शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

शहरवासीयांनी अनुभवला पावसाबरोबर काळोख

By admin | Updated: November 24, 2015 00:59 IST

शहरात दुसऱ्या दिवशी सोमवारी दिवसभर पावसाची संततधार कायम होती. दुपारनंतर आकाशात काळे ढग जमा होऊन ढगाळ वातावरण झाले. दुपारी साडेचारनंतर अंधार दाटून येऊन सर्वत्र काळोख पसरला होता.

पिंपरी : शहरात दुसऱ्या दिवशी सोमवारी दिवसभर पावसाची संततधार कायम होती. दुपारनंतर आकाशात काळे ढग जमा होऊन ढगाळ वातावरण झाले. दुपारी साडेचारनंतर अंधार दाटून येऊन सर्वत्र काळोख पसरला होता. पावसाची रिपरिप, काही वेळ ऊन आणि थंडी असा तिहेरी वातावरणाचा अनुभव नागरिकांनी घेतला. धो धो पावसाने रविवारी रात्री शहवासीयांना झोडपून काढले होते. पाऊस इतका जोरदार होता की, समोरचे काही दिसत नव्हते. अनेक भागात पाणी साचून वाहतूककोंडी झाली. पाण्यामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरून अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याने जखमी झाले. सखल भागातील घरांमध्ये पाणी साचले. काही भागात वीज गायब झाली. दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळ आठपर्यंत पाऊस कायम होता. विश्रांती घेत दुपारी बारापर्यंत कडक ऊन पडले होते. सूर्यप्रकाशामुळे नागरिकांना हायसे वाटले. मात्र, दुपारनंतर वातावरण पुन्हा बदलले. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. त्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले. यात सूर्यही झाकोळला गेला. काहीशा अंधारातच दुपारी तीनच्या सुमारास पावसाची संततधार सुरू झाली. ती कायम होती. यामुळे अनेक भागात वाहतूक संथ होऊन कोंडी झाली. कालच्या पावसामुळे दुचाकीचालक आणि पादचाऱ्यांनी रेनकोटचा वापर केला. अनेकांची डोक्यावर छत्री धरली होती. दिवाळीची सुटी संपून आज अनेक शाळा सुरू झाल्या. या विद्यार्थ्यांना पावसात भिजत ये-जा करावी लागली. काही विद्यार्थ्यांनी रेनकोट घातले होते. पावसाची संततधार, ऊन आणि थंडी अशा तिहेरी वातावरणाचा अनुभव आज नागरिकांनी अनुभवला. दरम्यान, या संमिश्र वातावरणामुळे सर्दी, थंडी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब अशा आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. (प्रतिनिधी)लोणावळ्यात जोरदार सरीलोणावळा : वातावरणात झालेल्या बदलामुळे रविवारी दुपारी व रात्री लोणावळा शहरात तब्बल ४५ मिमी पाऊस झाल्याने सर्वत्र रस्ते व सखल भागात पाणी तुंबले होते. शनिवारी सायंकाळपासून लोणावळा परिसरात ढगाळ वातावरण झाले होते. यामुळे उष्मा वाढला होता. रविवारी दुपारी सव्वाच्या सुमारास शहरात जोरदार पाऊस झाला होता. रात्री पुन्हा लोणावळा शहर व ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा व वाऱ्याचा वेग इतका होता की, वाहने चालवताना समोरचे दिसत नव्हते. यामुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. दिवसा लागले दिवे...सायंकाळी साडेचारच्या सुमारास अंधार अधिक दाटून आल्याने सर्वत्र काळोख पसरला. त्याविषयी नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यामुळे घर, कार्यालय आणि परिसरातील विजेचे दिवे लवकरच पेटविण्यात आले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तर रात्रीच्या अंधारासारखे वातावरण निर्माण झाले होते.