शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शहरवासियांचा अपेक्षाभंग

By admin | Updated: December 22, 2015 01:11 IST

महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्याच्या घोषणेने शहरवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, नंतर अचानक या योजनेतून वगळल्याने शहरवासीयांचा अपेक्षाभंग झाला.

पिंपरी : महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्याच्या घोषणेने शहरवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, नंतर अचानक या योजनेतून वगळल्याने शहरवासीयांचा अपेक्षाभंग झाला. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून शहराचा आणखी विकास साधता येईल, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि शहरवासीयांना होती. या योजनेसाठी ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे महापालिका पात्र ठरली. मात्र, नंतर अचानकपणे शहराला या योजनेतून वगळण्यात आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावरून शहरवासीयांनी संताप व्यक्त केला. विविध स्तरांतून निषेधही करण्यात आला. लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी दिल्लीत मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. शहरावर अन्याय झाल्याची भावना शहरातील नागरिकांमध्ये आहे. तर महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीने अजब कारभाराचे प्रदर्शन केले. वाकड येथील भुयारी मार्ग आणि थेरगावातील रस्त्यांसाठी ठेकेदाराला काम सुरू होण्याअगोदरच साडेदहा कोटी रुपये देण्याचा ‘आश्चर्यकारक’ निर्णय घेतला. मात्र, याबाबत उपरती झाल्यानंतर वाढीव खर्चाच्या दोन्ही उपसूचना मागे घेण्यात आल्या. यामुळे कारभाऱ्यांकडून सुरू असलेला ‘उद्योग’ शहरवासीयांसमोर आला. महापालिकेने आणलेले क्षयरोग तपासणी यंत्र वापराविना पडून असल्याच्या प्रकरणात तीन वैद्यकीय अधिकारी दोषी आढळले. या अधिकाऱ्यांवरील कारवाईचा प्रस्ताव महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी दप्तरी दाखल करण्याचा ठराव केला होता. मात्र, हा ठराव ‘लोकहिताविरुद्ध’ असल्याचे सांगत तो रद्द करण्याचा आदेश राज्य सरकारने महापालिकेला दिला. त्यातून चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभाऱ्यांना थेट राज्य सरकारकडून चपराक बसली. काळभोरनगर प्रभागातील राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक अविनाश टेकावडे यांची हत्या झाली. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या प्रभागाची पोटनिवडणूक जाहीर झाली. खराळवाडीतील क्षेत्रीय सभेत झालेला राडा लांच्छनास्पद होता. हा प्रकार शहरासाठी लाजिरवाणा ठरला. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेकडून भरविल्या जाणाऱ्या पवनाथडी जत्रेचे ठिकाण कोठे असावे, हा मुद्दा यंदाही चर्चेचा बनला. अखेर अजित पवार यांनी सूचना दिल्यानंतर पिंपरीतील एचए मैदानावर जत्रा भरविण्याचे निश्चित झाले. (प्रतिनिधी)