शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

शहरात महावितरणचा भोंगळ कारभार

By admin | Updated: August 31, 2016 01:00 IST

मागील अनेक दिवसांपासून रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात दिवसातून अनेक वेळा विद्युतपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढला आहे.

रहाटणी : मागील अनेक दिवसांपासून रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात दिवसातून अनेक वेळा विद्युतपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढला आहे. अचानक खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे काही वेळा घरातील विद्युत उपकरणेही नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. या परिसरातील अनेक ठिकाणच्या विद्युत ट्रान्सफॉर्मर झाडी-झुडपांच्या विळख्यात दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे अनेक वेळा विद्युतपुरवठ्याचा खेळखंडोबा होत असल्याची शंका नागरिक व्यक्त करीत आहेत.रहाटणी पवनानगर येथे नागरी वस्तीच्या शेजारी दोन विद्युत ट्रान्सफॉर्मर आहेत. एखाद्या वेळेस काही दुरुस्ती करायची आसल्यास त्या ठिकाणी जाता यावे म्हणून त्याला लोखंड गेट बसविण्यात आले आहे. मात्र, त्या गेटवर मोठ्या प्रमाणात गवत, वेली तयार झाली असल्याने आत सहजासहजी आत प्रवेश करणे कठीण आहे. या विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या शेजारीच नागरी वस्ती आहे. एखाद्या वेळेस या ठिकाणी अपघात घडण्याची भीती रहिवासी व्यक्त करीत आहेत. मागील पावसाळ्यात या विद्युत ट्रान्सफॉर्मरपैकी एक पवना नदीपात्रात पडला होता. हा विद्युत ट्रान्सफॉर्मरही झाडी, वेलीने वेढला गेला होता. त्या वेळीसुद्धा मोठी कसरत करावी लागली होती. तरी महावितरण कंपनीचे अधिकारी बोध घेताना दिसून येत आहेत. या विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या कंपाउंडमध्ये झाडी, वेली, गवत मोठ्या प्रमाणात तयार झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. नदीकाठावरच हे विद्युत ट्रान्सफॉर्मर असल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांच्या भीतीने नागरिक हैराण आहेत. अनेक वेळा महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना कल्पना देऊनही याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. यापेक्षाही भयावह परिस्थिती रहाटणी चौकातून रहाटणी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विद्युत ट्रान्सफॉर्मरची आहे . त्या ठिकाणी विद्युत ट्रान्सफॉर्मर आहे की नाही, हेच कळत नाही. विद्युत ट्रान्सफॉर्मर, विद्युततारा या झाडाने व वेलीने व्यापल्या आहेत. (वार्ताहर)अन्... विद्युतपुरवठा खंडित केला जातोमागील अनेक महिन्यांपासून दिवसातून अनेक वेळा विद्युतपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढला आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांना काहीच देणे घेणे नाही. ते जेव्हा दुरुस्ती करतील, तेव्हा करतील. त्यांना नागरिकांनी जाब विचारू नये, असे येथील अधिकाऱ्यांचे वर्तन आहे. मात्र, एखाद्या वेळेस वीज बिल वेळेवर भरले गेले नाही, तर मात्र कोणतीही पूर्वकल्पना न देता लगेच मीटरमधून विद्युतपुरवठा खंडित केला जातो. मग बिल भरून आगाऊ शंभर रुपयांची पावती करून पुन्हा वीजपुरवठा सुरूकरून घ्यावा लागतो. यात जशी तत्परता दाखवितात, तशीच तत्परता वीजपुरवठा खंडित झाल्यावरही अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी दाखवावी, अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.झीरो टक्के थकबाकीरहाटणी, पिंपळे सौदागर गावातील अनेक नागरिक सर्वसामान्य आहेत. काही नागरिकांच्या अडचणींमुळे एखाद्या वेळी बिल भरणा वेळेवर होत नाही. मात्र, विद्युतपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी घरी लगेच हजर होतात. मात्र, जे नागरिक सकाळी कामाला जातात, ते रात्रीच घरी परत येतात, तेव्हा त्यांच्या घरात लाइटच नसते. तेव्हा त्यांना कळते की, आपला विद्युतपुरवठा खंडित केला आहे. अनेक नागरिक रात्रीच महावितरणच्या कार्यालयात रात्री बारा वाजेपर्यंत पैसे भरताना अनेक वेळा दिसून येतात. हीच तत्परता अधिकाऱ्यांनी विद्युतपुरवठा खंडित झाल्यावर दाखवावी.