शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

शहरवासीयांनी अनुभवला पावसाबरोबर काळोख

By admin | Updated: November 24, 2015 00:59 IST

शहरात दुसऱ्या दिवशी सोमवारी दिवसभर पावसाची संततधार कायम होती. दुपारनंतर आकाशात काळे ढग जमा होऊन ढगाळ वातावरण झाले. दुपारी साडेचारनंतर अंधार दाटून येऊन सर्वत्र काळोख पसरला होता.

पिंपरी : शहरात दुसऱ्या दिवशी सोमवारी दिवसभर पावसाची संततधार कायम होती. दुपारनंतर आकाशात काळे ढग जमा होऊन ढगाळ वातावरण झाले. दुपारी साडेचारनंतर अंधार दाटून येऊन सर्वत्र काळोख पसरला होता. पावसाची रिपरिप, काही वेळ ऊन आणि थंडी असा तिहेरी वातावरणाचा अनुभव नागरिकांनी घेतला. धो धो पावसाने रविवारी रात्री शहवासीयांना झोडपून काढले होते. पाऊस इतका जोरदार होता की, समोरचे काही दिसत नव्हते. अनेक भागात पाणी साचून वाहतूककोंडी झाली. पाण्यामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरून अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याने जखमी झाले. सखल भागातील घरांमध्ये पाणी साचले. काही भागात वीज गायब झाली. दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळ आठपर्यंत पाऊस कायम होता. विश्रांती घेत दुपारी बारापर्यंत कडक ऊन पडले होते. सूर्यप्रकाशामुळे नागरिकांना हायसे वाटले. मात्र, दुपारनंतर वातावरण पुन्हा बदलले. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. त्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले. यात सूर्यही झाकोळला गेला. काहीशा अंधारातच दुपारी तीनच्या सुमारास पावसाची संततधार सुरू झाली. ती कायम होती. यामुळे अनेक भागात वाहतूक संथ होऊन कोंडी झाली. कालच्या पावसामुळे दुचाकीचालक आणि पादचाऱ्यांनी रेनकोटचा वापर केला. अनेकांची डोक्यावर छत्री धरली होती. दिवाळीची सुटी संपून आज अनेक शाळा सुरू झाल्या. या विद्यार्थ्यांना पावसात भिजत ये-जा करावी लागली. काही विद्यार्थ्यांनी रेनकोट घातले होते. पावसाची संततधार, ऊन आणि थंडी अशा तिहेरी वातावरणाचा अनुभव आज नागरिकांनी अनुभवला. दरम्यान, या संमिश्र वातावरणामुळे सर्दी, थंडी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब अशा आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. (प्रतिनिधी)लोणावळ्यात जोरदार सरीलोणावळा : वातावरणात झालेल्या बदलामुळे रविवारी दुपारी व रात्री लोणावळा शहरात तब्बल ४५ मिमी पाऊस झाल्याने सर्वत्र रस्ते व सखल भागात पाणी तुंबले होते. शनिवारी सायंकाळपासून लोणावळा परिसरात ढगाळ वातावरण झाले होते. यामुळे उष्मा वाढला होता. रविवारी दुपारी सव्वाच्या सुमारास शहरात जोरदार पाऊस झाला होता. रात्री पुन्हा लोणावळा शहर व ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा व वाऱ्याचा वेग इतका होता की, वाहने चालवताना समोरचे दिसत नव्हते. यामुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. दिवसा लागले दिवे...सायंकाळी साडेचारच्या सुमारास अंधार अधिक दाटून आल्याने सर्वत्र काळोख पसरला. त्याविषयी नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यामुळे घर, कार्यालय आणि परिसरातील विजेचे दिवे लवकरच पेटविण्यात आले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तर रात्रीच्या अंधारासारखे वातावरण निर्माण झाले होते.