शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

गाजर, मिरची महाग, पालेभाज्या स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:50 IST

मागील आठवड्याच्या तुलनेत गाजर आणि हिरवी मिरचीचे दर वाढले आहेत. आषाढी एकादशीमुळे बाजारात रताळी व भुईमुगाच्या शेंगांचीही आवक वाढली होती.

पिंपरी : येथील लाल बहाद्दूरशास्त्री भाजी मंडईत रविवारी पालेभाज्यांचे दर काही प्रमाणात कमी झाले. मागील आठवड्याच्या तुलनेत गाजर आणि हिरवी मिरचीचे दर वाढले आहेत. आषाढी एकादशीमुळे बाजारात रताळी व भुईमुगाच्या शेंगांचीही आवक वाढली होती.रताळी ४० ते ५० प्रतिकिलो तर भुईमुगाच्या शेंगा ६० ते ७० रुपये किलो दराने विकल्या जात होत्या. बेळगाव येथून मोठ्या प्रमाणात वटाण्याची आवक झाल्यामुळे वटाण्याचे भाव ५० टक्क्यांनी कमी झाले होते. मात्र या आठवड्यात मटारचे भाव थोड्याप्रमाणात वाढून ७० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. गेल्या आठवड्यात आवक वाढल्यामुळे मटारचे भाव ४० ते ५० रुपये झाले होते. शेवगा, गवार व श्रावणी घेवडा यांचे दर स्थिर होते. त्याचप्रमाणे टोमॅटो, पावटा, वाल यांचे भावात प्रतिकिलो १० रुपयांनी झालेली वाढ या आठवड्यात ही तशीच होती. कोथिंबीर व मेथीची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यामुळे त्यांचे भाव कमी झाले होते. कोथिंबीर व मेथी ७ ते ८ रुपये दराने विकली जात होती.भाज्यां प्रमाणेच फळांचे ही दर तुलनेने कमी झाले आहेत. आंब्याचा हंगाम संपत आल्यामुळे आंब्यांचे दर वाढले आहेत. आंबा १०० रुपये किलो दराने विकले जात होते.

पालेभाज्यांचे भाव पुढीलप्रमाणे:कोथिंबीर : ७ ते ८, मेथी : ७ ते ८, शेपू : १०, पालक : १०, मुळा : २०, कांदापात : २०, तांदुळजा : १०, पुदिना : ५, चुका : २०.फळांचे भाव पुढीलप्रमाणे :सफरचंद : १६० ते २००, आंबा : १००, पेरू : ४० ते ८०, सीताफळ : ४० ते १००, पपई : ३० ते ५०, डाळींब : ३० ते १००, मोसंबी : ६०, संत्री : १००, किवी : ६० ते ८० (३ नग), ड्रॅगन फ्रुट : ६० (१ नग), पिअर : १००, १६० (परदेशी).फळभाज्यांचे किरकोळ विक्रीचे दर (प्रतिकिलो)बटाटे : २० ते २२, कांदे : २२, टोमॅटो : ३०, गवार : ३५ ते ४०, दोडका : ३५ ते ४०, घोसाळी : ४०, लसूण : ४०, आले : ७०, भेंडी : ४० ते ५०, वांगी : ४०, कोबी : २५ ते ३०, फ्लॉवर : ४०, शेवगा : ५० ते ६०, हिरवी मिरची : ५० ते ६०, शिमला मिरची : ५०, पडवळ : २५ ते ३०, दुधी भोपळा : २५ ते ३०, लाल भोपळा : ४० ते ५०, काकडी : ३० ते ४०, चवळी : ४०, काळा घेवडा : ७०, तोंडली : ४०, गाजर : ५०, वाल : ४०, राजमा : ५० ते ६०, मटार : ७० ते ८०, कारली : ४०, पावटा : ६०, श्रावणी घेवडा : ८०, लिंबू : ४० ते ५० (शेकडा).उपवासामुळे रताळ्याला मागणीसांगवी : आषाढी एकादशीनिमित्त उपवासाच्या पदार्थांसह फळांना मागणी वाढली आहे. सांगवीत आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात रविवारी रताळी, बटाटे, भुईमुगाच्या शेंगा आदींना मागणी होती. त्यामुळे त्याचे दरही वधारल्याचे दिसून आले. रताळी ६० रुपये किलो तर भुईमुगाच्या शेंगा ८० रुपये किलो होत्या. फळांचेही दर चढेच होते. केळी ६० रुपये डझन तर सफरचंद प्रतिकिलो २०० रुपये दर होता. दर चढे असले तरी, ग्राहकांकडून या फळांची आणि उपवासाच्या पदार्थांसाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यात येत होती. साबुदाणा, वरईचीही खरेदी करण्यात येत होती.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड