शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लिंक रोडवरील स्मशानभूमीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 03:23 IST

रस्त्यावर कचरा फेकल्याने दुर्गंधीचा होतोय त्रास

पिंपरी : शहरातील चिंचवड लिंक रोड स्मशानभूमीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्मशानभूमीतील गैरसोर्इंसह परिसरात येणाऱ्या कुबट वासामुळे नागरिकांना अंत्यविधी करताना अडचणी येतात. येथील दहनशेड, निवाराशेड व स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे.लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीची देखरेखीअभावी दुरवस्था झाली आहे. चिंचवड लिंक रस्त्याने स्मशानभूमीच्या वाटेला लागल्यावर गैरसोर्इंची मालिकाच सुरू होते. येथे सर्वधर्मीय स्मशानभूमी असा फलक लावला आहे. त्या रस्त्याने पुढे गेल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसतो. येथे कचरा डेपो झाल्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्मशानभूमीमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच नागरिकांना नाकाला रुमाल लावावा लागतो. येथे भटकी कुत्री व डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा त्रास पादचाºयांना सहन करावा लागतो. येथील कचºयाची विल्हेवाट लावून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.स्मशानभूमीतील दहनशेडची चाळण झाली आहे. पत्र्यांना मोठमोठी छिद्र पडली आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी गळते. शेडवरील पत्रे पूर्णपणे कुजले आहेत. पाऊस सुरू असताना अंत्यविधी करण्याची वेळ आली, तर मृताच्या नातेवाइकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. येथे चार दहनजाळ्या आहेत. त्याचप्रमाणे दहनखड्डेही आहेत. दहनजाळ्यांची दुरवस्था झाली आहे. त्याच्या लोखंडी पट्ट्या वाकल्या आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांना धावपळ करावी लागते. स्मशानभूमी परिसरामध्ये जनावरे फिरत असतात. येथे विद्युतदाहिनी व विद्युत जाळीची व्यवस्था करण्यात आली आहे. बाजूलाच दफनभूमी आहे. मात्र देखरेखीचा अभाव असल्यामुळेत्यांची दुरवस्था झाली आहे. दफनभूमीमध्येही मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे.आवश्यक सोयी-सुविधांची वानवा असल्यामुळे स्मशानभूमीमध्ये नागरिकांची गैरसोयच जास्त होते. वेळेत साफसफाई होत नसल्यामुळे स्मशानभूमीची दुरवस्था होत आहे. येथे नियमित सफाई कामगार नेमण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची दुरवस्था होत आहे. मात्र, प्रशासनानेही सोईस्करपणे दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या अडचणीमध्ये भर पडत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड