शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

फोर जीच्या जमान्यातही ‘कॉल’ वेटिंगवर, भारतीय दूरसंचार प्राधिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 03:10 IST

जागतिक बाजारपेठा आता मोबाईलवरील सेव्हन जी इंटरनेट स्पीडबाबत बोलत आहेत. आत्ताच सहा जीबी-आठ जीबी रॅम इतक्या प्रचंड वेगाने डाटा प्रोसेस करणारे मोबाईल बाजारपेठेत अवतरु लागले आहेत.

- विशाल शिर्केपुणे : जागतिक बाजारपेठा आता मोबाईलवरील सेव्हन जी इंटरनेट स्पीडबाबत बोलत आहेत. आत्ताच सहा जीबी-आठ जीबी रॅम इतक्या प्रचंड वेगाने डाटा प्रोसेस करणारे मोबाईल बाजारपेठेत अवतरु लागले आहेत. देशाने देखील फाईव्ह जीची तयारी सुरु केली आहे. असे असतानाही अजूनही आपण कॉलची रेंज अखंडितपणे देण्यासाठी झटत असल्याचे वास्तव आहे.भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (टीआरएआय) दिलेल्या आकडेवारीवरुन ही माहिती समोर आली आहे. पूर्वी मोबाईल सेवा पुरविणाºया कंपन्यांच्या जाहिराती या येणारे आणि जाणारे कॉल दर किती याबाबत बोलत असत. गेल्या सतरा वर्षांत टप्प्याटप्प्याने येणारे आणि जाणाºया कॉलचे दर कमी होत आता ते फुकट झाले आहेत. आता इंटरनेटमुळे मोबाईल सेवेत क्रांती आली आहे.इंटरनेटच्या जमान्यात मोबाईल गेला असला, तरी या सेवेची प्राथमिकता असलेली कॉल सेवा अजूनही बाळसे धरताना दिसत नाही. अनेक भागात मोबाईलचा सिग्नल कमकुवत असणे, कॉल ड्रॉप होणे, कॉल न लागणे अथवा सेवेत अडथळा येणे अशा प्रकारच्या समस्यांना ग्राहक सामोरे जात आहेत. त्यातही सेवेत अडथळा निर्माण होणे आणि मोबाईल सिग्नल कमकुवत असणे याचा वाटा निम्मा आहे. हे चारही प्रकार मोबाईल कॉल व्यवस्थित न लागण्याशीच आहेत. त्यातही सिग्नल पुरेसा न मिळणे अथवा सेवेत व्यत्यय येणे हा प्रकार निश्चितच चांगले निदर्शक नाही. देशातील प्रमुख दोन कंपन्या असलेल्या एअरटेल आणि आयडिया या कंपन्यांच्या तक्रारीची आकडेवारी पाहिल्यास त्यावरुन अंदाज येऊ शकेल. जानेवारी ते ३१ सप्टेंबर २०१७ अखेरीपर्यंत सेवेत अडथळा येत असल्याच्या ५३४ तक्रारीएअरटेल विरोधात, तर १८४ तक्रारी आयडिया विरोधात ट्रायकडे दाखल झाल्या आहेत.सिग्नल कमकुवत असल्याच्या ६५५ तक्रारी एअरटेल अणि ७८ तक्रारी आयडियाच्या दाखल झाल्या. रिलायन्स जीओचे सेवेत अडथळा आणि सिग्नल कमकुवत असल्यायाचे प्रमाण अनुक्रमे १३० आणि १६०, तर व्होडाफोनचे ४५२ व ३३२ इतके आहे. माहिती अधिकार कार्यकर्तेप्रफुल सारडा यांनी ही माहिती समोर आणली आहे.अनेक मोठाले टॉवर उभारून मोबाईल कॉलमध्ये जाणवणाºया त्रुटी सुधारणार नाहीत. त्यासाठी मोबाईल सेवा पुरविणाºया कंपन्यांच्या हार्डवेअरची पुनर्रचना करण्याची आवश्यकता आहे. अद्ययावत हार्डवेअर नसल्यानेच मोबाईल कॉलच्या संदर्भात विविध त्रुटी सध्या जाणवत आहेत. मोबाईल कंपन्यांचे कालबाह्य हार्डवेअर सुधारल्यास हा प्रश्न सुटू शकेल.- आदित्य अभ्यंकर, विभागप्रमुख, तंत्रज्ञान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठप्राधिकरणाकडील दाखल तक्रारी त्रुटी दर्शवणाºयादेशात कोट्यवधी ग्राहक मोबाईल वापरतात. त्या तुलनेत तक्रारींचा शेकड्यातील आकडा अगदीच अत्यल्प वाटू शकतो. मात्र या सर्व तक्रारी अत्यंत त्रस्त झाल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून वापरणाºया ग्राहकांची संख्या आहेत. त्यातही अशा प्रकारे भारतीय नियामक प्राधिकरणाकडे जाऊ शकणारे सुशिक्षितांमध्येही अत्यंत थोडे असतात. सामान्य ग्राहकांची धाव ही संबंधित मोबाईल कंपन्यांच्या कॉल सेंटरपर्यंतच असते. त्यामुळे प्राधिकरणाकडेदाखल होणाºया तक्रारी या सेवेतील त्रुटी दर्शविणाºया मानल्या जातात.ट्रायकडे जानेवारी ते आॅक्टोबर २०१७ मध्ये दाखल तक्रारी(कंसात २०१६ची जानेवारी ते डिसेंबरची आकडेवारी)तक्रारीचा प्रकार बीएसएनएल एअरटेल आयडिया जीओ व्होडाफोनसेवेतील अडथळा ३५ (३८) ५३४ (२३०) १८४ (१८४) १३० (३) ४५२ (४२६)खराब सिग्नल ३९ (४३) ६५५ (७६७) ७८ (९६) १६१ (९) ३३२ (३११)कॉल ड्रॉप ०६ (२२) १५८ (२३०) ३९ (७४) २० (१) ६९ (१३४)डिसकनेक्शन ०१ (१) ३८ (४४) १८ (२१) १७ (२) ५० (४३)

टॅग्स :Mobileमोबाइल