शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

जवळार्जुनला १० बंधारे बांधणार

By admin | Updated: April 25, 2016 01:19 IST

पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन गावात पहिल्या टप्प्यात विविध विकासकामे हाती घेण्यात आली असून दहा बंधारे बांधले जाणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी सांगितले.

जेजुरी : सांसद आदर्शग्राम योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन गावात पहिल्या टप्प्यात विविध विकासकामे हाती घेण्यात आली असून दहा बंधारे बांधले जाणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी सांगितले.पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन हे गाव खासदार शरद पवार यांनी दत्तक घेतले आहे. जवळार्जुन येथे शरद पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ व विशेषग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पवार बोलत होते. या वेळी माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, उद्योजक सतीश मगर, राष्ट्रवादीचे नेते विजय कोलते, दिलीप बारभाई, सुदाम इंगळे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, शिवाजी पोमण, दत्ता चव्हाण, विराज काकडे, पंचायत समितीच्या सभापती अंजना भोर, कॉँग्रसचे नंदकुमार जगताप, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार संजय पाटील व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.पवार म्हणाले, की देशाच्या पंतप्रधानांनी ही योजना सुरू केली असली, तरी या योजनेसाठी केंद्र शासनाच्या कुठल्याही निधीची तरतूद नाही. खासदार निधी राज्य शासन, उद्योजक यांची मदत घेऊन दत्तक गावांचा विकास करावयाचा आहे. जवळार्जुन गावात कऱ्हा नदीवर पाच बंधारे बांधणे, कृषी विभागात तीन बंधारे, काळा ओढा व चोरवाडी येथे दोन बंधारे बांधणे, गावातील बेघर नागरिकांसाठी घरे बांधणे, खांबावर एलईडी स्ट्रीट लाईट व्यवस्था करणे, राणे वस्तीवर शाळेसाठी वर्ग खोल्या व संरक्षक भिंत बांधणे, महिलांसाठी स्वयंरोजगार केंद्रासाठी इमारत बांधणे, गावातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करणे, वैयक्तिक शौचालये, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे, शेती प्रशिक्षण केंद्र उभारणे, जिल्हा बँकेची शाखा सुरू करणे, ही कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामासाठी साडेसात कोटी रुपयांची गरज असून, पुणे शहरातील काही उद्योजकांकडून अडीच कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच, खासदार फंडातील अडीच कोटी, असे साडेसात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे पवार यांनी सांगितले.माजी आमदार अशोक टेकवडे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळेच पवारसाहेबांनी गाव दत्तक घेतले आहे, ग्रामस्थ त्यांचे आभारी आहेत, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र देवकर यांनी केले. (वार्ताहर)