शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘सारथी’ असून खोळंबा

By admin | Updated: October 19, 2015 01:50 IST

नागरिकांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी, तसेच महापालिकेशी संबंधित विविध विभागांच्या सुविधेबाबत माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या

मंगेश पांडे, पिंपरीनागरिकांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी, तसेच महापालिकेशी संबंधित विविध विभागांच्या सुविधेबाबत माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सारथी’ हेल्पलाइन प्रकल्पाची स्थिती सध्या असून नसल्यासारखी झाली आहे. तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेल्या सारथी हेल्पलाइनवर सुरुवातीला दिवसभरात सुमारे चारशे कॉल येत होते. त्यांच्या बदलीनंतर तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे कॉल येण्याचे प्रमाण चारशेहून अडीचशेवर आले आहे. अशातच आयुक्त राजीव जाधव यांनी ही सुविधा १ जानेवारीपासून चोवीस तास सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. यातून तरी व्यवस्थित सेवा मिळणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. ‘सिस्टिम आॅफ असिस्टिंग रेसिडेन्टस अँड टुरिझम थ्रो हेल्पलाइन इन्फॉर्मेशन’ (सारथी) ही हेल्पलाइन १५ आॅगस्ट २०१३ ला सुरू झाली. यातून ४५ प्रकारच्या सुविधांची माहिती दिली जाते. यामध्ये ३२ सुविधा महापालिकेशी संबंधित आहेत. तर ११ केंद्र व राज्य शासनाशी, तर दोन खासगी क्षेत्राशी संबंधित आहे. या सुविधेमुळे प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन माहिती घेण्यासाठी जाणाऱ्या वेळेची बचत होईल, असा उद्देश होता. डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांची खूप मोठी सोय झाली. माहिती घेण्यासह ठिकठिकाणच्या तक्रारीदेखील या हेल्पलाइनमार्फत अधिकाऱ्यांपर्यंत पोहचू लागल्या. एक कॉल केला, तरी समस्यांचे निराकरण होत होते. सुरुवातीला दिवसाला सुमारे चारशे कॉल येत होते. डॉ. परदेशी यांच्या बदलीनंतर ‘सारथी’वर करण्यात येणाऱ्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची तक्रार आहे. अशातच सकाळी सात ते रात्री दहा या वेळेत सुरू असणारी ही सुविधा आता चोवीस तास सुरू ठेवणार असल्याची घोषणा आयुक्त राजीव जाधव यांनी केली आहे. ‘सारथी हेल्पलाइन’बाबत नगरसेवकही नाराजप्रभागात कुठलीही समस्या निर्माण झाली की, त्याची सोडवणूक करण्यासाठी नगरसेवकांच्या घरचे उंबरे झिजवावे लागायचे. यामुळे नागरिक व नगरसेवकांचा संपर्क यायचा. मात्र, नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सारथी’ हेल्पलाइन कॉल केल्यास तातडीने प्रश्न सुटत होते. त्यामुळे नागरिकांचे नगरसेवकांकडे जाण्याचे प्रमाणही कमी झाले. मतदार दूर जाऊ लागला होता. यामुळे नगरसेवकांनी ‘सारथी’बाबत अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, डॉ. परदेशी यांची बदली झाल्यानंतर सारथीवर तक्रार केली, तरी त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.