शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

फोर जीच्या जमान्यातही ‘कॉल’ वेटिंगवर, भारतीय दूरसंचार प्राधिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 03:10 IST

जागतिक बाजारपेठा आता मोबाईलवरील सेव्हन जी इंटरनेट स्पीडबाबत बोलत आहेत. आत्ताच सहा जीबी-आठ जीबी रॅम इतक्या प्रचंड वेगाने डाटा प्रोसेस करणारे मोबाईल बाजारपेठेत अवतरु लागले आहेत.

- विशाल शिर्केपुणे : जागतिक बाजारपेठा आता मोबाईलवरील सेव्हन जी इंटरनेट स्पीडबाबत बोलत आहेत. आत्ताच सहा जीबी-आठ जीबी रॅम इतक्या प्रचंड वेगाने डाटा प्रोसेस करणारे मोबाईल बाजारपेठेत अवतरु लागले आहेत. देशाने देखील फाईव्ह जीची तयारी सुरु केली आहे. असे असतानाही अजूनही आपण कॉलची रेंज अखंडितपणे देण्यासाठी झटत असल्याचे वास्तव आहे.भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (टीआरएआय) दिलेल्या आकडेवारीवरुन ही माहिती समोर आली आहे. पूर्वी मोबाईल सेवा पुरविणाºया कंपन्यांच्या जाहिराती या येणारे आणि जाणारे कॉल दर किती याबाबत बोलत असत. गेल्या सतरा वर्षांत टप्प्याटप्प्याने येणारे आणि जाणाºया कॉलचे दर कमी होत आता ते फुकट झाले आहेत. आता इंटरनेटमुळे मोबाईल सेवेत क्रांती आली आहे.इंटरनेटच्या जमान्यात मोबाईल गेला असला, तरी या सेवेची प्राथमिकता असलेली कॉल सेवा अजूनही बाळसे धरताना दिसत नाही. अनेक भागात मोबाईलचा सिग्नल कमकुवत असणे, कॉल ड्रॉप होणे, कॉल न लागणे अथवा सेवेत अडथळा येणे अशा प्रकारच्या समस्यांना ग्राहक सामोरे जात आहेत. त्यातही सेवेत अडथळा निर्माण होणे आणि मोबाईल सिग्नल कमकुवत असणे याचा वाटा निम्मा आहे. हे चारही प्रकार मोबाईल कॉल व्यवस्थित न लागण्याशीच आहेत. त्यातही सिग्नल पुरेसा न मिळणे अथवा सेवेत व्यत्यय येणे हा प्रकार निश्चितच चांगले निदर्शक नाही. देशातील प्रमुख दोन कंपन्या असलेल्या एअरटेल आणि आयडिया या कंपन्यांच्या तक्रारीची आकडेवारी पाहिल्यास त्यावरुन अंदाज येऊ शकेल. जानेवारी ते ३१ सप्टेंबर २०१७ अखेरीपर्यंत सेवेत अडथळा येत असल्याच्या ५३४ तक्रारीएअरटेल विरोधात, तर १८४ तक्रारी आयडिया विरोधात ट्रायकडे दाखल झाल्या आहेत.सिग्नल कमकुवत असल्याच्या ६५५ तक्रारी एअरटेल अणि ७८ तक्रारी आयडियाच्या दाखल झाल्या. रिलायन्स जीओचे सेवेत अडथळा आणि सिग्नल कमकुवत असल्यायाचे प्रमाण अनुक्रमे १३० आणि १६०, तर व्होडाफोनचे ४५२ व ३३२ इतके आहे. माहिती अधिकार कार्यकर्तेप्रफुल सारडा यांनी ही माहिती समोर आणली आहे.अनेक मोठाले टॉवर उभारून मोबाईल कॉलमध्ये जाणवणाºया त्रुटी सुधारणार नाहीत. त्यासाठी मोबाईल सेवा पुरविणाºया कंपन्यांच्या हार्डवेअरची पुनर्रचना करण्याची आवश्यकता आहे. अद्ययावत हार्डवेअर नसल्यानेच मोबाईल कॉलच्या संदर्भात विविध त्रुटी सध्या जाणवत आहेत. मोबाईल कंपन्यांचे कालबाह्य हार्डवेअर सुधारल्यास हा प्रश्न सुटू शकेल.- आदित्य अभ्यंकर, विभागप्रमुख, तंत्रज्ञान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठप्राधिकरणाकडील दाखल तक्रारी त्रुटी दर्शवणाºयादेशात कोट्यवधी ग्राहक मोबाईल वापरतात. त्या तुलनेत तक्रारींचा शेकड्यातील आकडा अगदीच अत्यल्प वाटू शकतो. मात्र या सर्व तक्रारी अत्यंत त्रस्त झाल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून वापरणाºया ग्राहकांची संख्या आहेत. त्यातही अशा प्रकारे भारतीय नियामक प्राधिकरणाकडे जाऊ शकणारे सुशिक्षितांमध्येही अत्यंत थोडे असतात. सामान्य ग्राहकांची धाव ही संबंधित मोबाईल कंपन्यांच्या कॉल सेंटरपर्यंतच असते. त्यामुळे प्राधिकरणाकडेदाखल होणाºया तक्रारी या सेवेतील त्रुटी दर्शविणाºया मानल्या जातात.ट्रायकडे जानेवारी ते आॅक्टोबर २०१७ मध्ये दाखल तक्रारी(कंसात २०१६ची जानेवारी ते डिसेंबरची आकडेवारी)तक्रारीचा प्रकार बीएसएनएल एअरटेल आयडिया जीओ व्होडाफोनसेवेतील अडथळा ३५ (३८) ५३४ (२३०) १८४ (१८४) १३० (३) ४५२ (४२६)खराब सिग्नल ३९ (४३) ६५५ (७६७) ७८ (९६) १६१ (९) ३३२ (३११)कॉल ड्रॉप ०६ (२२) १५८ (२३०) ३९ (७४) २० (१) ६९ (१३४)डिसकनेक्शन ०१ (१) ३८ (४४) १८ (२१) १७ (२) ५० (४३)

टॅग्स :Mobileमोबाइल