शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

गाजर, मिरची महाग, पालेभाज्या स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:50 IST

मागील आठवड्याच्या तुलनेत गाजर आणि हिरवी मिरचीचे दर वाढले आहेत. आषाढी एकादशीमुळे बाजारात रताळी व भुईमुगाच्या शेंगांचीही आवक वाढली होती.

पिंपरी : येथील लाल बहाद्दूरशास्त्री भाजी मंडईत रविवारी पालेभाज्यांचे दर काही प्रमाणात कमी झाले. मागील आठवड्याच्या तुलनेत गाजर आणि हिरवी मिरचीचे दर वाढले आहेत. आषाढी एकादशीमुळे बाजारात रताळी व भुईमुगाच्या शेंगांचीही आवक वाढली होती.रताळी ४० ते ५० प्रतिकिलो तर भुईमुगाच्या शेंगा ६० ते ७० रुपये किलो दराने विकल्या जात होत्या. बेळगाव येथून मोठ्या प्रमाणात वटाण्याची आवक झाल्यामुळे वटाण्याचे भाव ५० टक्क्यांनी कमी झाले होते. मात्र या आठवड्यात मटारचे भाव थोड्याप्रमाणात वाढून ७० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. गेल्या आठवड्यात आवक वाढल्यामुळे मटारचे भाव ४० ते ५० रुपये झाले होते. शेवगा, गवार व श्रावणी घेवडा यांचे दर स्थिर होते. त्याचप्रमाणे टोमॅटो, पावटा, वाल यांचे भावात प्रतिकिलो १० रुपयांनी झालेली वाढ या आठवड्यात ही तशीच होती. कोथिंबीर व मेथीची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यामुळे त्यांचे भाव कमी झाले होते. कोथिंबीर व मेथी ७ ते ८ रुपये दराने विकली जात होती.भाज्यां प्रमाणेच फळांचे ही दर तुलनेने कमी झाले आहेत. आंब्याचा हंगाम संपत आल्यामुळे आंब्यांचे दर वाढले आहेत. आंबा १०० रुपये किलो दराने विकले जात होते.

पालेभाज्यांचे भाव पुढीलप्रमाणे:कोथिंबीर : ७ ते ८, मेथी : ७ ते ८, शेपू : १०, पालक : १०, मुळा : २०, कांदापात : २०, तांदुळजा : १०, पुदिना : ५, चुका : २०.फळांचे भाव पुढीलप्रमाणे :सफरचंद : १६० ते २००, आंबा : १००, पेरू : ४० ते ८०, सीताफळ : ४० ते १००, पपई : ३० ते ५०, डाळींब : ३० ते १००, मोसंबी : ६०, संत्री : १००, किवी : ६० ते ८० (३ नग), ड्रॅगन फ्रुट : ६० (१ नग), पिअर : १००, १६० (परदेशी).फळभाज्यांचे किरकोळ विक्रीचे दर (प्रतिकिलो)बटाटे : २० ते २२, कांदे : २२, टोमॅटो : ३०, गवार : ३५ ते ४०, दोडका : ३५ ते ४०, घोसाळी : ४०, लसूण : ४०, आले : ७०, भेंडी : ४० ते ५०, वांगी : ४०, कोबी : २५ ते ३०, फ्लॉवर : ४०, शेवगा : ५० ते ६०, हिरवी मिरची : ५० ते ६०, शिमला मिरची : ५०, पडवळ : २५ ते ३०, दुधी भोपळा : २५ ते ३०, लाल भोपळा : ४० ते ५०, काकडी : ३० ते ४०, चवळी : ४०, काळा घेवडा : ७०, तोंडली : ४०, गाजर : ५०, वाल : ४०, राजमा : ५० ते ६०, मटार : ७० ते ८०, कारली : ४०, पावटा : ६०, श्रावणी घेवडा : ८०, लिंबू : ४० ते ५० (शेकडा).उपवासामुळे रताळ्याला मागणीसांगवी : आषाढी एकादशीनिमित्त उपवासाच्या पदार्थांसह फळांना मागणी वाढली आहे. सांगवीत आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात रविवारी रताळी, बटाटे, भुईमुगाच्या शेंगा आदींना मागणी होती. त्यामुळे त्याचे दरही वधारल्याचे दिसून आले. रताळी ६० रुपये किलो तर भुईमुगाच्या शेंगा ८० रुपये किलो होत्या. फळांचेही दर चढेच होते. केळी ६० रुपये डझन तर सफरचंद प्रतिकिलो २०० रुपये दर होता. दर चढे असले तरी, ग्राहकांकडून या फळांची आणि उपवासाच्या पदार्थांसाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यात येत होती. साबुदाणा, वरईचीही खरेदी करण्यात येत होती.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड