शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
3
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
4
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
5
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
6
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
7
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
8
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
9
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
10
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
11
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
12
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
13
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
14
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
15
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला
16
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
17
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
18
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
19
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
20
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...

जवळार्जुनला १० बंधारे बांधणार

By admin | Updated: April 25, 2016 01:19 IST

पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन गावात पहिल्या टप्प्यात विविध विकासकामे हाती घेण्यात आली असून दहा बंधारे बांधले जाणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी सांगितले.

जेजुरी : सांसद आदर्शग्राम योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन गावात पहिल्या टप्प्यात विविध विकासकामे हाती घेण्यात आली असून दहा बंधारे बांधले जाणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी सांगितले.पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन हे गाव खासदार शरद पवार यांनी दत्तक घेतले आहे. जवळार्जुन येथे शरद पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ व विशेषग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पवार बोलत होते. या वेळी माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, उद्योजक सतीश मगर, राष्ट्रवादीचे नेते विजय कोलते, दिलीप बारभाई, सुदाम इंगळे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, शिवाजी पोमण, दत्ता चव्हाण, विराज काकडे, पंचायत समितीच्या सभापती अंजना भोर, कॉँग्रसचे नंदकुमार जगताप, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार संजय पाटील व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.पवार म्हणाले, की देशाच्या पंतप्रधानांनी ही योजना सुरू केली असली, तरी या योजनेसाठी केंद्र शासनाच्या कुठल्याही निधीची तरतूद नाही. खासदार निधी राज्य शासन, उद्योजक यांची मदत घेऊन दत्तक गावांचा विकास करावयाचा आहे. जवळार्जुन गावात कऱ्हा नदीवर पाच बंधारे बांधणे, कृषी विभागात तीन बंधारे, काळा ओढा व चोरवाडी येथे दोन बंधारे बांधणे, गावातील बेघर नागरिकांसाठी घरे बांधणे, खांबावर एलईडी स्ट्रीट लाईट व्यवस्था करणे, राणे वस्तीवर शाळेसाठी वर्ग खोल्या व संरक्षक भिंत बांधणे, महिलांसाठी स्वयंरोजगार केंद्रासाठी इमारत बांधणे, गावातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करणे, वैयक्तिक शौचालये, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे, शेती प्रशिक्षण केंद्र उभारणे, जिल्हा बँकेची शाखा सुरू करणे, ही कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामासाठी साडेसात कोटी रुपयांची गरज असून, पुणे शहरातील काही उद्योजकांकडून अडीच कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच, खासदार फंडातील अडीच कोटी, असे साडेसात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे पवार यांनी सांगितले.माजी आमदार अशोक टेकवडे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळेच पवारसाहेबांनी गाव दत्तक घेतले आहे, ग्रामस्थ त्यांचे आभारी आहेत, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र देवकर यांनी केले. (वार्ताहर)