शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

फोर जीच्या जमान्यातही ‘कॉल’ वेटिंगवर, भारतीय दूरसंचार प्राधिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 03:10 IST

जागतिक बाजारपेठा आता मोबाईलवरील सेव्हन जी इंटरनेट स्पीडबाबत बोलत आहेत. आत्ताच सहा जीबी-आठ जीबी रॅम इतक्या प्रचंड वेगाने डाटा प्रोसेस करणारे मोबाईल बाजारपेठेत अवतरु लागले आहेत.

- विशाल शिर्केपुणे : जागतिक बाजारपेठा आता मोबाईलवरील सेव्हन जी इंटरनेट स्पीडबाबत बोलत आहेत. आत्ताच सहा जीबी-आठ जीबी रॅम इतक्या प्रचंड वेगाने डाटा प्रोसेस करणारे मोबाईल बाजारपेठेत अवतरु लागले आहेत. देशाने देखील फाईव्ह जीची तयारी सुरु केली आहे. असे असतानाही अजूनही आपण कॉलची रेंज अखंडितपणे देण्यासाठी झटत असल्याचे वास्तव आहे.भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (टीआरएआय) दिलेल्या आकडेवारीवरुन ही माहिती समोर आली आहे. पूर्वी मोबाईल सेवा पुरविणाºया कंपन्यांच्या जाहिराती या येणारे आणि जाणारे कॉल दर किती याबाबत बोलत असत. गेल्या सतरा वर्षांत टप्प्याटप्प्याने येणारे आणि जाणाºया कॉलचे दर कमी होत आता ते फुकट झाले आहेत. आता इंटरनेटमुळे मोबाईल सेवेत क्रांती आली आहे.इंटरनेटच्या जमान्यात मोबाईल गेला असला, तरी या सेवेची प्राथमिकता असलेली कॉल सेवा अजूनही बाळसे धरताना दिसत नाही. अनेक भागात मोबाईलचा सिग्नल कमकुवत असणे, कॉल ड्रॉप होणे, कॉल न लागणे अथवा सेवेत अडथळा येणे अशा प्रकारच्या समस्यांना ग्राहक सामोरे जात आहेत. त्यातही सेवेत अडथळा निर्माण होणे आणि मोबाईल सिग्नल कमकुवत असणे याचा वाटा निम्मा आहे. हे चारही प्रकार मोबाईल कॉल व्यवस्थित न लागण्याशीच आहेत. त्यातही सिग्नल पुरेसा न मिळणे अथवा सेवेत व्यत्यय येणे हा प्रकार निश्चितच चांगले निदर्शक नाही. देशातील प्रमुख दोन कंपन्या असलेल्या एअरटेल आणि आयडिया या कंपन्यांच्या तक्रारीची आकडेवारी पाहिल्यास त्यावरुन अंदाज येऊ शकेल. जानेवारी ते ३१ सप्टेंबर २०१७ अखेरीपर्यंत सेवेत अडथळा येत असल्याच्या ५३४ तक्रारीएअरटेल विरोधात, तर १८४ तक्रारी आयडिया विरोधात ट्रायकडे दाखल झाल्या आहेत.सिग्नल कमकुवत असल्याच्या ६५५ तक्रारी एअरटेल अणि ७८ तक्रारी आयडियाच्या दाखल झाल्या. रिलायन्स जीओचे सेवेत अडथळा आणि सिग्नल कमकुवत असल्यायाचे प्रमाण अनुक्रमे १३० आणि १६०, तर व्होडाफोनचे ४५२ व ३३२ इतके आहे. माहिती अधिकार कार्यकर्तेप्रफुल सारडा यांनी ही माहिती समोर आणली आहे.अनेक मोठाले टॉवर उभारून मोबाईल कॉलमध्ये जाणवणाºया त्रुटी सुधारणार नाहीत. त्यासाठी मोबाईल सेवा पुरविणाºया कंपन्यांच्या हार्डवेअरची पुनर्रचना करण्याची आवश्यकता आहे. अद्ययावत हार्डवेअर नसल्यानेच मोबाईल कॉलच्या संदर्भात विविध त्रुटी सध्या जाणवत आहेत. मोबाईल कंपन्यांचे कालबाह्य हार्डवेअर सुधारल्यास हा प्रश्न सुटू शकेल.- आदित्य अभ्यंकर, विभागप्रमुख, तंत्रज्ञान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठप्राधिकरणाकडील दाखल तक्रारी त्रुटी दर्शवणाºयादेशात कोट्यवधी ग्राहक मोबाईल वापरतात. त्या तुलनेत तक्रारींचा शेकड्यातील आकडा अगदीच अत्यल्प वाटू शकतो. मात्र या सर्व तक्रारी अत्यंत त्रस्त झाल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून वापरणाºया ग्राहकांची संख्या आहेत. त्यातही अशा प्रकारे भारतीय नियामक प्राधिकरणाकडे जाऊ शकणारे सुशिक्षितांमध्येही अत्यंत थोडे असतात. सामान्य ग्राहकांची धाव ही संबंधित मोबाईल कंपन्यांच्या कॉल सेंटरपर्यंतच असते. त्यामुळे प्राधिकरणाकडेदाखल होणाºया तक्रारी या सेवेतील त्रुटी दर्शविणाºया मानल्या जातात.ट्रायकडे जानेवारी ते आॅक्टोबर २०१७ मध्ये दाखल तक्रारी(कंसात २०१६ची जानेवारी ते डिसेंबरची आकडेवारी)तक्रारीचा प्रकार बीएसएनएल एअरटेल आयडिया जीओ व्होडाफोनसेवेतील अडथळा ३५ (३८) ५३४ (२३०) १८४ (१८४) १३० (३) ४५२ (४२६)खराब सिग्नल ३९ (४३) ६५५ (७६७) ७८ (९६) १६१ (९) ३३२ (३११)कॉल ड्रॉप ०६ (२२) १५८ (२३०) ३९ (७४) २० (१) ६९ (१३४)डिसकनेक्शन ०१ (१) ३८ (४४) १८ (२१) १७ (२) ५० (४३)

टॅग्स :Mobileमोबाइल