शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

केमिकलने गुदमरतोय नदीचा श्वास

By admin | Updated: November 9, 2016 02:34 IST

शहरातील सामान्यांच्या आरोग्याशी काहीही घेणे-देणे नसणाऱ्या नफेखोर कंपन्या त्यांच्या कारखान्यातील कचरा, राडारोडा व केमिकलमिश्रित काळीमाती बिनदिक्कतपणे नदीपात्रात फेकत आहेत.

चाकण : शहरातील सामान्यांच्या आरोग्याशी काहीही घेणे-देणे नसणाऱ्या नफेखोर कंपन्या त्यांच्या कारखान्यातील कचरा, राडारोडा व केमिकलमिश्रित काळीमाती बिनदिक्कतपणे नदीपात्रात फेकत आहेत. त्यामुळे नदीचा मात्र श्वास गुदमरू लागला आहे. इंद्रायणी पुलाजवळील नदीपात्रालगत हा सारा कचरा टाकला जात आहे, त्यामुळे नदीपात्रातील पाणी अत्यंत प्रदूषित होत आहे. हे सारे राडारोडा टाकण्याचे प्रकार सातत्याने होत असल्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, चाकणमधील एका फाउंड्रीमधील केमिकलमिश्रित काळीमाती नदीपात्रात व महामार्गाच्या बाजूला टाकत आहे. त्यामुळे नदीपात्र दूषित होऊन; तसेच रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांच्या डोळ्यांत, नाकातोंडात जाऊन अनेकदा अपघात झालेले आहेत, केमिकलमिश्रित काळीमाती उडाल्याने जनावरांच्या पोटात जाऊन जनावरेही दगावलेली आहेत.महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे, असा नागरिकांचा आरोप आहे. एका बाजूला गणपती विसर्जनामुळे नदी प्रदूषित होते, त्यामुळे गणपती हौदात बुडवावेत, असे आवाहन प्रदूषण मंडळ करते आणि नदीपात्रात हजारो टन फाउंड्रीमधील केमिकलमिश्रित काळीमाती नदीपात्रात टाकली जात असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. फाउंड्रीमधील वेस्टमटेरियल शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करावयास बोर्डाकडून अधिकृत एजन्सी नेमलेल्या असताना, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांवरच संशयाची सुई फिरत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डाने संबंधित कंपन्यांवर तातडीने कारवाई करून नदीपात्रात टाकली जाणारी केमिकलमिश्रित काळीमाती बंद करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.