शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मतदारसंघाचे उमेदवारांना कुंपण

By admin | Updated: October 4, 2014 23:52 IST

गेल्या 5 वर्षापासून सत्तेत बसलेल्या आणि सत्तेबाहेर असलेल्या शहरातील सर्वपक्षीय आमदारांकडून तसेच राजकीय पक्षांकडून शहराच्या समस्यांसाठी गळा काढला जात होता

पुणो : गेल्या 5 वर्षापासून सत्तेत बसलेल्या आणि सत्तेबाहेर असलेल्या शहरातील सर्वपक्षीय आमदारांकडून तसेच राजकीय पक्षांकडून शहराच्या समस्यांसाठी गळा काढला जात होता. मात्र, प्रत्यक्षात विधानसभा निवडणूकींची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर या आमदारांना आणि राजकीय पक्षांनाही शहराच्या प्रश्नांचा विसर पडला असल्याचे चित्र आहे. शहरातील विद्यमान आमदारांनी आपण आपल्या मतदारसंघासाठी काय केले याचे अहवाल तयार केले आहेत़ त्यात शहराच्या संपूर्ण विकासाऐवजी मतदारसंघालाच महत्व दिले आह़े अनेक उमेदवारांनी मतदारसंघाचा योजना तयार केल्या आहेत़ पण त्यात संपूर्ण शहराचा विचार करताना दिसून येत नाही़ 
निवडणूकीसाठी अवघ्या 1क् दिवसांचा कालावधी उरला असतानाही, अद्याप एकाही नेत्याने अथवा आमदाराने शहराच्या प्रश्नांबाबत भाष्य केलेले नाही. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाने शहरासाठीचा आपला अजेंडाही अद्याप जनतेपुढे मांडलेला नाही. या उमेदवारांना शहरासाठी वाटत असलेली चिंता पुतना मावशीचे प्रेम होते की काय असा सवाल सर्वसामन्यांमधून उपस्थित केला जात आहे. 
शहरात  झोपडपटटी पुनर्वसनासाठीची एसआरए नियमावली, मेट्रो, जेएनएनयुआरएम योजनेचे रखडलेले अनुदान, बीआरटी, पीएमआरडीए, म्हाडाची नियमावली, महापालिकेची राज्यशासनाकडे थकीत असलेली देणी, रिंग रोड, शहराचा विकास आराखडा असे एक ना अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. निवडणूका डोळ्यासमोर दिसू लागताच या प्रश्नांच्या नावाखाली सर्वच राजकीय पक्षाच्या विद्यमान आमदारांनी आंदोलने, मोर्चे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी बैठका घेऊन हे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकर घेत असल्याचे भासवून दिले. मात्र, प्रत्यक्षात चर्चेव्यक्तिरिक्त कोणतेही प्रश्न सुटलेले नाहीत. तर आता या विद्यमान व त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या कोणत्याही उमेदवारांनी आपल्या विकास कामांच्या अजेंडयात या प्रश्नांचा समावेश केला नाही. शहराच्या प्रश्नांवर घसा काढणा-या या उमेदवारांचे अजेंडे केवळ आपल्या मतदारसंघा पुरतेच मर्यादीत राहिले असल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)
 
च्प्रत्येक उमेदवारास आपल्या मतदारसंघात लक्ष घालणो महत्त्वाचे आहे. मात्र, आपल्या पक्षाचे उमेदवार संपूर्ण शहरासाठी काय करतील याची दिशा व अजेंडा मांडणो ही प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी असणार आहे. 
च्अद्याप एकाही पक्षाने उमेदवाराच्या मतदारसंघापलीकडे जाऊन शहरासाठीची भूमिका  स्पष्ट केलेली नाही, अथवा त्यांचे जाहीरनामेही तयार नाहीत. सर्वच पक्षांचा आपला शहरासाठी जाहीरनामा असणार नाही. तर प्रत्येक उमेदवाराचा स्वतंत्र जाहीरनामा असेल अस स्पष्ट केलेले आहे. 
च्शहरातील प्रश्न हे मतदारसंघापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण शहराचे असतात़ त्यावर एकत्रित काही करणो पक्षांनी टाळले आह़े