शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
2
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
3
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
4
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
5
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
6
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
7
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
8
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
9
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
10
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
11
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
12
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
13
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
14
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
15
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
16
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
17
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
18
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
19
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
20
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

सळईच्या चटक्यांनी बेजार भावंडांनी सोडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 03:59 IST

सख्खे वडील-सावत्र आईने केला अमानुष छळ

पिंपरी : घराची स्वच्छता केली नाही, खिशात खाऊ का घेतला, अशा किरकोळ कारणांवरून कधी लाकडी दांडक्याने मारहाण, तर कधी लोखंडी सळईने पोटावर, हाता-पायांवर चटके दिले जातात. सावत्र आई आणि सख्ख्या वडिलांकडूनच अशी वागणूक मिळत होती. हा छळ असह्य झाल्याने नऊ वर्षांचा महेश आणि सात वर्षांच्या वैष्णवीने घर सोडून जाण्याचा निश्चय केला.शाळेच्या गणवेशातच हे बहीण-भाऊ गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घराबाहेर पडले. नाशिक फाटा, कासारवाडी येथे ते लातूरला जाणाऱ्या एसटी बसची चौकशी करू लागले. शंका आल्याने काही नागरिकांनी विचारपूस केल्यानंतर मुलांनी घडल्या प्रसंगाची माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी मुलांना थेट भोसरी पोलीस ठाण्यात नेले. नंतर त्यांचा छळ करणाºया आई-वडिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.गुंडेराव सूर्यवंशी (रा. मोशी, पिंपरी-चिंचवड) असे वडिलाचे तर, गौरी असे या मुलांच्या सावत्र आईचे नाव आहे. या दोघांकडून ६ महिन्यांपासून होणारा छळ चिमुकल्यांना असह्य झाला होता. आई वारंवार काही तरी काम सांगत असे. तिच्या मर्जीप्रमाणे काम न केल्यास ती पतीकडे मुलांची तक्रार करायची. मुलांचे दु:ख समजून घेण्याऐवजी वडील चिमुकल्यांनाच मारायचे. केवळ लाकडी दांडक्याने, घरात मिळेल त्या वस्तूने मारहाण करून ते थांबले नाहीत, तर तापलेल्या सळईने या मुलांच्या पोटाला चटके दिले. अमानुषपणे होणारा छळअसह्य झाल्याने मुलांनी घरातून पलायन केले.बुधवारी (दि.१२) दुपारी तीनच्या सुमारास ही भावंडं घर सोडून थेट पुणे-नाशिक महामार्गावर आली. नाशिक फाटा येथे ती एसटी बसची चौकशी करू लागली. शाळेच्या गणवेशातील मुले कोणीही सोबत नसताना कुठे निघाली आहेत, अशी शंका काही प्रवाशांना आली. विश्वासात घेऊन विचारपूस केली, त्या वेळी मुलांनी आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती दिली. जागरूक नागरिकांनी शाळेच्या गणवेशातील दोघांना भोसरी एमआयडीसी पोलिसांकडे नेले.सख्खी आई लातूरला; दुसºया पत्नीच्या मर्जीखातर छळपोलिसांपुढे मुलांनी माता-पित्याचे कारनामे सांगितले. या मुलांची सख्खी आई लातूरला असते. त्यामुळे तिच्याकडे जाण्याचा निर्धार केला असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. फिर्याद दाखल करून त्यांना त्रास देणाºया त्यांच्या आई-वडिलांना पोलिसांनी अटक केली.छळ करणाºया माता-पित्यांच्या तावडीतून सुटून जाण्याचा प्रयत्न करणाºया बहीण, भावाला पोलिसांनी पहिल्यांदा रुग्णालयात नेले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली. दोघांनाही बालसुधारगृहात पाठविण्यात आले. मुलांचे वडील हे मूळचे लातूरचे आहेत. बारावी शिकलेल्या या गृहस्थाने पहिल्या पत्नीला सोडून दिल्यानंतर दुसºया महिलेशी विवाह केला. पहिल्या पत्नीच्या दोन मुलांना घेऊन तो दुसºया पत्नीबरोबर राहू लागला. दुसरी पत्नी सोडून जाऊ नये, यासाठी तिची मर्जी जपण्याच्या नादात त्याने मुलांचा अमानुष छळ केला. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड