत रीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 05:08 IST

शहरात डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया, टायफॉईड आदी आजारांनी थैमान घातले असून, हजारो नागरिक या आजाराने हैराण झाले आहेत.

पिंपरी : शहरात डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया, टायफॉईड आदी आजारांनी थैमान घातले असून, हजारो नागरिक या आजाराने हैराण झाले आहेत.पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व खासगी रुग्णालये सध्या फुल्ल झाली आहेत. तर महापालिकेच्या रुग्णालयात गोरगरिबांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याबाबत जनजागृती करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण असूनही जिल्हा प्रशासन अंधारात कसे? स्थानिक प्रशासन व आरोग्य विभाग झोपा काढत आहेत का? अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.शहरात रोगाच्या साथींनी नागरिकांना पछाडले आहे. पिंपरी, चिंचवड, प्राधिकरण, रहाटणी, काळेवाडी आदी भागातील खासगी दवाखान्यात चिकुनगुनिया, डेंगी, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या साथीच्या रोगाची शिकारबनलेले शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. साथीच्या आजारानेजनता हैराण झाली असून, याबाबत प्रशासन मात्र सुस्त असल्याचेदिसून येत आहे. आरोग्य विभागाकडून या साथींवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतेही उपाय राबवले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. या ठिकाणी लाखो संख्येच्या शहरासाठी अत्यंत कमी कर्मचारी वर्ग आहे. सगळेच प्रशासकीय विभाग आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत. संबंधित गोरगरिबांच्या लोकांच्या जिवाशी खेळताना दिसत आहेत.बहुतांश प्रभागांत आजाराने थैमान घातले असून, निगडी, प्राधिकरण, यमुनानगर परिसरातील बहुतांश घरातील सदस्य आजारी असल्याचे दिसून येत आहे. आजारी पडलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात नेऊन रक्त तपासल्यानंतर डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया, टायफॉईड आदीं आजाराचे निदान होत आहे. तसेच खासगी रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात डेंगी व चिकनगुनियाच्या आजाराने रुग्ण दाखल झाले आहेत. रक्ताची तपासणी करण्याचे दर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो.महापालिकेच्या रुग्णालयात सध्या दररोज ४०० ते ५०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात विविध आजारांच्या तक्रारी घेऊन येत आहेत. साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले असून, परिसरातील प्रभागात स्वच्छता करणे तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न, नागरिकांत जनजागृती याकडे लक्ष देण्याची गरज आहे.