शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

मतदारसंघाचे उमेदवारांना कुंपण

By admin | Updated: October 4, 2014 23:52 IST

गेल्या 5 वर्षापासून सत्तेत बसलेल्या आणि सत्तेबाहेर असलेल्या शहरातील सर्वपक्षीय आमदारांकडून तसेच राजकीय पक्षांकडून शहराच्या समस्यांसाठी गळा काढला जात होता

पुणो : गेल्या 5 वर्षापासून सत्तेत बसलेल्या आणि सत्तेबाहेर असलेल्या शहरातील सर्वपक्षीय आमदारांकडून तसेच राजकीय पक्षांकडून शहराच्या समस्यांसाठी गळा काढला जात होता. मात्र, प्रत्यक्षात विधानसभा निवडणूकींची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर या आमदारांना आणि राजकीय पक्षांनाही शहराच्या प्रश्नांचा विसर पडला असल्याचे चित्र आहे. शहरातील विद्यमान आमदारांनी आपण आपल्या मतदारसंघासाठी काय केले याचे अहवाल तयार केले आहेत़ त्यात शहराच्या संपूर्ण विकासाऐवजी मतदारसंघालाच महत्व दिले आह़े अनेक उमेदवारांनी मतदारसंघाचा योजना तयार केल्या आहेत़ पण त्यात संपूर्ण शहराचा विचार करताना दिसून येत नाही़ 
निवडणूकीसाठी अवघ्या 1क् दिवसांचा कालावधी उरला असतानाही, अद्याप एकाही नेत्याने अथवा आमदाराने शहराच्या प्रश्नांबाबत भाष्य केलेले नाही. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाने शहरासाठीचा आपला अजेंडाही अद्याप जनतेपुढे मांडलेला नाही. या उमेदवारांना शहरासाठी वाटत असलेली चिंता पुतना मावशीचे प्रेम होते की काय असा सवाल सर्वसामन्यांमधून उपस्थित केला जात आहे. 
शहरात  झोपडपटटी पुनर्वसनासाठीची एसआरए नियमावली, मेट्रो, जेएनएनयुआरएम योजनेचे रखडलेले अनुदान, बीआरटी, पीएमआरडीए, म्हाडाची नियमावली, महापालिकेची राज्यशासनाकडे थकीत असलेली देणी, रिंग रोड, शहराचा विकास आराखडा असे एक ना अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. निवडणूका डोळ्यासमोर दिसू लागताच या प्रश्नांच्या नावाखाली सर्वच राजकीय पक्षाच्या विद्यमान आमदारांनी आंदोलने, मोर्चे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी बैठका घेऊन हे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकर घेत असल्याचे भासवून दिले. मात्र, प्रत्यक्षात चर्चेव्यक्तिरिक्त कोणतेही प्रश्न सुटलेले नाहीत. तर आता या विद्यमान व त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या कोणत्याही उमेदवारांनी आपल्या विकास कामांच्या अजेंडयात या प्रश्नांचा समावेश केला नाही. शहराच्या प्रश्नांवर घसा काढणा-या या उमेदवारांचे अजेंडे केवळ आपल्या मतदारसंघा पुरतेच मर्यादीत राहिले असल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)
 
च्प्रत्येक उमेदवारास आपल्या मतदारसंघात लक्ष घालणो महत्त्वाचे आहे. मात्र, आपल्या पक्षाचे उमेदवार संपूर्ण शहरासाठी काय करतील याची दिशा व अजेंडा मांडणो ही प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी असणार आहे. 
च्अद्याप एकाही पक्षाने उमेदवाराच्या मतदारसंघापलीकडे जाऊन शहरासाठीची भूमिका  स्पष्ट केलेली नाही, अथवा त्यांचे जाहीरनामेही तयार नाहीत. सर्वच पक्षांचा आपला शहरासाठी जाहीरनामा असणार नाही. तर प्रत्येक उमेदवाराचा स्वतंत्र जाहीरनामा असेल अस स्पष्ट केलेले आहे. 
च्शहरातील प्रश्न हे मतदारसंघापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण शहराचे असतात़ त्यावर एकत्रित काही करणो पक्षांनी टाळले आह़े